शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त शेतकऱ्यांनी रोखले मखमलाबादला सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:52 IST

स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे हरित क्षेत्र विकास (ग्रीन फिल्ड) करण्यासाठी सर्वेक्षण सुरू असतानाच दुसरीकडे कंपनीने महासभेवर प्रस्ताव केला आणि शेतकºयांच्या लाभही परस्पर निश्चित केल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी तातडीने मखमलाबाद येथील काम बंद पाडलेच, शिवाय येथे आलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांना कंपनीच्या दुटप्पीपणाचा जाब विचारला. याप्रकारानंतर कंपनीने सर्वेक्षण थांबवले असून, शेतकºयांनीदेखील धाव घेत भाजपाच्या पार्टी मिटिंगमध्ये हा सर्व प्रकार कथन केला. त्यामुळे शनिवारी (दि.१९) होणाºया महासभेत हा प्रस्ताव स्थगित ठेवू, असे आश्वासन महापौर रंजना भानसी यांनी संबंधितांना दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.

ठळक मुद्दे‘ग्रीन फिल्ड’चा प्रश्न : संमतीआधी महासभेत प्रस्ताव मांडल्याने आक्षेप

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे हरित क्षेत्र विकास (ग्रीन फिल्ड) करण्यासाठी सर्वेक्षण सुरू असतानाच दुसरीकडे कंपनीने महासभेवर प्रस्ताव केला आणि शेतकºयांच्या लाभही परस्पर निश्चित केल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी तातडीने मखमलाबाद येथील काम बंद पाडलेच, शिवाय येथे आलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांना कंपनीच्या दुटप्पीपणाचा जाब विचारला.याप्रकारानंतर कंपनीने सर्वेक्षण थांबवले असून, शेतकºयांनीदेखील धाव घेत भाजपाच्या पार्टी मिटिंगमध्ये हा सर्व प्रकार कथन केला. त्यामुळे शनिवारी (दि.१९) होणाºया महासभेत हा प्रस्ताव स्थगित ठेवू, असे आश्वासन महापौर रंजना भानसी यांनी संबंधितांना दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या वतीने मखलबाद- नाशिक शिवारात एकूण सातशे एकरमध्ये नियोजनबद्ध स्मार्टनगर वसविण्यात येणार आहे. त्यासाठी नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविली जाणार आहे. या प्रस्तावला मुळातच परिसरातील शेतकºयांचा विरोध आहे. तथापि, गेल्या महिन्यात कंपनीने यासंदर्भातील सादरीकरण शेतकºयांना केले आणि सर्वेक्षण करू देण्याची विनंती केली होती. त्यावेळी शेतकºयांनी काय लाभ होणार, असे विचारले असता आधी सर्वेक्षण झाले की मग त्याचे गणित मांडता येईल, असे सांगितले होते. शेतकºयांनी प्रकल्पाला विरोध ठेवूनही अखेरीस सर्वेक्षणाला संमती दिली होती. त्यानुसार एका खासगी एजन्सीमार्फत गेल्या दहा ते बारा दिवसांपासून सर्वेक्षणदेखील सुरू करण्यात आले होते. मात्र असे असताना स्मार्ट सिटी कंपनीने शनिवारी (दि.१९) होणाºया महासभेत हरित क्षेत्र विकासाचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यात महापालिकेने इरादा जाहीर करावा एवढाच उल्लेख असला तरी त्यानंतर हा इरादा राजपत्रात प्रसिद्ध करण्याचीदेखील तरतूद आहे. त्यामुळे प्रस्ताव संमत झाल्यासारखेच होणार आहे. याशिवाय प्रस्तावात टीपी स्कीममध्ये सर्व जमिनी एकत्र केल्यांनतर अंतिमत: शेतकºयांना ५० टक्के जागा देण्याचादेखील उल्लेख आहे. शुक्रवारी दुपारी काही शेतकºयांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला.आज महासभेत प्रस्तावमहापालिकेच्या शनिवारी (दि.१९) होणाºया महासभेत ‘ग्रीन फिल्ड’चा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यावरून जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. सदरच्या प्रस्तावाला शेतकºयांचा विरोध असल्याने हा विषय शेतकºयांवर सोडण्याचा निर्णय अगोदरच शिवसेनेच्या पक्ष बैठकीत घेण्यात आला आहे. आता भाजपासह अन्य पक्षांकडून त्यास विरोध होण्याची शक्यता आहे.स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या वतीने मखलबाद-नाशिक शिवारात एकूण सातशे एकरमध्ये नियोजनबद्ध स्मार्टनगर वसविण्यात येणार आहे. त्यासाठी नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविली जाणार आहे. या प्रस्तावाला मुळातच परिसरातील शेतकºयांचा विरोध आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाFarmerशेतकरी