शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी केवळ कागदावर!

By admin | Updated: May 15, 2017 22:27 IST

येवला : पर्यावरणाची काळजी घेतलीच पाहिजे अन्यथा आपल्या पुढच्या पिढीला जगणेदेखील मुश्कील होईल, अशी प्रतिक्रिया येवला शहरवासीयांनी व्यक्त केली आहे

 लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : पर्यावरणाची काळजी घेतलीच पाहिजे अन्यथा आपल्या पुढच्या पिढीला जगणेदेखील मुश्कील होईल, अशी प्रतिक्रिया येवला शहरवासीयांनी व्यक्त केली आहे. शहरातील गटारी आणि नाल्यांमधून प्लॅस्टिक पिशव्यांचे उदंड पीक आल्याचे सध्या पहावयास मिळत आहे. यामुळे पावसाळ्यात गटारीतून पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. प्लॅस्टिकबंदी ही गांभिर्याने घेण्याची मागणी होत आहे. आता सक्तीने प्लॅस्टिक निर्मूलन नव्हे तर प्लॅस्टिक विक्र ीसह वापरावर संपूर्णत: बंदी आणण्याची गरज शहरवासीयांनी अधोरेखित केली आहे. प्लॅस्टिकला अन्य पर्याय देऊून वापर व विक्रीवर बंदी आणून दंडात्मक आणि कायदेशीर कारवाईचे हत्यार उपसावे अशी मागणीदेखील नागरिकांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना केली आहे. नागरिकांनी व्यावसायिकांकडून प्लॅस्टिक पिशवीची मागणीच करू नये. बाजारात खरेदीसाठी जाताना स्वत:कडील कापडी पिशवी घेऊन जावी, असे आवाहन रवींद्र पवार यांच्यासह अनेकांनी केले. प्लॅस्टिक निर्मूलनासंदर्भात बैठकांमधून कडक शब्दांत चर्चा कागदपत्रावर आली असली तरी पालिकेत ठरावावर ठराव होतात. शहरवासीयांची नकारात्मक मानसिकता प्लॅस्टिक निर्मूलनाच्या आड येत असल्याचे निदर्शनास येत आहे. याशिवाय येवला पालिकेच्या कायदा अंमलबजावणीत सातत्य नाही.विघटन न होणाऱ्या ५० मायक्रॉन्सपेक्षा कमी जाडीच्या लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याच्या ठरावाबाबत चर्चा झाली. अनेकवेळा कागदोपत्री फार्स झाला. आतापर्यंत अनेकवेळा संबंधिताना नोटिसादेखील बजावण्यात आल्या. शिवाय पालिकेने संबंधितांकडून दंडदेखील वसूल केला आहे. असे असले तरी प्लॅस्टिक पिशवीचा वापर कमी करण्याची मानसिकता शहरवासीयांमध्ये तयार होत नाही. येवलेकरांना पर्यावरणाशी काही एक देणे घेणे नसल्याचा अनुभव यातून येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरावासीयांशी लोकमतने संवाद साधला. यातून अनेक बाबी समोर आल्या आहेत.विविध दुकानांमधून प्लॅस्टिकच्या ५० मायक्र ॉन्सपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या राजरोसपणे विकल्या जात आहे. भाजीपाला विक्रेत्यांसह, किराणा व मेडिकल दुकांनातून प्लॅस्टिक पिशव्याचा वापर होत असल्याचे चित्र आहे. येवला शहरात ५० मायक्रॉन्सपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर व चहाच्या प्लॅस्टिक कप विक्रीवर बंदी घालण्याबाबत पालिका सभागृहात आरोग्य व स्वच्छता विभागाची अनेकवेळा बैठका झाल्या. कारवाई झाली. तरीही मानवी जीवन व पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. बाजारात सर्रासपणे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होत आहे.