नाशिक : पंचवटी येथील मनपा जलशुद्धीकरण केंद्र येथे होणार्या विद्युत रोहित्र कामाचा महावितरणशी कोणताही संबंध नसल्याने महावितरणचा वीजपुरवठा हा सुरळीत राहणार आहे. महावितरणने पंचवटीत कोणत्याही प्रकारे विजेच्या अथवा रोहित्राच्या दुरुस्तीचे काम हाती घेतलेले नाही. त्यामुळे वीजपुरवठा बंद करण्याचा प्रश्नच नाही. पंचवटीत उद्या खंडित होणार्या वीजपुरवठ्याशी महावितरणचा थेट कोणताही संबध नाही. महावितरणकडून नियमितप्रमाणे वीजपुरवठा केला जाणार आहे, असे महावितरणच्या नाशिक परिमंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
पंचवटीत वीजपुरवठा राहणार सुरळीत
By admin | Updated: May 22, 2014 00:23 IST