शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

‘कुंभार सशक्तीकरण मिशन’ : विजेच्या चाकावर कुंभारकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:15 IST

केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या सहयोगाने ‘कुंभार सशक्तीकरण मिशन’ अंतर्गत दहादिवसीय कुंभार काम कला प्रशिक्षणाचा शुभारंभ खादी ग्रामोद्योग आयोगाच्या त्र्यंबक विद्या मंदिर येथे करण्यात आला.

नाशिक : केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या सहयोगाने ‘कुंभार सशक्तीकरण मिशन’ अंतर्गत दहादिवसीय कुंभार काम कला प्रशिक्षणाचा शुभारंभ खादी ग्रामोद्योग आयोगाच्या त्र्यंबक विद्या मंदिर येथे करण्यात आला. शिबिराचे उद्घाटन माती कला बोर्डाचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्तात्रय कुंभार आणि खादी ग्रामोद्योग कार्यालयाचे कार्यकारी अधिकारी राजीव खन्ना यांच्या हस्ते करण्यात आले.महाराष्ट्रातील कुंभार व्यावसायिक कौशल्यपूर्ण काम करीत असले तरी आजही बहुतेक व्यावसायिक पारंपरिक पद्धतीने आणि कोणत्याही यंत्रसामग्रीचा वापर न करता हातानेच कुंभार काम करीत असतात. पारंपरिक पद्धतीमुळे मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी होत असल्याने कुंभार व्यावसायिकांना म्हणावा तसा आर्थिक लाभ होत नाही. ही समस्या लक्षात घेऊन केंद्र शासनाने शासनाने विजेच्या चाकावर कुंभार कलेचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. या मोहिमेअंतर्गत प्रशिक्षणात ४० कुंभार व्यावसायिक सहभागी झाले आहेत.या आधुनिक यांत्रिक पद्धतीमुळे कुंभार समाजातील तरुण पिढी पुन्हा एकदा पारंपरिक व्यवसायाकडे वळेल यामुळे समाजापुढील बेरोजगारीच्या समस्येवर उपाय निघू शकेल. शिवाय सध्या गुजरात राज्यातून यांत्रिकीकरणामुळे निर्माण झालेल्या व्यावसायिक स्पर्धेला तोंड देता येईल, असे जाणकारांचे मत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक प्रशिक्षणार्थीला भविष्यात व्यवसाय सक्षमपणे करता यावा यासाठी १८ हजार रुपये किमतीचे विजेवरील कुंभारी चाक सवलतीत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर वीस कुंभारांच्या एका गटाला माती मळण्याचे यंत्रही सवलतीत देण्यात येणार आहे. यावेळी मोहनराव जगदाळे, रंगनाथ सूर्यवंशी, राजेंद्र सावंदे, मनोहर जाधव, ज्ञानेश्वर भागवत, कृष्णा सोनवणे, तुषार गारे, नवनाथ जाधव, किरण शिकारे, पप्पू रसाळ, अरुण भागवत, संतोष सोनवणे, गोरख आहेर आदी उपस्थित होते.कुंभार कामातील राष्ट्रीय पुरस्कार विजेते लक्ष्मण बोरसरे आणि सतीश बोरसरे हे शिबिरार्थींना विजेवर चालणाऱ्या कुंभारी चाकावर विविध उत्पादने बनविण्याचे प्रशिक्षण देत आहेत. या प्रशिक्षणार्थींमध्ये दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले साठ वर्षे वयाचे कुंभार कारागीर येवला तालुक्यातील माधवराव शिरसाठ हेदेखील सहभागी झाले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार