शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

पोल्ट्री व्यवसाय संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:56 IST

गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे नाशिकसह मोठ्या महानगरांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉयलर कोंबडीच्या मांसामध्ये चीनमधील कोरोना व्हायरसचा फैलाव होत असल्याच्या पोस्ट फोटोसह व्हायरल होत आहेत. या अपप्रचाराला शास्त्रीयदृष्ट्या कुठलाही आधार नसला तरीही मांसाहारी लोकांनी कोरोना विषाणूचा धसका घेतला आहे.

ठळक मुद्दे‘कोरोना’चा धसका : जिल्ह्यातील ३०० कोटीची उलाढाल धोक्यात

अमोल अहिरे ।जळगाव निंबायती : गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे नाशिकसह मोठ्या महानगरांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉयलर कोंबडीच्या मांसामध्ये चीनमधील कोरोना व्हायरसचा फैलाव होत असल्याच्या पोस्ट फोटोसह व्हायरल होत आहेत. या अपप्रचाराला शास्त्रीयदृष्ट्या कुठलाही आधार नसला तरीही मांसाहारी लोकांनी कोरोना विषाणूचा धसका घेतला आहे.याचा विपरित परिणाम होऊन जिल्ह्यात महिन्याला तीनशे कोटी रुपयांचा होणारा पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला आहे. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यातील चिकन विक्र ीमध्ये जवळपास ७० टक्के घट आढळून आली. शेजारच्या राज्यांमधून होणारी चिकनची मागणी ५० टक्क्यांपर्यंत कमी झाली. कोंबडीच्या एका अंड्याचे उत्पादन घेण्यासाठी ३ रुपये ९० पैसे खर्च येतो.मात्र सध्या मागणी घटल्याने अंड्याची विक्री ३ रुपयांपर्यंत होत आहे. त्यामुळे उत्पादकांना दररोज हजारो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा असलेल्या कुक्कुटपालन व्यवसायावर याचा विपरीत परिणाम होत आहे. येत्या काळात हे चित्र बदलले नाही तर पोल्ट्री व्यावसायिकांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले, असे चित्र सध्यातरी दिसत आहे.कोरोनाचा विषाणू पक्ष्यांच्या कच्च्या मांसापासून प्रसारित होत असल्याचा संशोधकांचा दावा आहे, मात्र देशभरात पूर्ण शिजविलेले मांस खाल्ले जात असल्याने त्यात कुठल्याही प्रकारचा विषाणू असण्याची शक्यता जवळपास नाही. असे असतानाही लोक खोट्या अफवेवर विश्वास ठेवून कोरोना विषाणूच्या संकटाने भयभीत झाले आहेत.जनजागृती करण्याची मागणीशेतीपूरक व्यवसाय म्हणून ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुण पोल्ट्री व्यवसायाकडे वळाले होते, लाखो रुपयांचे बँकेचे कर्ज घेऊन व्यवसाय उभा केला होता, मात्र तोही व्यवसाय आता संकटात सापडला आहे. याची शासनाने तातडीने गंभीरपणे दखल घ्यावी व राज्यातील पशुवैद्यकीय कुक्कुटपालन खात्यामार्फत जनजागृती करुन पोल्ट्री व्यावसायिकांना प्रोत्साहन द्यायला हवे, अशी मागणी परिसरातील कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी केली आहे.कुक्कुटपालन व्यवसायासाठी दरवर्षी जानेवारी ते एप्रिल हा काळ मंदीचा मानला जातो. त्यातच कोरोना विषाणूच्या चुकीच्या अफवेमुळे पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला आहे. काही वर्षांपूर्वी बर्ड फ्लू या आजारामुळे कुक्कुटपालन व्यवसाय संकटात सापडला होता, त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने वेळीच दखल घेऊन पोल्ट्री व्यावसायिकांना आर्थिक मदत द्यावी. - शशी ढोणे, पोल्ट्री व्यावसायिक, जळगाव निंबायतीगेल्या आठवडाभरापासून कोरोना विषाणूच्या अफवेमुळे चिकनची मागणी ५० ते ६० टक्कांपर्यंत कमी झाली आहे यामुळे चढ्या दराने बॉयलर कोंबड्यांच्या खरेदी केलेल्या मालाचे आता काय करायचं असा प्रश्न पडला आहे, यामुळे फार मोठा आर्थिक फटका बसला आहे. मांसाहारी लोक आता बोकडाच्या मांसाला पसंती देत असल्याने पुढील काळात मटणाचे भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.- अशरफ शेख,विक्रेता जळगाव निंबायती.

टॅग्स :businessव्यवसायHealthआरोग्य