शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
4
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
5
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
6
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
7
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
8
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
9
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
10
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
11
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
12
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
13
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
14
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
15
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
16
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
17
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
18
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
19
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
20
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय

अदखलपात्र गुन्ह्यांच्या सोडवणुकीसाठी पोलिसांचा बहुतांशी वेळ खर्ची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 18:58 IST

पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलेला किरकोळ स्वरूपातील वाद हा प्राथमिक अवस्थेतच मिटविला जावा, त्याचे रूपांतर गंभीर गुन्ह्यात होऊ नये यासाठी पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा नोंदविला जातो़ तक्रारदार व आरोपी या दोघांमध्ये पोलीस आपसी समझोता घडवून वाद मिटविण्याचा प्रयत्न करतात़ मात्र, तरीही वाद मिटला नाही तर चॅप्टर केस करून सहायक पोलीस आयुक्तांकडे पाठविला जातो़ सद्यस्थितीत शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्ह्यांची संख्या वाढत चालली असून, पोलिसांचा बहुतांशी वेळ हा या गुन्ह्यांच्या सोडवणुकीसाठी खर्ची पडत असल्याचे चित्र आहे़

ठळक मुद्दे किरकोळ स्वरूपातील वाद ; अदखलपात्र गुन्हा

संजय शहाणे, इंदिरानगर

पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलेला किरकोळ स्वरूपातील वाद हा प्राथमिक अवस्थेतच मिटविला जावा, त्याचे रूपांतर गंभीर गुन्ह्यात होऊ नये यासाठी पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा नोंदविला जातो़ तक्रारदार व आरोपी या दोघांमध्ये पोलीस आपसी समझोता घडवून वाद मिटविण्याचा प्रयत्न करतात़ मात्र, तरीही वाद मिटला नाही तर चॅप्टर केस करून सहायक पोलीस आयुक्तांकडे पाठविला जातो़ सद्यस्थितीत शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्ह्यांची संख्या वाढत चालली असून, पोलिसांचा बहुतांशी वेळ हा या गुन्ह्यांच्या सोडवणुकीसाठी खर्ची पडत असल्याचे चित्र आहे़

शहराच्या लोकसंख्येचा विचार करता पोलिसांचे बळ तुलनेने कमी आहे़ इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत सुमारे अडीच ते तीन लाख लोकसंख्या आहे़ या परिसरातील वाढती चेनस्रॅचिंग, घरफोड्या, लूट या घटनांना अटकाव करताना पोलीस मेटाकुटीस आले आहेत़ सोसायटी व परिसरातील किरकोळ स्वरूपातील भांडणांच्या किमान पाच ते सात अदखलपात्र गुन्हे प्रतिदिन पोलिसांत नोंदविले जातात़ त्यामध्ये लहान मुलांची भांडणे, गल्लीबोळात खेळत असताना होणाऱ्या हाणामाºया, सोसायटीतील महिलांची भांडणे यांचे प्रमाण अधिक आहे़

पोलीस ठाणे म्हटले की, गुन्हे व गुन्हेगार हे आलेच. मात्र या व्यतिरिक्त मोठ्या संख्येने दाखल होणारे अदखलपात्र गुन्हे पोलिसांची डोकेदुखी ठरत आहेत़ रस्त्याने जाताना माझ्याकडे रागाने का बघितले, माझ्या दरवाजासमोर चप्पल का काढता, कचरा आमच्या भागात का लावतात, आमच्या हद्दीत कपडे का वाळत घालतात, वाहने का लावतात, फुले का तोडतात यांसारख्या तक्रारी पोलीस ठाण्यात येत आहेत़ काही तक्रारींबाबत तर काय निर्णय द्यावा, असा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहतो़ या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करावे तर भविष्यात गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते अन् कायद्यात कडक कारवाईची तरतूद नाही़

पोलीस अदखलपात्र गुन्ह्यांमधील दोघांमध्येही समझोता करण्यासाठी प्रयत्न करतात, मात्र ब-याचदा प्रतिसाद मिळत नाही, अशावेळी पोलिसांना आपला खाक्या वा कायद्याची भीती दाखवून दोघांनाही शांत करावे लागते़ शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील अदखलपात्र गुन्ह्यांबाबत परिस्थिती समान आहे़ विशेष म्हणजे अशिक्षित नागरिकांबाबत समजून घेता येऊ शकते, मात्र तक्रारींमध्ये सुशिक्षित नागरिकांचीच संख्या अधिक आहे़ त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी आणखीच वाढत आहे़

पोलीस ठाण्यात दाखल होणारे दखलपात्र गुन्हे (अंदाजे)* प्रत्येक पोलीस ठाण्यात प्रतिदिन सुमारे - ५ गुन्हे* शहरातील १४ पोलीस ठाण्यात प्रतिदिन - ७० गुन्हे* महिनाभरात सर्व पोलीस ठाण्यांमध्ये - २१००* वर्षभरात अदखलपात्र गुन्ह्यांची संख्या - २५ हजार २००अदखलपात्र गुन्ह्यांमधील कारणे* सोसायटीमधील भांडणे* मुलांच्या खेळण्यावरून होणारी भांडणे* माझ्या दरवाजासमोर चप्पल का काढली* कचरा नेहमी आमच्या दरवाजाकडे ढकलता जातो* घरासमोर गाडी लावली* घरासमोरील झाडाची फुले, फळे तोडली* किरकोळ कारणेभविष्यातील गंभीर प्रकार टाळण्यास मदतपोलीस ठाण्यात भांडण किंवा वादाची तक्रार करण्यासाठी येणाºया नागरिकांकडून केल्या जाणाºया तक्रारीचे स्वरूप पाहून अदखलपात्र वा गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाते़ भांडण किंवा वाद हा समझोत्याने मिटला जाऊ शकत असेल तर अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेऊन दोघांमध्ये समेट घडवून आणला जातो़ अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद व कारवाई यामुळे भविष्यातील मोठा गुन्हा टळल्यास मदत होते़ 

गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेयशेजा-यांशी भांडण, रागाने पाहणे, कचरा टाकणे, अपार्टमेंट वा सोसायटीचा देखभाल खर्च न देणे आदी प्रकारचे वाद पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यातील गंभीरता ओळखून प्रारंभी अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेतला जातो़ यानंतर तक्रारकर्ता व आरोपी या दोघांचे भांडण मिटवून समझोता घालण्याचा प्रयत्न केला जातो़ मात्र, दोघेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतील तर संबंधितांवर चॅप्टर केस दाखल करून सहायक पोलीस आयुक्तांकडे पाठविले जाते़ अदखलपात्र गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे़- नारायण न्याहाळदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, इंदिरानगर

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक