शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
4
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
5
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
6
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
8
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
10
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
11
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
12
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
13
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
14
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
15
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
16
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
17
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
18
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
19
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
20
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी

कालीदासच्या रंगमंचावर महासभेचे राजकिय नाटक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 23:54 IST

नाशिक- कोरोनामुळे सर्वत्र वेगळे वातावरण असताना नाशिक महापालिकेत मात्र महासभेचे नाटक कालीदास कला मंदिरात रंगविण्यावरून वाद सुरू झाले आहेत. सभा घेण्यामागे जनहिताचा कळवळा असल्याचा सत्तारूढ भाजपचा दावा आहे तर लॉक डाऊन आणि संचारबंदीत इतकी घाई करून काय साधणार असा प्रश्न करीत विरोधी पक्षांनी महापौरादी मंडळींना धारेवर धरले आहे. महासभा होणार किंवा नाही हे सोमवारी (दि.१८) स्पष्ट होईल. परंतु जनहिताचा कळवळा ना सत्तारूढ पक्षाला आहे ना विरोधकांना, इतके तर सामान्य नागरीकांना सहज कळते.

ठळक मुद्देकळवळा नक्की कसलासेना भाजपतील लुटूपूटूची लढाई

संजय पाठक, नाशिक- कोरोनामुळे सर्वत्र वेगळे वातावरण असताना नाशिक महापालिकेत मात्र महासभेचे नाटक कालीदास कला मंदिरात रंगविण्यावरून वाद सुरू झाले आहेत. सभा घेण्यामागे जनहिताचा कळवळा असल्याचा सत्तारूढ भाजपचा दावा आहे तर लॉक डाऊन आणि संचारबंदीत इतकी घाई करून काय साधणार असा प्रश्न करीत विरोधी पक्षांनी महापौरादी मंडळींना धारेवर धरले आहे. महासभा होणार किंवा नाही हे सोमवारी (दि.१८) स्पष्ट होईल. परंतु जनहिताचा कळवळा ना सत्तारूढ पक्षाला आहे ना विरोधकांना, इतके तर सामान्य नागरीकांना सहज कळते.

कोरोना महामारीने सर्वच समिकरणे बदलली आहे. अशा प्रकाराचा प्रसंग उदभवेल आणि त्याला सामोेरे जावे लागेल असे कोणाला कधी वाटले नव्हते. परंतु दुर्दैवाने सामोरे जावे लागत आहे. शासन प्रशासन वेगळ्या पध्दतीचे काम करीत आहे. लॉक डाऊन एक, दोन आणि तिन टप्पे पूर्ण होत असताना आता चौथ्या टप्यात बऱ्या पैकी शिथीलता मिळेल आणि सर्व व्यवहार सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे. मात्र, त्याची वाट न बघता महापालिकेचे अंदाजपत्रक मंजुरीची घाई आणि पावसाळी कामांची काळजी घेऊन महासभा घेण्याचे नियोजन सत्तारूढ भाजपने केले. सध्या फिजीकल डिस्टन्सिंग अनिवार्य असल्याने महापालिकेचे सभागृह सोडून महाकवी कालीदास मंदिरात महासभेचे नाटक रंगविण्याचे घाटत आहे. मात्र त्याला विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते यांनी कडाडून विरोध केला आहे, असे चित्र दाखवले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या महासभेला परवानगी देण्याचा विषय महापालिका आयुक्तांकडे टोलावला असून आता राजकिय वादात आयुक्तांचा कौल कोणाला मिळणार हे सोमवारी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सत्तारूढ गटाने अंदाजपत्रकाची काळजी वाहिली असली तरी ते फार खरे नाही. नवे आर्थिक वर्ष सुरू होऊन अवघे दोनच महिने लोटले आहेत. याच महापालिकेत अंदाजपत्रकाच्या विशेष महासभा आॅक्टोबर महिन्यात झाल्या आहेत. आणि त्याचे अधिकृत ठराव नोव्हेंबर महिन्यात गेल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे अंदाजपत्रक संमत झाले नसले तरी आयुक्तांनी आणि स्थायी समितीने संमत केलेल्या अंदाजपत्रकानुसार सहज काम करता येतात. दुसरी बाब पावसाळापूर्व कामांची! तर महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट आल्यानंतर पावसाळी गटार योजना ही एकमेव पावसाळ्यातील कामाची उपलब्धी(तीही वादग्रस्त) सोडली तर पस्तीस ते चाळीस वर्षात काहीच नवीन घडले नाही. तेच ते जुन्या वाड्यांचे पडणे आणि काझी गढीचा धोका, पावसाळी गटारी असतानाही रस्त्यावरून पाणी साचून रस्ते बंद होणे, हे सर्व नित्यनियमाने घडत आहे इतकेच नव्हे २००८ मध्ये महापूर येऊन गेल्यानंतर पूर नियंत्रणासाठी शासन अंगिकृत संस्थेने ज्या उपाययोजना सुचवल्या, त्या नऊ वर्षात अमलात येऊ शकलेला नाही. त्यामुळे महासभेच्या माध्यमातून जो जनहिताचा कळवळा आज दाखवला जात आहे तो इतक्या वर्षात फलद्रुप का झाला नाही हा प्रश्न आहे.

आता प्रश्न राजकारणाचा! महापालिकेत कोण सत्तारूढ आणि कोण विरोधक अशी स्थिती आहे. सत्तारूढ पक्षाचे नेते विरोधी पक्षाच्या नेत्यांशी सल्लामसलत करूनच अनेक निर्णय घेतात. अगदी भाजपात अलिकडे भूसंपादनासाठी दीडशे कोटी रूपयांचे कर्ज रोखे काढण्याचे ठरले, त्यावेळी भाजपच्या एका गटाला शिवसेनेने अगदी शासन स्तरावरून रसद मिळवून दिली. त्यामुळे राजकारण इतके टोकाचे आहे, असे नाही. सध्या सर्वच उद्योग धंदे बंद पडले आहेत. चलन वलन बंद आहेत. समाजातील अनेक घटकांची उपासमार असून त्यात राजकिय नेतेही आहेत. सहाजिकच याच एका कळवळ्यापोटी महासभेचे नियोजन असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपाShiv Senaशिवसेनाsatish kulkarniसतीश कुलकर्णी