शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आधी वृक्षारोपण नंतर बोहल्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 14:59 IST

त्र्यंबकेश्वर : सध्या पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने संपुर्ण महाराष्ट्रात केंद्र सरकारने तेरा कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणुन महाराष्ट्र वन विभागातील त्र्यंबकेश्वर येथील वनरक्षक चि. कैलास महाले व वधु चि.सौ.कां. चैताली गावित यांनी बोहल्यावर चढण्यापुर्वी अगोदर वृक्षारोपण करत एक सामाजिक संदेश दिला. या जोडप्याने एक प्रकारे ...

त्र्यंबकेश्वर : सध्या पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने संपुर्ण महाराष्ट्रात केंद्र सरकारने तेरा कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणुन महाराष्ट्र वन विभागातील त्र्यंबकेश्वर येथील वनरक्षक चि. कैलास महाले व वधु चि.सौ.कां. चैताली गावित यांनी बोहल्यावर चढण्यापुर्वी अगोदर वृक्षारोपण करत एक सामाजिक संदेश दिला. या जोडप्याने एक प्रकारे वृक्षारोपणाचा आदर्श तर घालुन दिला आहे, पण इतरांनी देखील हा आदर्श घ्यावा असा हा उपक्र म आहे. उपस्थित पाहुणे मंडळींनी देखील आपापल्या घरी किमान दहा वृक्षांचे रोपण करावे अशी शपथ दिली. जंगलाचा दिवसेंदिवस ºहास होत असतांना आपण चुपचाप कसे बसायचे ? याबाबत त्यांनी पाहुणे मंडळींचे प्रबोधन करु न त्यांनी वृक्षारोपणाची शपथ दिली.वधु चैताली गावित ही सुरगाणा येथील आहे तर वर चि. कैलास हे गणेशगाव (वाघेरा) येथील आहे.अनावश्यक खर्चाला फाटा देत वराच्या गावाला हा विवाह सोहळा पार पडला हेही विशेष म्हणावे लागेल. कारण आदिवासी समाजाच्या रितीरिवाजा प्रमाणे सहसा विवाह मुलीच्या माहेरीच सरसकट करण्याची रु ढीपरंपरा आहे. यावेळी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास अहिरे , वनाधिकारी निवृत्ती कुंभार, माजी गटनेते योगेश तुंगार, वनरक्षक रु पाली मोरे , दर्शना सौपुरे, राजेंद्र भोसले, खंडु दळवी, रहमान हकीम, ऋषी जाधव, ज्ञानेश्वर अलगट, सुनील पवार, अशोक कंचोर, हरळे नलावडे आदी वन कर्मचारी उपस्थित होते.----------------------------वृक्ष लागवडीची गरजसर्वत्र जंगले नष्ट होत आहेत. अनेक ठिकाणी निसर्गाच्या कोपाला सामोरे जावे लागत आहे. पाणी पाऊस पडेना सर्वत्र भीषण पाणी टंचाई सुरु झाली आहे. पाण्याचे स्त्रोत नाहीसे होत आहेत. उन्हाची तीव्रता जावत आहे. नद्यांचा पुर्वीचा खळखळाट बंद पडला आहे. यासाठी वृक्ष लागवड करणे महत्वाचे आहे. लोकांना हे पटायला लागले आहे. निसर्गाचे हे पुनर्वैभव परत आणायचे असेल तर वृक्ष लागवड करणे सर्वात उत्तम उपाय आहे. यासाठी महाले व गावित कुटुबियांनी अगोदर वृक्षारोपण नंतरच विवाह सोहळ्याला महत्व दिले आहे. आणि त्यांना ही प्रेरणा दिली वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास अहिरे यांनी !

टॅग्स :Nashikनाशिक