शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

रतन इंडिया औष्णिक प्रकल्पातून लवकरच वीजनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 01:55 IST

केंद्र सरकारचे एनटीपीसी पथक गेल्या तीन दिवसांपासून सिन्नर येथील रतन इंडिया प्रकल्प व परिसराची पाहणी करत आहे. रेल्वे, रस्ते मार्ग याद्वारे होणारी कोळसा वाहतूक ही सोईस्कर होणार असल्याने या प्रकल्पाबाबत त्यांनी अनुकूलता दर्शवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच रतन इंडिया प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत.

ठळक मुद्देशुभ संकेत : केंद्र सरकारच्या एनटीपीसी पथकाकडून तीन दिवस पाहणी

सिन्नर : केंद्र सरकारचे एनटीपीसी पथक गेल्या तीन दिवसांपासून सिन्नर येथील रतन इंडिया प्रकल्प व परिसराची पाहणी करत आहे. रेल्वे, रस्ते मार्ग याद्वारे होणारी कोळसा वाहतूक ही सोईस्कर होणार असल्याने या प्रकल्पाबाबत त्यांनी अनुकूलता दर्शवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच रतन इंडिया प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. ५४० मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात दोन वेळेस ऊर्जामंत्री, संबंधित विभागाच्या सचिव व इंडिया बुल्सच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील रतन इंडियाचा औष्णिक वीज प्रकल्प सुरू करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार माणिकराव कोकाटे यांनी १,३५० मेगावॅटचा औष्णिक वीज प्रकल्प सुरू झाला, तर या भागात रोजगाराच्या संधी वाढण्याबरोबरच २० किमी परिघातील शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा होऊ शकतो, अशी माहिती देत हा वीज प्रकल्प सुरू करण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाजनकोच्या अधिकाऱ्यांना या प्रकल्पातून वीजनिर्मिती करण्याच्या सूचना केल्या, तर महाजनको व महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या ऊर्जा विभागाकडे यात लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यानुसार केंद्र सरकारचे एनटीपीसी पथक गेल्या तीन दिवसांपासून सिन्नर येथील रतन इंडिया प्रकल्प व परिसराची पाहणी करत आहे. रेल्वे मार्ग, रस्ते मार्ग याद्वारे होणारी कोळसा वाहतूक ही सोईस्कर होणार असल्याने या प्रकल्पाबाबत अनुकूलता दर्शवीत त्यांनी केंद्र सरकारला तात्काळ अहवाल पाठवला आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री आर.के. सिंह यांनीही त्यासाठी सकारात्मकता दर्शविली आहे. प्रत्येकी २७० मेगावॅटचा एक, असे ५४० मेगावॅटचे दोन युनिट सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली. उर्वरित कामे होऊन महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारच्या एनटीपीसी विभागाच्या माध्यमातून वीजनिर्मिती होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

 

इन्फो

 

प्रकल्प मालकांची दूरस्थ प्रणालीद्वारे हजेरी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे झालेल्या बैठकीसाठी या प्रकल्पाचे मालक राजीव रतन हे दूरस्थ प्रणालीद्वारे हजर होते. त्यांनी हा प्रकल्प चालविण्याची आर्थिक क्षमता कंपनीची राहिली नसल्याने कोकाटे यांनी सुचविल्याप्रमाणे सरकारी भागीदारीत हा प्रकल्प सुरू करण्याची विनंती पवार यांच्याकडे केली होती. शिवाय रतन इंडियाचे अधिकारी राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोकाटे यांना या प्रकल्पातून वीजनिर्मिती होण्यामागील अडथळे सांगून त्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याचीही माहिती दिली होती. अखेर सर्वांच्या परिश्रमाची फलनिष्पत्ती झाली आहे.

इन्फो

 

२५ हजार रोजगार उपलब्ध होणार

 

सदर प्रकल्प सुरू झाल्यास पुरेशी वीज उपलब्ध होईल. त्यातून नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांतील विशे करून नाशिक जिल्ह्यातील कारखानदारी वाढीस लागेल. सिन्नर तालुक्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष, असे २५ हजार रोजगार उपलब्ध होतील. त्यामुळे बेरोजगारांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

 

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज