नाशिक : स्थायी समितीच्या सात सदस्यांच्या निवडीसाठी येत्या ५ तारखेला बोलावलेली महासभा तहकूब होण्यची शक्यता आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे महासभा तहकूब होण्याची शक्यता आहे. अर्थात, निवडप्रक्रियेसाठी बोलावण्यात येत असलेली महासभा तहकूब करता येते किंवा नाही याबाबत कायदेशीर पडताळणी सुरू असल्याचे वृत्त आहे. स्थायी समितीत एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार्या मनसेच्या चार सदस्यांचे, तर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या तीन सदस्यांचे राजीनामे पक्षाने घेतले आहेत. त्यांचा जागी नूतन सदस्य नियुक्त करण्यासाठी ५ जून रोजी सकाळी ११.३० वाजता विशेष महासभा बोलावण्यात आली आहे; परंतु मुंडे यांच्या निधनामुळे तीन दिवसांचा राष्टÑीय दुखवटा असल्याने ही सभा होते किंवा नाही याविषयी साशंकता आहे. माथाडी कामगारांचा आज विधान भवनावर मोर्चा नाशिक : नाशिक जिल्ह्यातील माथाडी-मापारी कामगारांच्या मजुरीवरील लेव्ही वसुलीसह विविध प्रश्नांसंदर्भात राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने उद्या मुंबई येथील विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सदरच्या मोर्चामध्ये नाशिकसह नगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा, कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांतील माथाडी कामगार सहभागी होणार आहेत. यामुळे माथाडी कामगारांनी कामे बंद ठेवून मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आमदार नरेंद्र पाटील, शशिकांत शिंदे, गुलाबराव जगताप यांनी केले आहे.
विशेष महासभा तहकूब होण्याची शक्यता
By admin | Updated: June 4, 2014 00:54 IST