शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

अंजनेरी ते ब्रह्मगिरीदरम्यान लवकरच रोपवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2021 10:39 PM

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर हे धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. रोज हजारो भाविक त्र्यंबक नगरीत येत असतात. या परिसरातील अंजनेरी आणि ब्रह्मगिरी या पर्वतांचेही धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. मात्र, उंच आणि घनदाट जंगलात असलेल्या या पर्वतांच्या ठिकाणी जाणे भाविक तथा पर्यटकांना या जाणे शक्य होत नसल्याने अंजनेरी - ब्रह्मगिरी यादरम्यान रोपवे तयार करावा, या मागणीचा केंद्र सरकारने सकारात्मक विचार केला असून रोपवे प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी सर्वेक्षणाकरिता कन्सल्टंट एजन्सी नेमण्याबाबत शासनाने आदेश काढले असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकार सकारात्मक : सर्वेक्षणासाठी एजन्सी नेमण्याचे आदेश

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर हे धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. रोज हजारो भाविक त्र्यंबक नगरीत येत असतात. या परिसरातील अंजनेरी आणि ब्रह्मगिरी या पर्वतांचेही धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. मात्र, उंच आणि घनदाट जंगलात असलेल्या या पर्वतांच्या ठिकाणी जाणे भाविक तथा पर्यटकांना या जाणे शक्य होत नसल्याने अंजनेरी - ब्रह्मगिरी यादरम्यान रोपवे तयार करावा, या मागणीचा केंद्र सरकारने सकारात्मक विचार केला असून रोपवे प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी सर्वेक्षणाकरिता कन्सल्टंट एजन्सी नेमण्याबाबत शासनाने आदेश काढले असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.त्र्यंबकेश्वर परिसरात अंजनेरी आणि ब्रह्मगिरी ही ऐतिहासिक स्थळे असून आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा घनदाट जंगलाचा आहे. अंजनेरी आणि ब्रह्मगिरी या दोन्ही पर्वतांचे धार्मिक इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असले तरी या पर्वतांवर जाण्यासाठी पायाभूत सुविधा नसल्याने भाविकांना तेथे जाण्यासाठी अडचणी निर्माण होतात. या ठिकाणी रोपवे झाल्यास पर्यटक तसेच भाविक अंजनेरी आणि ब्रह्मगिरी या पवित्र स्थळांना भेट देऊ शकतात. तसेच चित्रपटांचे चित्रीकरण होऊन हा परिसर आणखी विकसित होऊ शकेल. या सकारात्मक विचारातून या ठिकाणी रोपवे उभारण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट या कंपनीने या मागणीचा सकारात्मक विचार केला असून अंजनेरी- ब्रह्मगिरी यादरम्यानच्या रोपवेच्या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविला आहे. यातूनच अंजनेरी - ब्रह्मगिरीदरम्यानच्या प्रस्तावित रोपवे प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्याकामी सविस्तर प्रॉजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी केंद्र सरकारने कन्सल्टंट एजन्सी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विविध कंपन्यांकडून निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.पायाभूत सुविधांचा अभावअंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान असून ब्रह्मगिरी पर्वतावर भगवान शिवशंकर यांनी जटा आपटल्याने त्या ठिकाणाहून गोदावरी मातेचा उगम झालेला आहे. या दोन्ही उंच पर्वतांवर जाण्यासाठी पायाभूत सुविधा नसल्याने अंजनेरी, ब्रह्मगिरी ही ठिकाणे दुर्लक्षित राहिली आहे. अंजनेरी-ब्रह्मगिरी या ऐतिहासिक पर्वतांना जोडणारा रोपवे झाल्यास पर्यटनाला निश्चितच मोठी चालना मिळणार आहे.

 

 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरHemant Godseहेमंत गोडसे