शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

कविता आत्म्याचा स्वर असते : तन्वी अमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 01:29 IST

व्यक्ती जे वाचते आणि ज्यांच्या सहवासात जगते त्यांच्या विचारांचा तिच्यावर आपोआप प्रभाव पडत जातो. विचारी जणांच्या सहवासात आल्याने प्रत्येक जण परिपूर्ण होतो. इंदिराबाई, शांताबाई साहित्याचा माझ्या कवितांवरही त्यांचा प्रभाव जाणवतो, तसेच कविता मानवी जीवनाच्या आत्म्याचा स्वर असते, असे प्रतिपादन कवयित्री आणि लेखिका तन्वी अमित यांनी केले.

ठळक मुद्देआवर्ती अपूर्णांक’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

नाशिक : व्यक्ती जे वाचते आणि ज्यांच्या सहवासात जगते त्यांच्या विचारांचा तिच्यावर आपोआप प्रभाव पडत जातो. विचारी जणांच्या सहवासात आल्याने प्रत्येक जण परिपूर्ण होतो. इंदिराबाई, शांताबाई साहित्याचा माझ्या कवितांवरही त्यांचा प्रभाव जाणवतो, तसेच कविता मानवी जीवनाच्या आत्म्याचा स्वर असते, असे प्रतिपादन कवयित्री आणि लेखिका तन्वी अमित यांनी केले.

 

तन्वी अमित लिखित व शब्दमल्हार प्रकाशित ‘आवर्ती अपूर्णांक’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

 

रविवारी (दि. १०) कुसुमाग्रज स्मारकात पार पडले. या प्रकाशन समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. अनोख्या पद्धतीने साजरा झालेल्या प्रकाशन समारंभ पियू शिरवाडकर, पीयूष नाशिककर, जाई सराफ, स्वानंद बेदरकर यांच्या काव्य वाचनाने तन्वी अमित यांच्या कवितेचे पदर उलगडत गेले. उपस्थित कवितांना नाशिककर रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

 

तन्वी अमित म्हणाल्या, कवयित्रीच्या कविता आत्मकथन करणाऱ्याच असतात. त्यामुळे सर्व भाषांतील साहित्यात स्त्रीत्वाच्या हरळीची मुळे पसरलेली आहेत. कविता ही आत्मस्वराची प्रक्रिया असून, त्यांच्यामुळे आपल्याला स्वर मिळतो. कवीने स्वत:च्या मनाचा तळ शोधल्यास वाचकांच्या मनाचा तळ मिळतो. स्वानंद बेदरकर यांनी सादर केलेल्या ‘गुंता’ कवितेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी साहित्य क्षेत्रातील मान्यवर आणि नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक