शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

समृद्धीसाठी  सक्तीने जमीन संपादनाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 01:52 IST

राज्य शासनाने २०१३ मधील भूसंपादन कायद्यातील काही तरतुदींमध्ये सुचविलेल्या दुरुस्तीस राष्टपतींनी मान्यता दिल्यामुळे पुढील आठवड्यात त्याबाबतचे अध्यादेश काढण्यात येणार आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी सक्तीने अधिग्रहित करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक : राज्य शासनाने २०१३ मधील भूसंपादन कायद्यातील काही तरतुदींमध्ये सुचविलेल्या दुरुस्तीस राष्टपतींनी मान्यता दिल्यामुळे पुढील आठवड्यात त्याबाबतचे अध्यादेश काढण्यात येणार आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी सक्तीने अधिग्रहित करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यभरातील दहा जिल्ह्यांमधील समृद्धी प्रकल्पाची उर्वरित जमीन अधिग्रहण याच कायद्याच्या आधारे होणार आहे.या नव्या अध्यादेशामुळे शेतकºयांना पाचपटीऐवजी चारपटच म्हणजे २५ टक्के कमी मोबदला मिळणार आहे, तर ७० टक्के शेतकºयांच्या संमतीची आवश्यकता नसल्याने प्रशासनाची आता भूसंपादनाची चिंता मिटणार आहे. नागपूर ते मुंबई हा ७१० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग राज्यातील दहा जिल्ह्यांमधून जातो. प्रकल्पासाठी प्रथम लँड पुलिंग पद्धतीने होणाºया भूसंपादनास नाशिक, ठाणे, औरंगाबादसह पाच जिल्ह्यांमध्ये विरोध झाला. त्यावर राज्य शासनाने थेट  खरेदीने जमीन संपादित केली. बाजारभावाच्या पाचपट दर शेतकºयांना देण्यात आले. तरीही जिल्ह्णातील सिन्नरमधील शिवडे व डुबेरेसह राज्यातील सुमारे २५ ते ३० गावांमधील संयुक्त मोजणीस विरोध सुरूच असल्याने ते काम अद्यापही रखडले आहे. जमीन अधिग्रहणाला होणारा विरोध पाहून आता सरकारने थेट भूसंपादन कायद्यात आवश्यक ते बदल केले. दुरु स्तीसह या कायद्यातील बदलास राष्ट्रपतींचीही मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता समृद्धीसाठी जमीन देण्यास विरोध करणाºयांच्या जमिनी थेट भूसंपादन कायद्यानुसारच परंतु प्रसंगी सक्तीने संपादन केल्या जातील.यामुळे आता शेतकºयांनी याविरोधात न्यायालयातही तक्र ार केल्यास बाधितांच्या नुकसानभरपाईची रक्कम न्यायालयात जमा करून प्रकल्पाचे काम पूर्ण करणे यंत्रणेस शक्य होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, रखडलेल्या जमिनीच्या मोजणीचा प्रस्ताव पुढील आठवड्यात सरकारकडे दिला जाणार आहे. त्यानंतर राज्यस्तरावरून सर्वच जिल्ह्णांतील जमीन अधिग्रहणाची अधिसूचना एकत्रित काढली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.नाशिकमध्ये ७०५ हेक्टर संपादननाशिकमधील सिन्नर व इगतपुरी या दोन तालुक्यांमधील ४९ गावांमधील जमीन समृद्धी  प्रकल्पासाठी अधिग्रहित केली जात आहे. एकूण १२८० हेक्टर जमीन  प्रकल्पासाठी लागणार आहे. यातील ११५० हेक्टर जमीन खासगी असून, इतर क्षेत्र  हे वनविभागाच्या अखत्यारित येत आहे. आजमितीस खासगी व सरकारी मिळून  एकूण ७०५ हेक्टर म्हणजे ६८ टक्के जमीन अधिग्रहित झाली आहे. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग