शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

गोदाकाठ भागात वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 12:34 AM

सायखेडा : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोरड्या पडलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात बुधवारी सायंकाळी सायखेडा परिसरात पाणी दाखल झाले. गुरुवारी दुपारपर्यंत नांदूरमधमेश्वर धरणात पाणी दाखल होईल. दारणा धरणातून ७००, वालदेवी २००, तर मुकणे धरणातून ९०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, भयाण दुष्काळात आलेल्या आवर्तनामुळे गोदाकाठ भागातील गावांना दिलासा मिळणार आहे.

ठळक मुद्देवालदेवी २००, दारणा ७००, तर मुकणे धरणातून ९०० क्यूसेकचा विसर्ग

सायखेडा : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोरड्या पडलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात बुधवारी सायंकाळी सायखेडा परिसरात पाणी दाखल झाले. गुरुवारी दुपारपर्यंत नांदूरमधमेश्वर धरणात पाणी दाखल होईल. दारणा धरणातून ७००, वालदेवी २००, तर मुकणे धरणातून ९०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, भयाण दुष्काळात आलेल्या आवर्तनामुळे गोदाकाठ भागातील गावांना दिलासा मिळणार आहे.दारणा आणि गोदावरी नदी अनेक दिवसांपासून कोरडी पडली आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा थेंबही नसल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व योजना बंद झाल्या आहेत. अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. आठ दिवस पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. गावांना पाणीपुरवठा करणाºया विहिरी कोरड्याठाक पडल्याने भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.सोमवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दुष्काळ दौरा केला. त्याच दिवशी वालदेवी, मुकणे आणि दारणा धरणातून एकूण १८०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले. मात्र नदीचे कोरडेठाक पात्र आणि वाळू उपसा झाल्याने पडलेले मोठमोठे खड्डे यामुळे नदीच्या पात्रात मोठा जलसाठा साठला जात असल्याने पाणी पुढे ढकलण्यास उशीर होत आहे. गुरु वारी नांदूरमधमेश्वर धरणात पाणी पोहोचून दोन दिवसानंतर डाव्या आणि उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात येणार आहे.नदीतून वाहणाºया पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी होऊ नये, अडथळा निर्माण होऊ नये, नदीपात्रातून काही दिवस शेतकऱ्यांनी पाणी उचलू नये, धरण भरून उजव्या आणि डाव्या कालव्याला पाणी सोडले जावे तोपर्यंत नदीकाठच्या भागातील वीजपुरवठा २२ तास खंडित करण्यात आला आहे.बंद पडलेल्यायोजना कार्यान्वित गोदावरी नदीच्या काठावर विहिरी खोदून अनेक गावांनी कुपनलिकांद्वारे गावांना पाणीपुरवठा करणाºया योजना केल्या आहेत. मात्र नदीचे पाणी आटल्याने एक महिन्यापासून अनेक योजना बंद पडल्या होत्या. नदीला अखेरचे आवर्तन आल्याने या योजना पुन्हा सुरू होऊन गावांना दिलासा मिळणार आहे. यामुळे किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.