शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

महापुराची पूर्वतयारी अधिक गतीमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 16:34 IST

चांदोरी : चांदोरी सह संपूर्ण गोदाकाठच्या १९ ते २० गावांना महापुराचा फटका बसत असतो या महापुरामूळे शेती,छोटे-मोठे व्यवसायिक, दुकानदार, दूध संकलन केंद्र यांना मोठया प्रमाणत आर्थिक झळ सोसावी लागते तर मोठया प्रमाणात वित्तहानी होते.

चांदोरी : चांदोरी सह संपूर्ण गोदाकाठच्या १९ ते २० गावांना महापुराचा फटका बसत असतो या महापुरामूळे शेती,छोटे-मोठे व्यवसायिक, दुकानदार, दूध संकलन केंद्र यांना मोठया प्रमाणत आर्थिक झळ सोसावी लागते तर मोठया प्रमाणात वित्तहानी होते.इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व नाशिक शहरात जोरदार पाऊस झाला की गंगापूर अन् दारणा धरणातून मोठया प्रमाणात विसर्ग केला जातो व शहरातील पाणी त्यात मिळसले, ते पाणी वाहत थेट गोदाकाठावरील गावात शिरते व जनजीवन विस्कळीत होते.दरवर्षी जिल्हा व तालुका प्रशासन पूरपरिस्थितीबाबत आढाव घेऊन व योजना तयार करत असते. पुरेषेत राहणाऱ्या लोकांचे स्थलांतर करणे व त्यांना सूचना देत अन्न पुरवठा करणे तसेच कोणी कुठे अडकलेले असेल त्यांचे रेस्क्यूव करणे, औषध पुरवठा सुरळीत ठेवणे अशी कामे प्रशासन करत असत.या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून चांगल्या पावसाला सुरु वात झाली. काही गावातले ओहळ, नाले भरभरून वाहत आहे. मागील महिन्यात प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार दीपक पाटील यांनी पूररेषेत असलेल्या गावाचा आढावा घेतला. तसेच गोदाकाठ भागात पुरपरिस्थिती देवदूत म्हणून काम करणाºया आपत्ती व्यवस्थापन समितीच्या स्वयंसेवकांच्या अडचणी जाणून घेतल्या व पूरपरिस्थिती बचाव करण्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी आपत्ती व्यवस्थापन समितीने केली आहे.दरवर्षी पुररेषेत राहणाºया नागरिकांना पुर परिस्थिती निर्माण झाल्यावर जवळपास १०० ते २०० कुटुंबियांचे स्थलांतर केले जाते, परंतु या वर्षी कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार केला आहे, याचमुळे स्थलांतरित लोकांना एकत्र ठेवता येणार नाही. यावर उपाय काढत प्रशासनाच्या वतीने जूनच्या पहिल्या आठवड्यात पुररेषेत राहणाºया नागरिकांना प्रत्येकाने स्वत:च्या मार्गाने स्थलांतर होऊन सुरक्षित स्थळी निघून जावे असे आवाहन करण्यात आले आहे, तसेच नोटीस देण्यात आली आहे.तसेच नागरिकांना पाण्याच्या निसर्गाबाबत वेळोवेळी माहिती देण्यासाठी नियोजन केले आहे.आपत्ती व्यवस्थापन समितीने पूरपरिस्थिती बचाव करण्यासाठी लागणाºया यंत्र व इतर साहित्याची तपासणी व प्रात्यक्षिके व सराव करून पूर्व तयारी केली आहे.निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांनी शुक्रवारी(दि.१९ जून) गोदाकाठच्या गावातील ग्रामसेवक व सरपंच यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन पूराच्या पूर्वतयारी बाबत आढाव घेतला. तसेच नेहमीच गोदावरी पुर पाण्याला अडसर निर्माण करणाºया पानवेली देखील जलसंपदा विभागाच्या वतीने काढण्यास सुरु वात करण्यात आली आहे.चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीचे ३० स्वयंसेवक पूरपरिस्थितीत कसे बचाव कार्य करावे तसेच सराव करत आहे. समिती बाळू आंबेकर यांनी समिती पूरपरिस्थितीत काम करण्यासाठी सज्ज असल्याने सांगितले.पूरपरिस्थितीचा आढावा घेतला असून तसेच पुरेषेत राहण्याºया नागरिकांना वेळोवेळी सूचना दिल्या जातील.प्रशासनाने पूरपरिस्थितीची पूर्व तयारी पूर्ण केली आहे व नागरिकांनी सहकार्य करावे.- दीपक पाटील, तहसीलदार, निफाड.चांदोरी व सायखेडा गटातील सर्व गावांचा पूरपरिस्थिती बाबत आढाव घेतला आहे. त्या संदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक याची बैठक घेत सूचना दिल्या आहे.-दिलीप बनकर, आमदार, निफाड तालुका.

टॅग्स :Rainपाऊसgram panchayatग्राम पंचायत