नाशिक : पावसाने ओढ दिल्याने पालिकेतही चिंता व्यक्त केली जात असून, येत्या काही दिवसांत पाऊस न पडल्यास पाणीकपातीचा विचार करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.गेल्या वर्षीही महापालिकेला एकवेळ पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. यंदा जुलै महिन्यापर्यंत पाणीपुरवठा होईल इतका साठा गंगापूर धरणात आहे. परंतु पावसाने ओढ दिल्याने धरणातील साठा पुरेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात प्रशासन लवकरच निर्णय घेणार आहे. (प्रतिनिधी)