शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

येवल्यातील ५३ शाळांचा वीजपुरवठा खंडित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:06 IST

येवला : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७२ शाळांपैकी १९ शाळांमध्ये अद्याप वीजजोडणीच नसून ५३ शाळांची वीजबिले थकल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून वीज नसताना या शाळांमध्ये तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पुरवलेले लेड टीव्ही, डिजिटल बोर्ड, संगणक आदी साहित्य पडून आहे.

ठळक मुद्देबिल थकले : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १९ शाळांमध्ये जोडणीच नाही

येवला : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७२ शाळांपैकी १९ शाळांमध्ये अद्याप वीजजोडणीच नसून ५३ शाळांची वीजबिले थकल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून वीज नसताना या शाळांमध्ये तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पुरवलेले लेड टीव्ही, डिजिटल बोर्ड, संगणक आदी साहित्य पडून आहे.तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अंगणगाव केंद्रातील तळ्याचा माथा (धुळगाव), भारम केंद्रातील आडसुरेगाव, आढाव- कुºहेवस्ती, बोकटे केंद्रातील बोंबलेवस्ती, गणेशवाडी, गवंडगाव केंद्रातील महादेववाडी, कुसमाडी केंद्रातील सावखेडे, भगतवाडी, म्हसोबावाडी (कुसमाडी), म्हसोबावाडी (कुसुर), पाटोदा केंद्रातील डोहवस्ती, राजापूर केंद्रातील नाईकवस्ती, मल्हावाडी, दाणेवस्ती, वाघवस्ती, सावरगाव केंद्रातील गोपाळवाडी, म्हस्के वस्ती, गायरान वस्ती, मोठामळा या १९ शाळांना अद्यापपावेतो वीजजोडणीच नाही, तर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अंदरसूल केंद्रातील फुलेवाडी, मन्याडथडी, दुर्गाभवानी वाडी, बजरंगवाडी, देवानंदवाडी, रामवाडी, शंकरवाडी, दळेवस्ती, भारम केंद्रातील तळवाडे, शिवाजीनगर (तळवाडे), रहाडी, महादेववाडी, विठ्ठलवाडी, कौटखेडे, डोंगरगाव, बोकटे केंद्रातील दुगलगाव, देवळाणे, चिचोंडी केंद्रातील हनुमानवाडी, महालखेडा, पाटोदा, निमगाव मढ, गवंडगाव केंद्रातील सुरेगाव रस्ता, भायखेडे, गारखेडे, पाणलोटवस्ती, कुसमाडी केंद्रातील अनकाई बारी, धामोडे, कुसमाडी, नगरसूल केंद्रातील हडपसावरगाव, लहित, बटवलवस्ती, गाडेवस्ती, कोळगाव, नागडे केंद्रातील कोटमगाव बुद्रूक व खुर्द, वडगाव, राजापूर केंद्रातील सोमठाणजोश, खिर्डीसाठे, जायदरे, लमाणतांडा, हनुमाननगर, सावरगाव केंद्रातील आंबेवाडी, कासारखेडा, गोरेवस्ती, गोपाळवस्ती, सोमठाणदेश केंद्रातील लौकी, शिरसगाव, मुरमी, निळखेडे, महादेव मंदिर, विखरणी, गायके- बागुल वस्ती, जगतापवस्ती, यवला मराठी केंद्रातील रेल्वे स्टेशन (येवला) या ५३ शाळांचे एकूण एक लाख ५८ हजार ११४ रुपये वीजबि ल थकल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.शाळांसाठी व्यावसायिक दराने वीजपुरवठा केला जात असल्याने शाळा वीजबिल भरू शकली नसल्याचे कारण सांगितले जाते. तर या प्रश्नी वीज उपलब्ध करून देण्याची मागणी पालकांकडून केली जात असताना पर्यायी व्यवस्थेचा विचार करण्याची सूचना खुद्द शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संबंधिताना केली होती. मात्र, अद्यापही या शाळांमध्ये वीजपुरवठा सुरू झालेला नाही. सध्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्या तरी गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न आहे.

येवला तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये चौदाव्या किंवा पंधराव्या वित्त आयोग निधीतून सौर यंत्रणा बसविल्यास शाळांमध्ये वीज उपलब्ध होवून अध्यापनाचे काम सुरूळीत होईलच याबरोबरच वीज देयकांचा प्रश्नही राहणार नाही. जिल्हा परिषद मुख्य कायर्कारी अधिकारी यांना आपण या संदर्भात पत्र पाठवून याबाबत ग्रामपंचायतींना आपल्या स्तरावरून आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे.- प्रविण गायकवाड, सभापती, पंचायत समिती, येवला

टॅग्स :mahavitaranमहावितरणSchoolशाळा