शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नाशिक जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांकडून नाराजी नाट्याचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 21:19 IST

जिल्हा परिषदेत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून  विविध समितीच्या सभापती तथा सदस्यांकडून विकास कामांना गती मिळत नसल्याने सध्या त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त करून तसेच स्थायी समिती, विषय समिती आणि महासभेत नाराजी नाट्याचे प्रदर्शन करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा पर्याय आजमवलेला दिसतो आहे. 

ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांचे नाराजी नाट्याचून प्रसिद्धीचे राजकारणबैठकांमध्ये विकासकामांपेक्षा मानपमानवर अधिक चर्चा

नाशिक : जिल्हा परिषदेत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून  विविध समितीच्या सभापती तथा सदस्यांकडून विकास कामांना गती मिळत नसल्याने सध्या त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त करून तसेच स्थायी समिती, विषय समिती आणि महासभेत नाराजी नाट्याचे प्रदर्शन करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा पर्याय आजमवलेला दिसतो आहे. गेल्या महिन्यांपासून काही वेगवेगळ्या विभागाच्या सभापतींनी त्यांच्या विभागाच्या प्रशासकीय प्रमुखाने त्यांना योग्य तो मान सन्मान न दिल्याची तक्रार करून संबधित विषय समितीची सभा, स्थायी समितीची सभा  आणि कधी कधीतर चक्क तीन महिन्यांनी होणारी सर्वसाधारण सभाही वेठीस धरल्याचे पाहायला मिळत आहे. यात वेगवेगळ्या विषय समितींकडून अधिकाऱ्यांकडून संबधित विभागाची माहिती मिळत नसल्याचे तक्रार करीत असतात. प्रत्यक्षात अशा सभा झाल्यानंतर संबधित अधिकारी हे सभापतींच्या दालनात त्यांच्याकडील माहिती घेऊन हजर होत असताना ही नाराज्य नाट्याची रणनिती का असा सवाल प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.प्रत्यक्षात मात्र गेल्या दोन वर्षात नोटबंदीच्या काळात जिल्हा परिषदेच्या निधी जिल्हा बँकेत अडकून पडल्याने कोणचेही विकास कामे होऊ शकले नव्हते. आता कुठे विकास कामांचा आराखडा तयार होत असचाना अद्याप निधी वाटपावरूनच गोंधळ सुरू असल्याने पदाधिकाऱ्यांना त्यांच्या गटात आणि जिल्ह्यात विकास कामे दाखवता येत नसल्याने वेगवेगळ्या विषयांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरायचे आणि त्यातून प्रसिद्धी मिळवायची असे राजकारण सध्या जिल्हापरिषदेत रंगते आहे. याच कृषी पुरस्काराला आमंत्रित न केल्यामुळे उपाध्यक्ष नयना गावित यांच्या नाराजी नाट्यासह, कुपोषण निमूर्लन पुरस्काराची माहिती न दिल्यामुळे सभापती अर्पणा खोसकर यांनी व्यक्त केलेली नाराजी आणि आता मनिषा पवार यांनी अधिकारी माहिती देत नसल्यामुळे रोष व्यक्त करीत सर्वसामान्यांच्या विकासासंबंधी नियोजन व विचार विनिमय करण्याचा वेळ आपल्या मानपमानाच्या लेखाजोखा कधी विषय समितीत तर स्थायी समितीत आणि सर्वसाधारण सभेत मांडून प्रकाश झोतात राहण्याचे राजकारण सुरू केले आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद