शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

नाशिक-पुणे महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

By admin | Updated: November 25, 2015 23:01 IST

अपघातांना निमंत्रण : नांदूरशिंगोटे परिसरात सर्वाधिक दुरवस्था; दुरुस्तीची मागणी

नांदूरशिंगोटे : नाशिक-पुणे या ५० क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर सिन्नर ते संगमनेरदरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने महामार्ग धोकादायक बनला आहे. या रस्त्यावर अक्षरश: खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्तादुरुस्तीची अनेकदा मागणी करूनही राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेषत: नांदूरशिंगोटे परिसरात नाशिक-पुणे महामार्गाची अक्षरश: चाळण झाल्याचे चित्र आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बेमोसमी पावसाने या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून त्यांचा आकार मोठा झाला आहे. अनेक ठिकाणी मोठे खड्डे तयार झाल्याने ते अपघाताना निमंत्रण देणारे ठरू लागले आहेत. या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास परिसरातील दोडीपासून प्रारंभ झाला आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पावसामुळे महामार्गाची जणू चाळण झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यात महामार्गावर खड्डे पडतात. विशेष म्हणजे हा महामार्ग पुण्यापासून थेट नांदूरशिंगोटेजवळील एक किलोमीटरपर्यंत सुस्थितीत आहे. मात्र तेथून पुढे नाशिककडील रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. पावसाने खड्ड्यांच्या संख्येत वाढ झाल्याने रस्त्याची आणखीच दुरवस्था झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. येथील निमोण नाका व चास नाका येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने ग्रामस्थ, शाळकरी मुले, व्यापारी व वाहनचालकांचे हाल होत आहेत. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होतात. खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात होण्याच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत व घडत आहे; मात्र रस्ता दुरुस्तीकडे अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे.राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय कार्यालय संगमनेर येथे असून, नाशिक अथवा पुण्याकडून येणारे अधिकारी याच मार्गाने प्रवास करतात. या रस्त्याने मालवाहतूक करणारे ट्रक, प्रवासी वाहने, खासगी बस, राज्य परिवहन विभागाच्या बसेस, पर्यटकांचे खासगी वाहने व दुचाकी यांची संख्या लक्षणीय असून, महामार्ग रात्रंदिवस सुरू असतो. नांदूरशिंगोटे येथे सिन्नर बाजार समितीचा उपबाजार आवार असून, येथे सोमवारी व शुक्रवारी बाजारासाठी गर्दी होते. कांद्याचे मालट्रक भरून देशात विविध ठिकाणी पाठविण्यात येतात. मात्र खड्ड्यांमुळे अवजड वाहनांचे मोठे नुकसान होत असल्याने वाहनचालक माल घेऊन जाण्यास नकार देतात. त्यामुळे व्यापारीही अडचणीत येत आहेत.चास व निमोण रस्त्याची काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. नांदूरशिंगोटे गावास चोहोबाजूने जोडणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य दीपक बर्के, रवींद्र शेळके, गोपाळ शेळके, श्रीकांत वाघचौरे, भारत दराडे, संजय शेळके, मंगेश शेळके, संदीप शेळके, रामदास सानप, सुदाम आव्हाड, दत्ता सानप, राजेंद्र दराडे, संजय आव्हाड यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)