शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागात रस्त्यांची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 3:43 PM

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून देवगाव त्र्यंबकेश्वर मार्गावरील बोरीचीवाडी येथे मुख्य रस्त्याला एक ते दीड फूट भगदाड पडले आहे. पावसाळयात डहाळेवाडी ते देवगाव या मुख्य रस्त्यावरील मार्गावर प्रचंड सकाळ संध्याकाळ धुके पसरलेले असल्याने या मार्गावरून मार्गक्र मण करतांना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते.

ठळक मुद्देबोरीचीवाडी येथे रस्त्याला भगदाड : वाहनचालक त्रस्त

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून देवगाव त्र्यंबकेश्वर मार्गावरील बोरीचीवाडी येथे मुख्य रस्त्याला एक ते दीड फूट भगदाड पडले आहे. पावसाळयात डहाळेवाडी ते देवगाव या मुख्य रस्त्यावरील मार्गावर प्रचंड सकाळ संध्याकाळ धुके पसरलेले असल्याने या मार्गावरून मार्गक्र मण करतांना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी वाहनांचा अंदाज न आल्याने किंवा रस्त्यातील खड्यांमुळे मोठया प्रमाणावर अपघात घडून येतात. तसेच पावसामुळे तालुक्यातील रस्त्यांची अक्षरश चाळण झाली असून वाहनचालकांची वाहन चालवताना त्रेधातिरपीट उडते.अनेकवेळा अपघात देखील झाले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता गायब होऊन फक्त खड्डेच दिसत असल्याने वाहनचालकांना खड्डे चुकविण्याऐवजी रस्ता शोधावा लागत असल्याने वाहनचालक संतप्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांसह प्रवाशी, वाहनचालक करत आहेत.त्र्यंबकेश्वर तालुका पावसाचे माहेरघर असल्याने अतिपाऊसमुळे येथील रस्ते देखील वारंवार खराब होत असतात. सामुंडी ते कोजुली या पाच किलोमीटरच्या रस्त्याची अवस्था खड्यांमुळे बिकट झाली असून वाहने खिळखिळी झाली आहेत. रोजचे नोकर- चाकर व्याधींनी ग्रस्थ झाले आहेत. तसेच देवगाव परिसरातील देवगाव-वावीहर्ष, देवगाव श्रीघाट, टाकेदेवगाव- येल्याचीमेट, टाकेदेवगाव- वावीहर्ष या मार्गांवरील रस्त्यांना मोठे खड्डे पडले असून दिशादर्शक फलक नादुरु स्त झाले आहेत. देवगाव फाट्यावरील त्रिफुली गेल्या सात ते आठ महिन्यांपासून नादुरु स्त आहे.पाच वर्षांपूर्वी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यांचे काम करण्यात आले होते.आजया रस्त्यांची चाळण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींनी या रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करत आहेत. दुरावस्था झालेल्या रस्त्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपाचे खड्डे बुजवून मलमपट्टी केली जाते. मात्र, पावसाळ्यामध्ये या रस्त्यांची अवस्था जैसे थे राहते. सध्यस्थितीत रस्त्याची अवस्था नाजूक झाल्याने छोटे मोठे अपघात होऊन अनेक जण जखमी झाले आहेत, तर काहींना प्राणास मुकावे लागले. अनेकांना पाठीचे आजार उद्भवले आहेत.नाशिकहून खोडाळ्याला भाजीपाला ने आण करण्याचे काम असल्याने या मार्गावरून नेहमीच मार्गक्र मण असते. आव्हाटे ते देवगाव या सात किलोमीटर अंतरावर पहाटे पाच ते रात्री उशिरापर्यंत प्रचंड धुके पसरलेले असते. त्यामुळे धुक्यातून मार्गक्र मण करणे अवघड होते. तशा परिस्थितीत खड्यातून आदळआपट करत मार्ग शोधावा लागतो.- पांडुरंग खादे, भाजीपाला वाहतूक पुरवठादार. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग