शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

पुस्तकात आत्मविश्वास देण्याचे सामर्थ :किशोर कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 01:22 IST

पुस्तकेही जीवनाला ध्येय आणि बळ देण्याबरोबरच आत्मविश्वास तसेच संकटांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य देतात. ग्रंथ हेच मित्र व गुरू असतात, असे प्रतिपादन अभिनेते किशोर कदम ऊर्फ कवी सौमित्र यांनी केले.

ठळक मुद्देसमग्र कुसुमाग्रज’मधून साहित्य आठवणींना उजाळा

नाशिक : पुस्तकेही जीवनाला ध्येय आणि बळ देण्याबरोबरच आत्मविश्वास तसेच संकटांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य देतात. ग्रंथ हेच मित्र व गुरू असतात, असे प्रतिपादन अभिनेते किशोर कदम ऊर्फ कवी सौमित्र यांनी केले.कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्र माच्या दशकपूर्तीनिमित्त आयोजित ‘वाचनाने घडवू जीवन’ या कार्यक्र मात मार्गदर्शन करताना कदम बोलत होते. यावेळी कदम यांनी माझ्यातील अभिनेता आणि कवी पुस्तकांच्या मैत्रीमुळे कसा विकसित झाला त्याचे अनुभव सांगितले. यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी जीवन जगण्याची कला वाचनासह विचारातूनच सुरू होत असल्याचे नमूद केले. आपल्या देशासाठी काही भव्यदिव्य करण्याचे ध्येय घेऊन उत्तुंग शिखराकडे वाटचाल करावी, असेही त्यांनी सांगितले. प्रख्यात मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी मिळतील तेवढी पुस्तके वाचणे आणि सभोवतालच्या माणसांचे अंतरंग समजून घेणे यातूनच खरे विश्व उलगडते, असे सांगितले. त्यांच्याशी सचिन उषा विलास जोशी यांनी संवाद साधला. पाहुण्यांचे स्वागत विनायक रानडे आणि विश्वास ठाकूर यांनी केले.कवी प्रकाश होळकर यांनी प्रास्ताविक, तर वास्तुविशारद संजय पाटील यांनी आभार मानले. त्याशिवाय बाल साहित्य संमेलनदेखील रंगले.उच्च साहित्यमूल्याला वास्तवाचे भानकुसुमाग्रज हे साहित्यातले दैवत होते. त्यांच्या लेखनातून समृद्ध झाले आणि जीवनाला ऊर्जा मिळाली. कुसुमाग्रजांचे साहित्य हे उच्च साहित्यमूल्य असलेले आणि वास्तवाचे भान असलेले होते, प्रतिपादन अभिनेते प्रदीप वेलणकर यांनी केले. ‘समग्र कुसुमाग्रज’ या परिसंवादाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्र मात वेलणकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रख्यात कवी आणि लेखक प्रवीण दवणे आणि विसुभाऊ बापट उपस्थित होते. त्यांच्याशी सदानंद जोशी यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना प्रवीण दवणे यांनी तात्यासाहेबांच्या सशक्त लेखणीतून मानवी जगण्याचे आणि व्यवहाराचे दर्शन घडल्याचे सांगितले, तर विसुभाऊ बापट यांनी कुसुमाग्रज हे साहित्यातील अमृत वृक्ष होते, असे सांगितले. यावेळी अभिनेत्री रजनी वेलणकर यांनी शिरवाडकर यांच्या नाटकातील मस्तानीचा प्रवेश सादर केला. याप्रसंगी नीलिमा पवार, दीपक करंजीकर, एन. सी. देशपांडे, विवेक गरुड, दत्तात्रय कोठावदे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक