शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीसाठी  सक्तीने जमीन संपादनाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 01:52 IST

राज्य शासनाने २०१३ मधील भूसंपादन कायद्यातील काही तरतुदींमध्ये सुचविलेल्या दुरुस्तीस राष्टपतींनी मान्यता दिल्यामुळे पुढील आठवड्यात त्याबाबतचे अध्यादेश काढण्यात येणार आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी सक्तीने अधिग्रहित करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक : राज्य शासनाने २०१३ मधील भूसंपादन कायद्यातील काही तरतुदींमध्ये सुचविलेल्या दुरुस्तीस राष्टपतींनी मान्यता दिल्यामुळे पुढील आठवड्यात त्याबाबतचे अध्यादेश काढण्यात येणार आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी सक्तीने अधिग्रहित करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यभरातील दहा जिल्ह्यांमधील समृद्धी प्रकल्पाची उर्वरित जमीन अधिग्रहण याच कायद्याच्या आधारे होणार आहे.या नव्या अध्यादेशामुळे शेतकºयांना पाचपटीऐवजी चारपटच म्हणजे २५ टक्के कमी मोबदला मिळणार आहे, तर ७० टक्के शेतकºयांच्या संमतीची आवश्यकता नसल्याने प्रशासनाची आता भूसंपादनाची चिंता मिटणार आहे. नागपूर ते मुंबई हा ७१० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग राज्यातील दहा जिल्ह्यांमधून जातो. प्रकल्पासाठी प्रथम लँड पुलिंग पद्धतीने होणाºया भूसंपादनास नाशिक, ठाणे, औरंगाबादसह पाच जिल्ह्यांमध्ये विरोध झाला. त्यावर राज्य शासनाने थेट  खरेदीने जमीन संपादित केली. बाजारभावाच्या पाचपट दर शेतकºयांना देण्यात आले. तरीही जिल्ह्णातील सिन्नरमधील शिवडे व डुबेरेसह राज्यातील सुमारे २५ ते ३० गावांमधील संयुक्त मोजणीस विरोध सुरूच असल्याने ते काम अद्यापही रखडले आहे. जमीन अधिग्रहणाला होणारा विरोध पाहून आता सरकारने थेट भूसंपादन कायद्यात आवश्यक ते बदल केले. दुरु स्तीसह या कायद्यातील बदलास राष्ट्रपतींचीही मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता समृद्धीसाठी जमीन देण्यास विरोध करणाºयांच्या जमिनी थेट भूसंपादन कायद्यानुसारच परंतु प्रसंगी सक्तीने संपादन केल्या जातील.यामुळे आता शेतकºयांनी याविरोधात न्यायालयातही तक्र ार केल्यास बाधितांच्या नुकसानभरपाईची रक्कम न्यायालयात जमा करून प्रकल्पाचे काम पूर्ण करणे यंत्रणेस शक्य होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, रखडलेल्या जमिनीच्या मोजणीचा प्रस्ताव पुढील आठवड्यात सरकारकडे दिला जाणार आहे. त्यानंतर राज्यस्तरावरून सर्वच जिल्ह्णांतील जमीन अधिग्रहणाची अधिसूचना एकत्रित काढली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.नाशिकमध्ये ७०५ हेक्टर संपादननाशिकमधील सिन्नर व इगतपुरी या दोन तालुक्यांमधील ४९ गावांमधील जमीन समृद्धी  प्रकल्पासाठी अधिग्रहित केली जात आहे. एकूण १२८० हेक्टर जमीन  प्रकल्पासाठी लागणार आहे. यातील ११५० हेक्टर जमीन खासगी असून, इतर क्षेत्र  हे वनविभागाच्या अखत्यारित येत आहे. आजमितीस खासगी व सरकारी मिळून  एकूण ७०५ हेक्टर म्हणजे ६८ टक्के जमीन अधिग्रहित झाली आहे. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग