शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

आधी वृक्षारोपण नंतर बोहल्यावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 14:59 IST

त्र्यंबकेश्वर : सध्या पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने संपुर्ण महाराष्ट्रात केंद्र सरकारने तेरा कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणुन महाराष्ट्र वन विभागातील त्र्यंबकेश्वर येथील वनरक्षक चि. कैलास महाले व वधु चि.सौ.कां. चैताली गावित यांनी बोहल्यावर चढण्यापुर्वी अगोदर वृक्षारोपण करत एक सामाजिक संदेश दिला. या जोडप्याने एक प्रकारे ...

त्र्यंबकेश्वर : सध्या पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने संपुर्ण महाराष्ट्रात केंद्र सरकारने तेरा कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणुन महाराष्ट्र वन विभागातील त्र्यंबकेश्वर येथील वनरक्षक चि. कैलास महाले व वधु चि.सौ.कां. चैताली गावित यांनी बोहल्यावर चढण्यापुर्वी अगोदर वृक्षारोपण करत एक सामाजिक संदेश दिला. या जोडप्याने एक प्रकारे वृक्षारोपणाचा आदर्श तर घालुन दिला आहे, पण इतरांनी देखील हा आदर्श घ्यावा असा हा उपक्र म आहे. उपस्थित पाहुणे मंडळींनी देखील आपापल्या घरी किमान दहा वृक्षांचे रोपण करावे अशी शपथ दिली. जंगलाचा दिवसेंदिवस ºहास होत असतांना आपण चुपचाप कसे बसायचे ? याबाबत त्यांनी पाहुणे मंडळींचे प्रबोधन करु न त्यांनी वृक्षारोपणाची शपथ दिली.वधु चैताली गावित ही सुरगाणा येथील आहे तर वर चि. कैलास हे गणेशगाव (वाघेरा) येथील आहे.अनावश्यक खर्चाला फाटा देत वराच्या गावाला हा विवाह सोहळा पार पडला हेही विशेष म्हणावे लागेल. कारण आदिवासी समाजाच्या रितीरिवाजा प्रमाणे सहसा विवाह मुलीच्या माहेरीच सरसकट करण्याची रु ढीपरंपरा आहे. यावेळी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास अहिरे , वनाधिकारी निवृत्ती कुंभार, माजी गटनेते योगेश तुंगार, वनरक्षक रु पाली मोरे , दर्शना सौपुरे, राजेंद्र भोसले, खंडु दळवी, रहमान हकीम, ऋषी जाधव, ज्ञानेश्वर अलगट, सुनील पवार, अशोक कंचोर, हरळे नलावडे आदी वन कर्मचारी उपस्थित होते.----------------------------वृक्ष लागवडीची गरजसर्वत्र जंगले नष्ट होत आहेत. अनेक ठिकाणी निसर्गाच्या कोपाला सामोरे जावे लागत आहे. पाणी पाऊस पडेना सर्वत्र भीषण पाणी टंचाई सुरु झाली आहे. पाण्याचे स्त्रोत नाहीसे होत आहेत. उन्हाची तीव्रता जावत आहे. नद्यांचा पुर्वीचा खळखळाट बंद पडला आहे. यासाठी वृक्ष लागवड करणे महत्वाचे आहे. लोकांना हे पटायला लागले आहे. निसर्गाचे हे पुनर्वैभव परत आणायचे असेल तर वृक्ष लागवड करणे सर्वात उत्तम उपाय आहे. यासाठी महाले व गावित कुटुबियांनी अगोदर वृक्षारोपण नंतरच विवाह सोहळ्याला महत्व दिले आहे. आणि त्यांना ही प्रेरणा दिली वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास अहिरे यांनी !

टॅग्स :Nashikनाशिक