शहरं
Join us  
Trending Stories
1
SA Won WTC Final 2025 : एडन मार्करमचे धमाकेदार शतक!! द. आफ्रिकेने रचला इतिहास; कांगारुंना हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी
2
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
3
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
4
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
5
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
6
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
7
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
8
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
9
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
10
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
11
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
12
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
13
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
14
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
15
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
16
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
17
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
18
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
19
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद

कविता आत्म्याचा स्वर असते : तन्वी अमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 01:29 IST

व्यक्ती जे वाचते आणि ज्यांच्या सहवासात जगते त्यांच्या विचारांचा तिच्यावर आपोआप प्रभाव पडत जातो. विचारी जणांच्या सहवासात आल्याने प्रत्येक जण परिपूर्ण होतो. इंदिराबाई, शांताबाई साहित्याचा माझ्या कवितांवरही त्यांचा प्रभाव जाणवतो, तसेच कविता मानवी जीवनाच्या आत्म्याचा स्वर असते, असे प्रतिपादन कवयित्री आणि लेखिका तन्वी अमित यांनी केले.

ठळक मुद्देआवर्ती अपूर्णांक’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

नाशिक : व्यक्ती जे वाचते आणि ज्यांच्या सहवासात जगते त्यांच्या विचारांचा तिच्यावर आपोआप प्रभाव पडत जातो. विचारी जणांच्या सहवासात आल्याने प्रत्येक जण परिपूर्ण होतो. इंदिराबाई, शांताबाई साहित्याचा माझ्या कवितांवरही त्यांचा प्रभाव जाणवतो, तसेच कविता मानवी जीवनाच्या आत्म्याचा स्वर असते, असे प्रतिपादन कवयित्री आणि लेखिका तन्वी अमित यांनी केले.

 

तन्वी अमित लिखित व शब्दमल्हार प्रकाशित ‘आवर्ती अपूर्णांक’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

 

रविवारी (दि. १०) कुसुमाग्रज स्मारकात पार पडले. या प्रकाशन समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. अनोख्या पद्धतीने साजरा झालेल्या प्रकाशन समारंभ पियू शिरवाडकर, पीयूष नाशिककर, जाई सराफ, स्वानंद बेदरकर यांच्या काव्य वाचनाने तन्वी अमित यांच्या कवितेचे पदर उलगडत गेले. उपस्थित कवितांना नाशिककर रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

 

तन्वी अमित म्हणाल्या, कवयित्रीच्या कविता आत्मकथन करणाऱ्याच असतात. त्यामुळे सर्व भाषांतील साहित्यात स्त्रीत्वाच्या हरळीची मुळे पसरलेली आहेत. कविता ही आत्मस्वराची प्रक्रिया असून, त्यांच्यामुळे आपल्याला स्वर मिळतो. कवीने स्वत:च्या मनाचा तळ शोधल्यास वाचकांच्या मनाचा तळ मिळतो. स्वानंद बेदरकर यांनी सादर केलेल्या ‘गुंता’ कवितेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी साहित्य क्षेत्रातील मान्यवर आणि नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक