शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आधी वृक्षारोपण नंतर बोहल्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 14:59 IST

त्र्यंबकेश्वर : सध्या पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने संपुर्ण महाराष्ट्रात केंद्र सरकारने तेरा कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणुन महाराष्ट्र वन विभागातील त्र्यंबकेश्वर येथील वनरक्षक चि. कैलास महाले व वधु चि.सौ.कां. चैताली गावित यांनी बोहल्यावर चढण्यापुर्वी अगोदर वृक्षारोपण करत एक सामाजिक संदेश दिला. या जोडप्याने एक प्रकारे ...

त्र्यंबकेश्वर : सध्या पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने संपुर्ण महाराष्ट्रात केंद्र सरकारने तेरा कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणुन महाराष्ट्र वन विभागातील त्र्यंबकेश्वर येथील वनरक्षक चि. कैलास महाले व वधु चि.सौ.कां. चैताली गावित यांनी बोहल्यावर चढण्यापुर्वी अगोदर वृक्षारोपण करत एक सामाजिक संदेश दिला. या जोडप्याने एक प्रकारे वृक्षारोपणाचा आदर्श तर घालुन दिला आहे, पण इतरांनी देखील हा आदर्श घ्यावा असा हा उपक्र म आहे. उपस्थित पाहुणे मंडळींनी देखील आपापल्या घरी किमान दहा वृक्षांचे रोपण करावे अशी शपथ दिली. जंगलाचा दिवसेंदिवस ºहास होत असतांना आपण चुपचाप कसे बसायचे ? याबाबत त्यांनी पाहुणे मंडळींचे प्रबोधन करु न त्यांनी वृक्षारोपणाची शपथ दिली.वधु चैताली गावित ही सुरगाणा येथील आहे तर वर चि. कैलास हे गणेशगाव (वाघेरा) येथील आहे.अनावश्यक खर्चाला फाटा देत वराच्या गावाला हा विवाह सोहळा पार पडला हेही विशेष म्हणावे लागेल. कारण आदिवासी समाजाच्या रितीरिवाजा प्रमाणे सहसा विवाह मुलीच्या माहेरीच सरसकट करण्याची रु ढीपरंपरा आहे. यावेळी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास अहिरे , वनाधिकारी निवृत्ती कुंभार, माजी गटनेते योगेश तुंगार, वनरक्षक रु पाली मोरे , दर्शना सौपुरे, राजेंद्र भोसले, खंडु दळवी, रहमान हकीम, ऋषी जाधव, ज्ञानेश्वर अलगट, सुनील पवार, अशोक कंचोर, हरळे नलावडे आदी वन कर्मचारी उपस्थित होते.----------------------------वृक्ष लागवडीची गरजसर्वत्र जंगले नष्ट होत आहेत. अनेक ठिकाणी निसर्गाच्या कोपाला सामोरे जावे लागत आहे. पाणी पाऊस पडेना सर्वत्र भीषण पाणी टंचाई सुरु झाली आहे. पाण्याचे स्त्रोत नाहीसे होत आहेत. उन्हाची तीव्रता जावत आहे. नद्यांचा पुर्वीचा खळखळाट बंद पडला आहे. यासाठी वृक्ष लागवड करणे महत्वाचे आहे. लोकांना हे पटायला लागले आहे. निसर्गाचे हे पुनर्वैभव परत आणायचे असेल तर वृक्ष लागवड करणे सर्वात उत्तम उपाय आहे. यासाठी महाले व गावित कुटुबियांनी अगोदर वृक्षारोपण नंतरच विवाह सोहळ्याला महत्व दिले आहे. आणि त्यांना ही प्रेरणा दिली वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास अहिरे यांनी !

टॅग्स :Nashikनाशिक