शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

अदखलपात्र गुन्ह्यांच्या सोडवणुकीसाठी पोलिसांचा बहुतांशी वेळ खर्ची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 18:58 IST

पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलेला किरकोळ स्वरूपातील वाद हा प्राथमिक अवस्थेतच मिटविला जावा, त्याचे रूपांतर गंभीर गुन्ह्यात होऊ नये यासाठी पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा नोंदविला जातो़ तक्रारदार व आरोपी या दोघांमध्ये पोलीस आपसी समझोता घडवून वाद मिटविण्याचा प्रयत्न करतात़ मात्र, तरीही वाद मिटला नाही तर चॅप्टर केस करून सहायक पोलीस आयुक्तांकडे पाठविला जातो़ सद्यस्थितीत शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्ह्यांची संख्या वाढत चालली असून, पोलिसांचा बहुतांशी वेळ हा या गुन्ह्यांच्या सोडवणुकीसाठी खर्ची पडत असल्याचे चित्र आहे़

ठळक मुद्दे किरकोळ स्वरूपातील वाद ; अदखलपात्र गुन्हा

संजय शहाणे, इंदिरानगर

पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलेला किरकोळ स्वरूपातील वाद हा प्राथमिक अवस्थेतच मिटविला जावा, त्याचे रूपांतर गंभीर गुन्ह्यात होऊ नये यासाठी पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा नोंदविला जातो़ तक्रारदार व आरोपी या दोघांमध्ये पोलीस आपसी समझोता घडवून वाद मिटविण्याचा प्रयत्न करतात़ मात्र, तरीही वाद मिटला नाही तर चॅप्टर केस करून सहायक पोलीस आयुक्तांकडे पाठविला जातो़ सद्यस्थितीत शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्ह्यांची संख्या वाढत चालली असून, पोलिसांचा बहुतांशी वेळ हा या गुन्ह्यांच्या सोडवणुकीसाठी खर्ची पडत असल्याचे चित्र आहे़

शहराच्या लोकसंख्येचा विचार करता पोलिसांचे बळ तुलनेने कमी आहे़ इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत सुमारे अडीच ते तीन लाख लोकसंख्या आहे़ या परिसरातील वाढती चेनस्रॅचिंग, घरफोड्या, लूट या घटनांना अटकाव करताना पोलीस मेटाकुटीस आले आहेत़ सोसायटी व परिसरातील किरकोळ स्वरूपातील भांडणांच्या किमान पाच ते सात अदखलपात्र गुन्हे प्रतिदिन पोलिसांत नोंदविले जातात़ त्यामध्ये लहान मुलांची भांडणे, गल्लीबोळात खेळत असताना होणाऱ्या हाणामाºया, सोसायटीतील महिलांची भांडणे यांचे प्रमाण अधिक आहे़

पोलीस ठाणे म्हटले की, गुन्हे व गुन्हेगार हे आलेच. मात्र या व्यतिरिक्त मोठ्या संख्येने दाखल होणारे अदखलपात्र गुन्हे पोलिसांची डोकेदुखी ठरत आहेत़ रस्त्याने जाताना माझ्याकडे रागाने का बघितले, माझ्या दरवाजासमोर चप्पल का काढता, कचरा आमच्या भागात का लावतात, आमच्या हद्दीत कपडे का वाळत घालतात, वाहने का लावतात, फुले का तोडतात यांसारख्या तक्रारी पोलीस ठाण्यात येत आहेत़ काही तक्रारींबाबत तर काय निर्णय द्यावा, असा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहतो़ या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करावे तर भविष्यात गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते अन् कायद्यात कडक कारवाईची तरतूद नाही़

पोलीस अदखलपात्र गुन्ह्यांमधील दोघांमध्येही समझोता करण्यासाठी प्रयत्न करतात, मात्र ब-याचदा प्रतिसाद मिळत नाही, अशावेळी पोलिसांना आपला खाक्या वा कायद्याची भीती दाखवून दोघांनाही शांत करावे लागते़ शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील अदखलपात्र गुन्ह्यांबाबत परिस्थिती समान आहे़ विशेष म्हणजे अशिक्षित नागरिकांबाबत समजून घेता येऊ शकते, मात्र तक्रारींमध्ये सुशिक्षित नागरिकांचीच संख्या अधिक आहे़ त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी आणखीच वाढत आहे़

पोलीस ठाण्यात दाखल होणारे दखलपात्र गुन्हे (अंदाजे)* प्रत्येक पोलीस ठाण्यात प्रतिदिन सुमारे - ५ गुन्हे* शहरातील १४ पोलीस ठाण्यात प्रतिदिन - ७० गुन्हे* महिनाभरात सर्व पोलीस ठाण्यांमध्ये - २१००* वर्षभरात अदखलपात्र गुन्ह्यांची संख्या - २५ हजार २००अदखलपात्र गुन्ह्यांमधील कारणे* सोसायटीमधील भांडणे* मुलांच्या खेळण्यावरून होणारी भांडणे* माझ्या दरवाजासमोर चप्पल का काढली* कचरा नेहमी आमच्या दरवाजाकडे ढकलता जातो* घरासमोर गाडी लावली* घरासमोरील झाडाची फुले, फळे तोडली* किरकोळ कारणेभविष्यातील गंभीर प्रकार टाळण्यास मदतपोलीस ठाण्यात भांडण किंवा वादाची तक्रार करण्यासाठी येणाºया नागरिकांकडून केल्या जाणाºया तक्रारीचे स्वरूप पाहून अदखलपात्र वा गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाते़ भांडण किंवा वाद हा समझोत्याने मिटला जाऊ शकत असेल तर अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेऊन दोघांमध्ये समेट घडवून आणला जातो़ अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद व कारवाई यामुळे भविष्यातील मोठा गुन्हा टळल्यास मदत होते़ 

गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेयशेजा-यांशी भांडण, रागाने पाहणे, कचरा टाकणे, अपार्टमेंट वा सोसायटीचा देखभाल खर्च न देणे आदी प्रकारचे वाद पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यातील गंभीरता ओळखून प्रारंभी अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेतला जातो़ यानंतर तक्रारकर्ता व आरोपी या दोघांचे भांडण मिटवून समझोता घालण्याचा प्रयत्न केला जातो़ मात्र, दोघेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतील तर संबंधितांवर चॅप्टर केस दाखल करून सहायक पोलीस आयुक्तांकडे पाठविले जाते़ अदखलपात्र गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे़- नारायण न्याहाळदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, इंदिरानगर

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक