शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

डाळिंब उत्पादनाची ख्याती होतेय लुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:11 PM

दाभाडी : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात होणारा बदल, आजाराचा प्रादुर्भाव यामुळे अनेक वर्षांपासून परिसराची डाळिंब उत्पादक म्हणून असलेली ख्याती ...

ठळक मुद्देहवामान बदलाचा परिणाम : दाभाडीची ओळख पुसण्याची भीती

दाभाडी : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात होणारा बदल, आजाराचा प्रादुर्भाव यामुळे अनेक वर्षांपासून परिसराची डाळिंब उत्पादक म्हणून असलेली ख्याती लुप्त होऊ पाहत आहे. संपूर्ण भारतात डाळिंब उत्पादनाने दाभाडीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सातासमुद्रापार दाभाडीचे डाळिंब उत्पादनात नाव होते. सध्या डाळिंबाचे उत्पादन घटल्याने हा भाग आपली ओळख विसरतो की काय अशी भीती व्यक्त होत आहे.दाभाडीत रोजगार नसल्याने स्थानिक मजुरांना उदरनिर्वाहासाठी बाहेरील राज्यात जावे लागत आहे. दाभाडीत एकेकाळी शेकडो मजूर कामाला येत. बाहेरून येऊन मजुरी करीत. मात्र आज तेथील भूमिपुत्रच मजुरीसाठी वणवण फिरताना दिसत असल्याची शोेकांतिका आहे.पंचक्र ोशीतील शेतकऱ्याची प्रयोगशील शेतकरी अशी ओळख होती. नवनवीन प्रयोग करून यशस्वी होण्याची परंपरा येथील शेतकऱ्यांनी जपली आहे. ऊस, डाळिंब उत्पादन व प्रत टिकवण्यात येथील शेतकºयांचा हात कोणीच धरू शकत नाही. एकरी १०० टन उसाचे उत्पादन येथे काढण्यात आलेले आहे, तर डाळिंबमध्ये एकरी ५ लाखांपर्यंत उत्पादन घेतले आहे. त्यामुळे राज्यातून किंवा परराज्यातील अनेक व्यापारी मजूर येथे कामानिमित्त येत असत. काही तर येथे कायमचे रहिवासी झाले. स्वत:चे घरदार करून आपला संसार येथेच थाटला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणात होणारा बदल, लहरी निसर्ग व नानाविध आजारांचा प्रादुर्भाव यामुळे येथील डाळिंब शेती अखेरचा श्वास घेत आहे. त्याचा सरळ परिणाम दाभाडीच्या अर्थकारणावर झाला आहे. याचा मोठा फटका मजूर वर्गाला बसत आहे. तर डाळिंब उत्पादकांना कोणते पर्यायी पीक घ्यावे, याची चिंता सतावत आहे. येथील भूमिपुत्र डाळिंब पॅकिंगसाठी कधी संगमनेर तर कधी बारामती येथे जाताना दिसतो. आता तर थेट राजस्थान, गुजरातलाच पॅकिंग किंवा डाळिंब छाटणीच्या कामासाठी जात आहे. आता बॉक्सचा दाम ठरवून मजुरी मिळते. पंधरा-पंधरा दिवस गावापासून, घरापासून कामानिमित्त बाहेरगावी जावे लागत आहे. त्यामुळे पुन्हा दाभाडीत मोठ्या प्रमाणात डाळिंब लागवड होऊन या भागाला सुबत्ता कधी येईल अशी चिंता ग्रामस्थांना सतावत आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी