शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

संघर्षाच्या व्यथांची जाणीव करून देणारा काव्यसंग्रह

By admin | Updated: September 29, 2014 00:44 IST

लक्ष्मण महाडिक : ‘तहानलेलं पाणी’चे प्रकाशन

नाशिक : संवेदना जपल्याशिवाय कवितेचा जन्म होत नसतो आणि जगण्याची व लिखाणाची गोष्ट एकच असते, ती म्हणजे मनाचा सुरू असलेला संघर्ष. निसर्गाने ओढ दिल्यानंतर बळीराजाच्या मनाच्या व्यथांची जाणीव ‘तहानलेलं पाणी’ या काव्यसंग्रहातून होते, असे प्रतिपादन कवी लक्ष्मण महाडिक यांनी केले.गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकात कवी मारुती सावंत लिखित ‘तहानलेलं पाणी’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात महाडिक प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी ते म्हणाले, शब्दांची गुंफण करत कवी आपल्या कविता पूर्ण करत असतो. यादरम्यान त्याचा आपल्या मनाशी संघर्ष सुरू असतो. जेव्हा एखाद्या कवीचा काव्यसंग्रह प्रकाशित होतो, तेव्हा त्याला आपल्या मेहनतीचे चीज झाले असे वाटते. आपली कविता जनसामान्यांच्या हातात पडते तेव्हा कवीला होणारा आनंद हा गगनात मावेनासा असतो. याप्रसंगी व्यासपीठावर सावंत यांच्या मातोश्री सरस्वती सावंत, पी. एम. वाकडे, जी. जी. सोनार, विष्णू गोरे, शीतल सावंत, मारुती सावंत उपस्थित होते. सावंत यांनी लिहिलेल्या कवितांमधून शेतकऱ्यांच्या व्यथांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी सावंत यांनी काव्यसंग्रहातील काही कविता सादर करून उपस्थितांच्या हृदयाचा ठाव घेतला. सूत्रसंचालन अलका कुलकर्णी यांनी केले. (प्रतिनिधी)