शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

येवल्यातील ५३ शाळांचा वीजपुरवठा खंडित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:06 IST

येवला : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७२ शाळांपैकी १९ शाळांमध्ये अद्याप वीजजोडणीच नसून ५३ शाळांची वीजबिले थकल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून वीज नसताना या शाळांमध्ये तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पुरवलेले लेड टीव्ही, डिजिटल बोर्ड, संगणक आदी साहित्य पडून आहे.

ठळक मुद्देबिल थकले : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १९ शाळांमध्ये जोडणीच नाही

येवला : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७२ शाळांपैकी १९ शाळांमध्ये अद्याप वीजजोडणीच नसून ५३ शाळांची वीजबिले थकल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून वीज नसताना या शाळांमध्ये तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पुरवलेले लेड टीव्ही, डिजिटल बोर्ड, संगणक आदी साहित्य पडून आहे.तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अंगणगाव केंद्रातील तळ्याचा माथा (धुळगाव), भारम केंद्रातील आडसुरेगाव, आढाव- कुºहेवस्ती, बोकटे केंद्रातील बोंबलेवस्ती, गणेशवाडी, गवंडगाव केंद्रातील महादेववाडी, कुसमाडी केंद्रातील सावखेडे, भगतवाडी, म्हसोबावाडी (कुसमाडी), म्हसोबावाडी (कुसुर), पाटोदा केंद्रातील डोहवस्ती, राजापूर केंद्रातील नाईकवस्ती, मल्हावाडी, दाणेवस्ती, वाघवस्ती, सावरगाव केंद्रातील गोपाळवाडी, म्हस्के वस्ती, गायरान वस्ती, मोठामळा या १९ शाळांना अद्यापपावेतो वीजजोडणीच नाही, तर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अंदरसूल केंद्रातील फुलेवाडी, मन्याडथडी, दुर्गाभवानी वाडी, बजरंगवाडी, देवानंदवाडी, रामवाडी, शंकरवाडी, दळेवस्ती, भारम केंद्रातील तळवाडे, शिवाजीनगर (तळवाडे), रहाडी, महादेववाडी, विठ्ठलवाडी, कौटखेडे, डोंगरगाव, बोकटे केंद्रातील दुगलगाव, देवळाणे, चिचोंडी केंद्रातील हनुमानवाडी, महालखेडा, पाटोदा, निमगाव मढ, गवंडगाव केंद्रातील सुरेगाव रस्ता, भायखेडे, गारखेडे, पाणलोटवस्ती, कुसमाडी केंद्रातील अनकाई बारी, धामोडे, कुसमाडी, नगरसूल केंद्रातील हडपसावरगाव, लहित, बटवलवस्ती, गाडेवस्ती, कोळगाव, नागडे केंद्रातील कोटमगाव बुद्रूक व खुर्द, वडगाव, राजापूर केंद्रातील सोमठाणजोश, खिर्डीसाठे, जायदरे, लमाणतांडा, हनुमाननगर, सावरगाव केंद्रातील आंबेवाडी, कासारखेडा, गोरेवस्ती, गोपाळवस्ती, सोमठाणदेश केंद्रातील लौकी, शिरसगाव, मुरमी, निळखेडे, महादेव मंदिर, विखरणी, गायके- बागुल वस्ती, जगतापवस्ती, यवला मराठी केंद्रातील रेल्वे स्टेशन (येवला) या ५३ शाळांचे एकूण एक लाख ५८ हजार ११४ रुपये वीजबि ल थकल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.शाळांसाठी व्यावसायिक दराने वीजपुरवठा केला जात असल्याने शाळा वीजबिल भरू शकली नसल्याचे कारण सांगितले जाते. तर या प्रश्नी वीज उपलब्ध करून देण्याची मागणी पालकांकडून केली जात असताना पर्यायी व्यवस्थेचा विचार करण्याची सूचना खुद्द शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संबंधिताना केली होती. मात्र, अद्यापही या शाळांमध्ये वीजपुरवठा सुरू झालेला नाही. सध्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्या तरी गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न आहे.

येवला तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये चौदाव्या किंवा पंधराव्या वित्त आयोग निधीतून सौर यंत्रणा बसविल्यास शाळांमध्ये वीज उपलब्ध होवून अध्यापनाचे काम सुरूळीत होईलच याबरोबरच वीज देयकांचा प्रश्नही राहणार नाही. जिल्हा परिषद मुख्य कायर्कारी अधिकारी यांना आपण या संदर्भात पत्र पाठवून याबाबत ग्रामपंचायतींना आपल्या स्तरावरून आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे.- प्रविण गायकवाड, सभापती, पंचायत समिती, येवला

टॅग्स :mahavitaranमहावितरणSchoolशाळा