शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

नांदूरशिंगोटे-वावी रस्त्यावरील फरशी पुलाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 01:19 IST

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे ते वावी रस्त्यावरील फरशी पुलाची काही वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. सदर फरशी पुलाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी व वाहनचालकांनी केली आहे.

नांदूरशिंगोटे :  सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे ते वावी रस्त्यावरील फरशी पुलाची काही वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. सदर फरशी पुलाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी व वाहनचालकांनी केली आहे.सिन्नर, संगमनेर, अकोला, कोपरगाव व येवला या पाच तालुक्यांंना जोडणारा नांदूरशिंगोटे ते वावी हा महत्त्वाचा रस्ता आहे, तसेच शिर्डी येथे जाण्यासाठी भाविक याच पर्यायी मार्गाचा वापर करतात. गतवर्षीच सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. दळणवळणाच्या दृष्टीने जवळचा रस्ता असल्याने अवजड वाहनांची वर्दळही अलिकडच्या काळात वाढली आहे. त्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. नांदूरशिंगोटे ते वावी, तसेच कणकोरी फाटा ते निऱ्हाळे गावापर्यंत अनेक ठिकाणी नदीवरून फरशी पूल टाकण्यात आले आहेत, परंतु रस्त्यांचे डांबरीकरण करण्याआधी त्यांची उंची वाढविण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांची संख्या वाढल्याने वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पूर्व भागातील मऱ्हळ, निऱ्हाळे-फत्तेपूर, कणकोरी, मानोरी, नांदूरशिंगोटे आदी गावांतून जामनदी वाहत असून, यावर अनेक ठिकाणी फरशी पूल आहेत. नदीवरील पावसाचे पाणी वाहत असल्याने पाण्यात वाळू वाहत येऊन फरशी खालील सिंमेट पाईप वाळूने बंद झाले आहे. त्यामुळे पाणी फरशीवरून वाहत आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशी वाहनचालकांना, तसेच ग्रामस्थांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात परिसरातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, प्रवाशी, महिला वर्गाची चांगलीच तारांबळ उडते. गतवर्षी परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने जामनदी तब्बल तीन ते चार महिने दुथडी भरून वाहत होती. निऱ्हाळे येथील कामगाराला नदीवरील पाण्याचा अंदाज न आल्याने आपला प्राण गमवावा लागला होता. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात फरशी पुलाची समस्या निर्माण होते, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी त्याकडे लक्ष देत नसल्याचा ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद