शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

अंबड पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस चौक्या बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:15 IST

अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार, टवाळखोरांचे उपद्रव याबरोबरच वाढती गुन्हेगारी यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस गस्त वाढविण्याबरोबरच बंद असलेल्या पोलीस चौक्यांमध्ये कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी मागील महिन्यात अंबड पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत सांगितले, परंतु आजही परिस्थिती ‘जैसे थे’च असून, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही पोलीस चौक्या अद्यापही बंद असल्याने चित्र बघावयास मिळत आहे.

ठळक मुद्देगुन्हेगारीत वाढ : पोलीस आयुक्तांच्या आदेशालाच हरताळ

सिडको : अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार, टवाळखोरांचे उपद्रव याबरोबरच वाढती गुन्हेगारी यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस गस्त वाढविण्याबरोबरच बंद असलेल्या पोलीस चौक्यांमध्ये कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी मागील महिन्यात अंबड पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत सांगितले, परंतु आजही परिस्थिती ‘जैसे थे’च असून, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही पोलीस चौक्या अद्यापही बंद असल्याने चित्र बघावयास मिळत आहे.अंबड येथील महालक्ष्मीनगर भागात मागील महिन्यात दोघा गुंडांनी पाणीपुरी विक्रेत्यास जबर मारहाण करीत दहशत पसरविल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर गुंडागर्दी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी अंबड व सिडको भागांतील नागरिकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर जानेवारी महिन्यात अंबड पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढती गुंडागर्दी, अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनांबरोबरच उद्याने तसेच चौकांत वाढलेल्या टवाळखोरांचा उपद्रव, दारू दुकानांसमोरील मद्यपींकडून होत असलेला त्रास यामुळे सिडको व अंबड भागांतील सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याच्या सूचना नागरिक व लोकप्रतिनिधींनी आयुक्तांकडे मांडल्या होत्या. यावेळी पोलीस आयुक्त नांगरे-पाटील यांनी आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई सुरू आहे, तसेच गुन्हेगारांना तडीपार करण्याबरोबरच काहींना एमपीडीए या कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. यामुळे परिसरात पुन्हा भुरट्या चोºया तसेच गुन्हेगारी वाढली असल्याने बंद पोलीस चौक्यांमध्ये कामयस्वरूपी पोलीस कर्मचाºयांची नेमणूक करण्याबरोबरच पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे.जुने सिडको परिसरातील पोलीस चौकी बंद असल्याने परिसरात भुरट्या चोºया वाढल्या असून, मोबाइल चोरीच्या प्रकारातही वाढ झाल्याने याठिकाणी कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी असणे गरजेचे आहे.४प्रत्येक भागांतील नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या सोडविण्यासाठी सोशल पोलिसिंग सुरू असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले होते. तसेच अंबड पोलीस हद्दीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी बंद असलेल्या पोलीस चौक्या कार्यान्वित करणार असल्याचे सांगितले होते. परंतु आजही महालक्ष्मीनगर भागासह खुटवडनगर या भागातील पोलीस चौक्या कायमच बंद असून, त्रिमूर्ती चौक व शिवाजी चौक येथील पोलीस चौकीत कधी कर्मचारी दिसत नसल्याचे अनेक वेळा आढळून येत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी