शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

बंद पडलेल्या कारखान्याचे भुखंड धनदांडग्यांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 19:03 IST

नाशिकला मोठे उद्योग यावेत म्हणून औद्योगिक संघटनांकडून शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे. मात्र ही मागणी करताना येऊ इच्छिणाऱ्या उद्योगांना लागणा-या जागेचे काय? असा प्रश्न आहेच. औद्योगिक क्षेत्रात जागाच शिल्लक नसल्याने

ठळक मुद्देजागा विनावापर पडून : नवीन कारखान्यांना मात्र प्रतीक्षाअसंख्य लघु उद्योजक भाडेतत्त्वावर गाळा घेऊन वर्षानुवर्षे उद्योग व्यवसाय करीत आहेत

नाशिक : सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या मोठ्या कारखान्यांची जागा बिल्डर्स लॉबीने घेऊन ठेवलेल्याने अशा जागा विनावापर पडून असून, अशा जागा औद्योगिक विकास महामंडळाने ताब्यात घेऊन त्या मोठ्या, लघु उद्योगांना उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बंद कारखान्यांची जागा ताब्यात घेण्यास कायदेशीर अडचणी येत असल्याने प्रस्तावित औद्योगिक धोरणात तसा कायदा करण्याचा पर्यायही सुचविण्यात आला आहे.नाशिकला मोठे उद्योग यावेत म्हणून औद्योगिक संघटनांकडून शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे. मात्र ही मागणी करताना येऊ इच्छिणाऱ्या उद्योगांना लागणाºया जागेचे काय? असा प्रश्न आहेच. औद्योगिक क्षेत्रात जागाच शिल्लक नसल्याने उद्योग येऊ घातले तरी त्यांना जागा कशी उपलब्ध करून द्यावी, हा प्रश्न भेडसावित आहे. औद्योगिक विकास महामंडळाकडून उद्योग उभारणीसाठी भूखंड घेताना तीन वर्षांत त्यावर उद्योग उभारून प्रत्यक्ष उत्पादन सुरू करणे आवश्यक आहे असा नियम आहे. परंतु अनेकांनी उद्योग सुरू करण्याच्या नावाखाली भूखंड घेऊन ठेवत गुंतवणूक करून ठेवली आहे. मागील काही महिन्यांपासून एमआयडीसीने कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू केल्याने ज्यांनी उद्योग सुरू केलेले नाहीत त्यांच्या ताब्यातील भूखंड परत घेण्यास सुरुवात केली आहे.बॅँकांचे थकलेले कर्ज, भागीदारीतील वाद, चुकीचे व्यवस्थापन, कामगार कलह, उत्पादनाच्या मागणीत घट, जुने तंत्रज्ञान, कौटुंबिक वादविवाद यासह अनेक बाबींमुळे सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीत अनेक लहान, मोठे उद्योग गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी बंद पडलेले आहेत. यातील काही कारखान्यांची जागा बिल्डर्स किंवा धनदांडग्यांनी घेऊन त्यात पैसे गुंतवून ठेवले आहेत. वास्तविक पाहता जागा घेऊन त्यावर उद्योग उभारणे आवश्यक होते. त्यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार मिळू शकला असता. आता धनदांडग्यांनी जागा घेऊन ठेवल्याने हे भूखंड अनुत्पादक झालेले आहेत. त्यामुळे ज्यांना खरोखर उद्योगासाठी जागेची गरज आहे. त्यांना जागा मिळत नाही. परिणामी असंख्य लघु उद्योजक भाडेतत्त्वावर गाळा घेऊन वर्षानुवर्षे उद्योग व्यवसाय करीत आहेत. त्यांनाही उद्योग विस्तारासाठी अतिरिक्त जागेची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Indu Malhotraइंदू मल्होत्राNashikनाशिक