शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंब, द्राक्षबागा भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 23:59 IST

पाटोदा : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने व व्यापाऱ्यांनीही खरेदीकडे पाठ फिरविल्याने शेतकºयांनी बागेतील तयार माल शेताच्या कडेला तोडून टाकला तर काही माल कवडीमोल दराने विकावा लागल्याने या भागातील शेतकºयांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.

ठळक मुद्देयेवला तालुका : कोरोनाची महामारी, प्लेग खरड्या, तेल्या रोगाचा प्रादुर्भाव

गोरख घुसळे।लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने व व्यापाऱ्यांनीही खरेदीकडे पाठ फिरविल्याने शेतकºयांनी बागेतील तयार माल शेताच्या कडेला तोडून टाकला तर काही माल कवडीमोल दराने विकावा लागल्याने या भागातील शेतकºयांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.डाळिंबबागांचीही अवस्था अशीच झाली. त्यातच या बागांवर प्लेग, खरड्या, तेल्या यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने बागा या रोगाच्या बळी ठरल्या आहे. या भागातील शेतकºयांनी डाळिंब व द्राक्षबागा तोडण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे या भागातील अडीच हजार हेक्टर द्राक्ष व साडेसातशे हेक्टर डाळिंब बागा धोक्यात आल्या आहेत.कोरोना महामारीमुळे तयार डाळिंबासाठी बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने तसेच ऐन विक्रीच्या तोंडावर फळांवर तेल्या तसेच झाडावर प्लेग खरड्याा या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने तयार डाळिंब दहा रुपये किलो या कवडीमोल दराने विकावे लागल्याने बागेवर केलेला खर्चही वसूल झाला नाही त्यामुळे नाइलाजास्तव पाटोदा येथील शेतकरी सुकदेव मेंगाणे,अनिल मेंगाणे, दिनकर बोरणारे या शेतकºयांनी आपल्या डाळिंबबागांवर कुºहाड चालवीत डाळिंबबागा तोडून टाकत भुईसपाट केल्या, तर ठाणगाव येथील अनिल कव्हात, दीपक कव्हात या भावांनी आपली सुमारे चार एकर द्राक्ष बागेवर कुºहाड चालविली .शेतकºयांना आर्थिक फटकायेवला तालुक्यात हजारो क्विंटल डाळिंब झाडावर सडले; पाटोदा परिसरातील शेतकरी फेब्रुवारी मार्च महिन्यातील बहार धरत असतात. मात्र यावर्षी फळ तयार झाल्यानंतर फळावर तेलकट डाग निर्माण झाल्याने निम्म्यापेक्षा जास्त फळ हे झाडावर सडून खराब झाले. त्यामुळे शेतकºयांनी हे फळ शेताच्या कडेला तोडून फेकून दिले आहे, तर उर्वरित डाळिंब फळाला मागणीअभावी दहा ते पंधरा रुपये किलो या कवडीमोल दराने विक्री करावी लागल्याने शेतकरीवर्गाला आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे.पाटोदा परिसरातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून द्राक्ष व डाळिंब शेतीकडे वळाले आहे. यातून शेतकºयांना चार पैसे मिळत होते. मात्र यावर्षी द्राक्ष हंगाम सुरू झाल्यानंतर जगात कोरोनासारख्या महामारीने वेठीस धरल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. पाच वर्षांपूर्वी सुमारे चार लाख रुपये खर्च करून डाळिंबबाग उभी केली. तीन वर्षे चांगला नफा झाला, मात्र यावर्षी मोठा खर्च करूनही कोरोना महामारीमुळे डाळिंब विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध झाली नाही. त्यातच ऐन विक्रीच्या वेळेस फळावर तेलकट डाग पडल्याने दहा ते बारा रुपये किलो आशा कावडीमोल दराने विक्री करावी लागली. केलेला खर्चर्ही वसूल झाला नाही. त्यातच बागेवर प्लेग, खरड्या या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे अडीच एकर डाळिंबबाग तोडून टाकली .- सुकदेव मेंगाणे, पाटोदाशेतकºयांनी उत्पादित केलेल्या कोणत्याच मालाला दर मिळत नाही. लॉकडाऊनपासून तर शेतकºयांची अवस्था बिकट झाली आहे. आठ ते दहा रुपये दराने द्राक्ष विक्री करावी लागली. त्यामुळे आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. उत्पन्न व उत्पादन खर्चाचा मेळ बसत नाही. केलेला संपूर्ण खर्च वाया गेला. त्यामुळे वैतागून सुमारे चार एकर द्राक्षबाग तोडून टाकली.-अनिल कव्हात, शेतकरी, ठाणगाव.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी