शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

गोदावरी नदीला पानवेलींचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 12:46 IST

सायखेडा : ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली आसतांनाच गोदावरी नदीच्या पात्रात पानवेल पसरल्याने पाणी दूषित होण्याची शक्यता निर्माण आहे गोदावरी नदीपात्र पाणवेलींमध्ये गडप झाले असुन, पाणवेलींचे क्षार पाण्यात मिसळत असल्याने पाण्याला बेरंग आला आहे.

सायखेडा : ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली आसतांनाच गोदावरी नदीच्या पात्रात पानवेल पसरल्याने पाणी दूषित होण्याची शक्यता निर्माण आहे गोदावरी नदीपात्र पाणवेलींमध्ये गडप झाले असुन, पाणवेलींचे क्षार पाण्यात मिसळत असल्याने पाण्याला बेरंग आला आहे. गोदाकाठ भागातील अनेक गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा सायखेडा परिसरातून होत आहे कुपनलिकेच्या अनेक विहिरी आण िपाईपलाईन या परिसरातून असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, खराब पाण्यामुळे साथीचे रोग पसरून विविध रोगांना आमंत्रित केले जात आहे. नांदुरमधमेश्वर बंधार्यामुळे पश्चिमेला सायखेडा, चाटोरीपर्यंत थोप असल्याने, याभागात पाण्याला संथ प्रवाह असतो. त्यामुळे पाण्याबरोबर वहात आलेल्या पाणवेली अनेक ठिकाणी अडकुन आहे. त्यामुळे पाणी दुषित होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाणी हिरवेगार, परिसरात डास, अस्वच्छता, दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याने, ग्रामस्थांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. दूषित पाण्यामुळे साथींच्या आजरांना आमंत्रण दिले जात आहे. नदीपात्रातील पाण्याला पाणी बेरंग अला असुन, बहुतेक गावांत नदीपात्रातून थेट उपसा करून पाणीपुरवठा केला जात असल्याने, हिरवा रंग, दर्पवास, जंतु सदृश्य दूषित पाणी पुरवठा होतो. तर उन्हाची तिव्रता वाढल्याने ग्रामस्थ पाणी विकत घेऊन, आपली तहान भागवत आहे, यात ग्रामस्थांचे हाल होत असून, ग्रामस्थांबरोबरच जलचर प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर पाणवेली काढून टाकाव्यात अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक