शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तकात आत्मविश्वास देण्याचे सामर्थ :किशोर कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 01:22 IST

पुस्तकेही जीवनाला ध्येय आणि बळ देण्याबरोबरच आत्मविश्वास तसेच संकटांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य देतात. ग्रंथ हेच मित्र व गुरू असतात, असे प्रतिपादन अभिनेते किशोर कदम ऊर्फ कवी सौमित्र यांनी केले.

ठळक मुद्देसमग्र कुसुमाग्रज’मधून साहित्य आठवणींना उजाळा

नाशिक : पुस्तकेही जीवनाला ध्येय आणि बळ देण्याबरोबरच आत्मविश्वास तसेच संकटांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य देतात. ग्रंथ हेच मित्र व गुरू असतात, असे प्रतिपादन अभिनेते किशोर कदम ऊर्फ कवी सौमित्र यांनी केले.कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्र माच्या दशकपूर्तीनिमित्त आयोजित ‘वाचनाने घडवू जीवन’ या कार्यक्र मात मार्गदर्शन करताना कदम बोलत होते. यावेळी कदम यांनी माझ्यातील अभिनेता आणि कवी पुस्तकांच्या मैत्रीमुळे कसा विकसित झाला त्याचे अनुभव सांगितले. यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी जीवन जगण्याची कला वाचनासह विचारातूनच सुरू होत असल्याचे नमूद केले. आपल्या देशासाठी काही भव्यदिव्य करण्याचे ध्येय घेऊन उत्तुंग शिखराकडे वाटचाल करावी, असेही त्यांनी सांगितले. प्रख्यात मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी मिळतील तेवढी पुस्तके वाचणे आणि सभोवतालच्या माणसांचे अंतरंग समजून घेणे यातूनच खरे विश्व उलगडते, असे सांगितले. त्यांच्याशी सचिन उषा विलास जोशी यांनी संवाद साधला. पाहुण्यांचे स्वागत विनायक रानडे आणि विश्वास ठाकूर यांनी केले.कवी प्रकाश होळकर यांनी प्रास्ताविक, तर वास्तुविशारद संजय पाटील यांनी आभार मानले. त्याशिवाय बाल साहित्य संमेलनदेखील रंगले.उच्च साहित्यमूल्याला वास्तवाचे भानकुसुमाग्रज हे साहित्यातले दैवत होते. त्यांच्या लेखनातून समृद्ध झाले आणि जीवनाला ऊर्जा मिळाली. कुसुमाग्रजांचे साहित्य हे उच्च साहित्यमूल्य असलेले आणि वास्तवाचे भान असलेले होते, प्रतिपादन अभिनेते प्रदीप वेलणकर यांनी केले. ‘समग्र कुसुमाग्रज’ या परिसंवादाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्र मात वेलणकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रख्यात कवी आणि लेखक प्रवीण दवणे आणि विसुभाऊ बापट उपस्थित होते. त्यांच्याशी सदानंद जोशी यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना प्रवीण दवणे यांनी तात्यासाहेबांच्या सशक्त लेखणीतून मानवी जगण्याचे आणि व्यवहाराचे दर्शन घडल्याचे सांगितले, तर विसुभाऊ बापट यांनी कुसुमाग्रज हे साहित्यातील अमृत वृक्ष होते, असे सांगितले. यावेळी अभिनेत्री रजनी वेलणकर यांनी शिरवाडकर यांच्या नाटकातील मस्तानीचा प्रवेश सादर केला. याप्रसंगी नीलिमा पवार, दीपक करंजीकर, एन. सी. देशपांडे, विवेक गरुड, दत्तात्रय कोठावदे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक