शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

कविता आत्म्याचा स्वर असते : तन्वी अमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 01:29 IST

व्यक्ती जे वाचते आणि ज्यांच्या सहवासात जगते त्यांच्या विचारांचा तिच्यावर आपोआप प्रभाव पडत जातो. विचारी जणांच्या सहवासात आल्याने प्रत्येक जण परिपूर्ण होतो. इंदिराबाई, शांताबाई साहित्याचा माझ्या कवितांवरही त्यांचा प्रभाव जाणवतो, तसेच कविता मानवी जीवनाच्या आत्म्याचा स्वर असते, असे प्रतिपादन कवयित्री आणि लेखिका तन्वी अमित यांनी केले.

ठळक मुद्देआवर्ती अपूर्णांक’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

नाशिक : व्यक्ती जे वाचते आणि ज्यांच्या सहवासात जगते त्यांच्या विचारांचा तिच्यावर आपोआप प्रभाव पडत जातो. विचारी जणांच्या सहवासात आल्याने प्रत्येक जण परिपूर्ण होतो. इंदिराबाई, शांताबाई साहित्याचा माझ्या कवितांवरही त्यांचा प्रभाव जाणवतो, तसेच कविता मानवी जीवनाच्या आत्म्याचा स्वर असते, असे प्रतिपादन कवयित्री आणि लेखिका तन्वी अमित यांनी केले.

 

तन्वी अमित लिखित व शब्दमल्हार प्रकाशित ‘आवर्ती अपूर्णांक’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

 

रविवारी (दि. १०) कुसुमाग्रज स्मारकात पार पडले. या प्रकाशन समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. अनोख्या पद्धतीने साजरा झालेल्या प्रकाशन समारंभ पियू शिरवाडकर, पीयूष नाशिककर, जाई सराफ, स्वानंद बेदरकर यांच्या काव्य वाचनाने तन्वी अमित यांच्या कवितेचे पदर उलगडत गेले. उपस्थित कवितांना नाशिककर रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

 

तन्वी अमित म्हणाल्या, कवयित्रीच्या कविता आत्मकथन करणाऱ्याच असतात. त्यामुळे सर्व भाषांतील साहित्यात स्त्रीत्वाच्या हरळीची मुळे पसरलेली आहेत. कविता ही आत्मस्वराची प्रक्रिया असून, त्यांच्यामुळे आपल्याला स्वर मिळतो. कवीने स्वत:च्या मनाचा तळ शोधल्यास वाचकांच्या मनाचा तळ मिळतो. स्वानंद बेदरकर यांनी सादर केलेल्या ‘गुंता’ कवितेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी साहित्य क्षेत्रातील मान्यवर आणि नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक