शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

नाशिक जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांकडून नाराजी नाट्याचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 21:19 IST

जिल्हा परिषदेत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून  विविध समितीच्या सभापती तथा सदस्यांकडून विकास कामांना गती मिळत नसल्याने सध्या त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त करून तसेच स्थायी समिती, विषय समिती आणि महासभेत नाराजी नाट्याचे प्रदर्शन करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा पर्याय आजमवलेला दिसतो आहे. 

ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांचे नाराजी नाट्याचून प्रसिद्धीचे राजकारणबैठकांमध्ये विकासकामांपेक्षा मानपमानवर अधिक चर्चा

नाशिक : जिल्हा परिषदेत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून  विविध समितीच्या सभापती तथा सदस्यांकडून विकास कामांना गती मिळत नसल्याने सध्या त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त करून तसेच स्थायी समिती, विषय समिती आणि महासभेत नाराजी नाट्याचे प्रदर्शन करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा पर्याय आजमवलेला दिसतो आहे. गेल्या महिन्यांपासून काही वेगवेगळ्या विभागाच्या सभापतींनी त्यांच्या विभागाच्या प्रशासकीय प्रमुखाने त्यांना योग्य तो मान सन्मान न दिल्याची तक्रार करून संबधित विषय समितीची सभा, स्थायी समितीची सभा  आणि कधी कधीतर चक्क तीन महिन्यांनी होणारी सर्वसाधारण सभाही वेठीस धरल्याचे पाहायला मिळत आहे. यात वेगवेगळ्या विषय समितींकडून अधिकाऱ्यांकडून संबधित विभागाची माहिती मिळत नसल्याचे तक्रार करीत असतात. प्रत्यक्षात अशा सभा झाल्यानंतर संबधित अधिकारी हे सभापतींच्या दालनात त्यांच्याकडील माहिती घेऊन हजर होत असताना ही नाराज्य नाट्याची रणनिती का असा सवाल प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.प्रत्यक्षात मात्र गेल्या दोन वर्षात नोटबंदीच्या काळात जिल्हा परिषदेच्या निधी जिल्हा बँकेत अडकून पडल्याने कोणचेही विकास कामे होऊ शकले नव्हते. आता कुठे विकास कामांचा आराखडा तयार होत असचाना अद्याप निधी वाटपावरूनच गोंधळ सुरू असल्याने पदाधिकाऱ्यांना त्यांच्या गटात आणि जिल्ह्यात विकास कामे दाखवता येत नसल्याने वेगवेगळ्या विषयांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरायचे आणि त्यातून प्रसिद्धी मिळवायची असे राजकारण सध्या जिल्हापरिषदेत रंगते आहे. याच कृषी पुरस्काराला आमंत्रित न केल्यामुळे उपाध्यक्ष नयना गावित यांच्या नाराजी नाट्यासह, कुपोषण निमूर्लन पुरस्काराची माहिती न दिल्यामुळे सभापती अर्पणा खोसकर यांनी व्यक्त केलेली नाराजी आणि आता मनिषा पवार यांनी अधिकारी माहिती देत नसल्यामुळे रोष व्यक्त करीत सर्वसामान्यांच्या विकासासंबंधी नियोजन व विचार विनिमय करण्याचा वेळ आपल्या मानपमानाच्या लेखाजोखा कधी विषय समितीत तर स्थायी समितीत आणि सर्वसाधारण सभेत मांडून प्रकाश झोतात राहण्याचे राजकारण सुरू केले आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद