शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

कांदे नव्हे, बटाटे महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 00:20 IST

सायखेडा : ग्रामीण भागातील गावागावात भरणाऱ्या आठवडे बाजारात भाज्यांचे भाव गडगडले असून, शेतकऱ्यांना भाज्या मातीमोल भावात विक्री कराव्या लागत ...

ठळक मुद्देभाजीपाला गडगडला : आठवडे बाजारात भाज्या मातीमोल

सायखेडा : ग्रामीण भागातील गावागावात भरणाऱ्या आठवडे बाजारात भाज्यांचे भाव गडगडले असून, शेतकऱ्यांना भाज्या मातीमोल भावात विक्री कराव्या लागत आहेत . सद्या केवळ बटाटे ५० रुपये किलो दराने विक्री होत असल्यामुळे बटाट्याचे महत्त्व वाढले आहे. कांद्याच्या भावापेक्षा दुप्पट भाव बटाट्याला मिळत असल्यामुळे कांद्यापेक्षा बटाटे अनेक वर्षांनंतर महाग झाले आहेत.

ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस पडला होता, तेव्हा शेतीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे डिसेंबर महिन्यात भाजीपाल्याला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र सोयाबीन, मका आणि खरीप हंगामातील पिके काढल्यावर सर्वच शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केली, जे शेतकरी कधीच भाजीपाला करत नव्हते. त्यांनीसुद्धा भाजीपाला लागवड केली, त्यामुळे पिकांचे क्षेत्र वाढले शिवाय कांदा रोपांची टंचाई निर्माण झाल्यामुळे शेतात काय लागवड करावी, असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून भाजीपाला लागवड केली. भाजीपाल्याच्या क्षेत्रात वाढ झाली. त्याचा फटका आज नगदी पिकाला बसत आहे.

पालेभाज्या कोणत्याही घेतल्यातरी अवघ्या पाच रुपये दरात इतकी स्वस्त जुडी मिळते, कोथिंबीर, शेपू, मेथी, पालक ५ रुपये जुडी तर वेलवर्गीय पालेभाज्या अवघ्या १० रुपये प्रतिकिलो दराने विकत आहेत. बटाटे आणि लसूण मात्र चांगला भाव खात आहे. ही दोन्ही पिके सध्या दुसऱ्या राज्यातून येत आहे. येणारा सर्व बटाटा आणि लसूण दुसऱ्या भागातून येत असल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा सर्व शेतमाल बेभावात विक्री करावा लागत आहे.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला कवडीमोल भावात विकला जात आहे. त्यामुळे आठवडे बाजारात किरकोळ विक्री केल्यास चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र आठवडे बाजारातदेखील भाजीपाला कवडीमोल भावात विक्री होत असल्यामुळे खर्चदेखील वसूल होत नाही.

- युवराज कोटकर, शेतकरी, करंजगाव

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती