शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कुक्कुट पालनाला आला ‘ताप’

By admin | Updated: April 2, 2016 23:16 IST

तडाखा : उष्णतेमुळे पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले; ८० टक्के पोल्ट्रीशेड ओस

शैलेश कर्पे  सिन्नरतपमानात वाढ झाल्याने त्याचा विपरीत परिणाम कुक्कुटपालन व्यवसायावर होऊ लागला आहे. वाढत्या उष्म्यामुळे पक्षी दगावण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. कुक्कुट पालन व्यवसाय करण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. टंचाईमुळे अनेक पोल्ट्री शेड ओस पडले आहेत. त्यामुळे कुक्कुट पालन व्यवसाय धोक्यात आल्याचे चित्र आहे.तालुक्यातील पांगरी येथे सुमारे चारशेच्या वर पोल्ट्रीशेड आहेत. मात्र त्यातील ८० टक्के शेड पाणीटंचाईमुळे रिकामे पडून आहेत. वाढत्या उष्म्याने उत्पादनात घट आल्याने बाजारात चिकनचे भाव वाढले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात दूध, अंडी व चिकनच्या उत्पादनात घट येते. सध्या वातावरणात उष्म्याचे प्रमाण वाढल्याने पक्ष्यांच्या मरतुकीत वाढ होत आहे. उत्पादनात उन्हाळ्यात घट येत असल्याने पोल्ट्रीधारक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पूर्वी या व्यवसायाला शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुय्यम दर्जा होता. कोणी गावठी कोंबड्या तर कोणी गायी-म्हशी पाळून शेतीला पूरक व्यवसाय करीत होते. तथापि, यामध्ये व्यावसायिकता वाढू लागल्याने या पूरक व दुय्यम दर्जाचे व्यवसाय अनेक शेतकऱ्यांचे मुख्य साधन बनले असल्याचे चित्र आहे.शेतातील पिकांतून शेतकऱ्यांच्या हातात पैसा मिळत नाही. त्यावेळी पूरक व्यवसायातूनच शेतीत भांडवल टाकून शेती उभी करावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक शेतकरी व्यापारी दृष्टिकोणातून त्याकडे पाहू लागले आहेत. वेगवेगळ्या जातीचे पक्षी बाजारात उपलब्ध होत आहेत. कमी कालावधीत पक्ष्यांची वाढ होत असल्याने जास्तीत जास्त ४० दिवसात पक्षी विक्रीसाठी तयार होत असतात. अनेक कंपन्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करून करार पद्धतीने पोल्ट्री व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेत जाऊन कोंबड्या विक्रीचा प्रश्न मिटला आहे. सध्या शेतकऱ्यांना केवळ पक्षी सांभाळावे लागत आहेत.ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पोल्ट्रीफार्म उभारले आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे किमान तीन ते पाच हजार पक्षी क्षमतेचे शेड आहेत. काही शेतकरी कर्ज काढून हा व्यवसाय करीत आहेत. पोल्ट्रीसाठी लागणारी पिल्ले, औषधे, खाद्याचा पुरवठा कंपनी करीत असतात. त्यांच्यावर देखरेखीसाठी खास कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात येते. तयार झालेल्या कोंबड्या कंपन्या घेऊन जात असल्याने शेतकऱ्यांना कोंबड्या बाजारात घेऊन जाण्याची तसदी होत नाहीच परंतु मार्केटिंग करण्याचीही गरज राहिलेली नाही. या व्यवसायात सध्या व्यावसायिकांना पाणीटंचाई, बदलते वातावरण, विविध रोगांचा प्रतिकार करण्याची होणारी धावपळ व अपेक्षित दिवसांत पक्ष्यांचे न वाढणारे वजन या कारणांनी सिन्नर तालुक्यातील पोल्ट्रीधारकांची संख्या कमी होऊ लागल्याचे चित्र आहे. तालुक्यात सर्वात जास्त पोल्ट्रीफार्म पांगरी येथे होते. परंतु उत्पादनात येणारी घट पाहून अनेक शेतकऱ्यांनी हा व्यवसाय बंद केल्याचे चित्र आहे. दरम्यान, उन्हाळ्यात विशेषत: एप्रिल व मे महिन्यात पक्षी दगावण्याची संख्या वाढते. त्यामुळे अनेक शेतकरी पोल्ट्रीफार्ममध्ये पक्षी ठेवत नाही. ज्यांनी पक्षी ठेवले त्यांना हे पक्षी वाढविणे आव्हानात्मक काम असून, पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने शेतकऱ्यांंचे नुकसान होत आहे. मात्र एप्रिल ते जूनमध्ये बाजारात चिकनचा पुरवठा कमी व मागणी वाढते त्यामुळे चांगली किंमत मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांची सध्या धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)