शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
2
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
3
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
4
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
5
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
6
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
7
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
8
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
9
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
10
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
11
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
12
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
13
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
14
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
15
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
16
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
17
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
18
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
19
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
20
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'संभाव्य पाणीटंचाईचे नाशिकमध्ये गावपातळीवर ‘मायक्रो प्लॅनिंग’ हवे'

By अझहर शेख | Updated: April 8, 2023 14:24 IST

पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आदेश

नाशिक : ‘अल निनो’च्या प्रभावामुळे जलसाठे वेगाने खालावण्याची श्यक्यता हवमान खात्याने वर्तविली आहे. यामुळे जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई भासू शकते. याबाबत जिल्हा प्रशासनाने आतापासूनच त्या परिस्थितीविषयीचे प्रत्येक गावपातळीवर ‘मायक्रो प्लॅनिंग’ करावे, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. पिण्याच्या पाण्याला अधिकाधिक प्राधान्य दिले जावे. शहरासह जिल्ह्यातील गावांमध्येही पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आतापासूनच जनप्रबोधनावर भर द्यावा, अशी सुचनाही त्यांनी यावेळी बैठकीत केली.

शनिवारी (दि.८) दादा भुसे हे नाशिक शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळी सकाळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्हा प्रशासन, महापालिका, जिल्हा परिषद, जलसंपदा विभागाच्या विविध अधिकाऱ्यांसोबत संभाव्य पाणीटंचाईबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी दादा भुसे म्हणाले, पाणी टंचाईचे नियोजन करताना ते गावपातळीवरचे असावे. यासाठी ग्रामपंचायत सदस्यांपासून तर खासदारांसह सर्व लोकप्रतिनिधींना प्रशासनाने विश्वासात घ्यावे. त्या माध्यमातून नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन करण्यात यावे. त्याचप्रमाणे ज्या भागातील पाणी पुरवठा योजनांची कामे अंतीम टप्प्यात पोहचलेली आहेत, ती कामे तातडीने पूर्ण करावे, अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली. त्यासाठी सर्व प्रांताधिकारी यांनी संबंधित विभागांच्या स्थानिक पातळीवर बैठका घेवून आवश्यकेनुसार नियोजन करण्याचे आदेश दिले. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उपवनसंरक्षक पंकज गर्ग, उमेश वावरे, अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा कृषी अधिक्षक विवेक सोनवणे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते यांच्यासह विविध प्रमुख अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी डॉ. पुलकुंडवार, डॉ. गुंडे व शिंदे यांनी पाणी टंचाईबाबत केलेल्या नियोजनाची माहिती दृकश्राव्य यंत्राद्वारे सादर केली.

जंगलातील पाणवठे कोरडेठाक नको!माणसांसह वन्यप्राण्यांच्याही पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यावर भर द्यावा. वनविभागाने यासाठी त्यांच्या वनक्षेत्रातील वनतळ्यांची तातडीने दुरूस्ती करावी, तसेच सर्व पाणवठे अद्ययावत करुन आवश्यकतेनुसार नव्याने काही पाणवठे तयार करावेत, मात्र हे पाणवठे कोरडेठाक राहणार नाही, याची काळजी घ्यावी, संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तशा सुचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन कराव्यात, असही दादा भुसे म्हणाले. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे, याचा विसर प्रशासनाने पडू देऊ नये.

अधिकाऱ्यांनी ‘फिल्ड’ दौरा करावाजिल्ह्यात टंचाई काळात गावपातळीवर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लोकांच्या हाताला काम मिळेल, यासाठी आतापासूनच प्रयत्न करायला हवेत. यासाठी अधिकारी यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जावून पाहणी करावी. तसेच नादुरूस्त कुपनलिकांची कामे ‘मिशन मोड’वर घेवून तातडीने दुरूस्त करत कुपनलिका अद्ययावत कराव्यात. शहरासह ग्रामिण भागात पाण्याचा अपव्यव होणार नाही यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर अधिकाधिक भर आतापासून द्यायला हवात, अशी सुचनाही त्यांनी केली.

टॅग्स :Nashikनाशिक