शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

गाजलेल्या गीतांभोवती ‘पिंगा’

By admin | Updated: November 28, 2015 23:19 IST

परिस्थिती बदलली : मराठी व्यक्तिरेखांचीही हिंदी चित्रपटसृष्टीकडून दखल; भाषेसाठी लाभदायी

सुदीप गुजराथी, नाशिकहिंदी चित्रपटसृष्टीत मराठी अभिनेत्यांनी केवळ नोकराच्या भूमिका साकारण्याचे दिवस आता जसे इतिहासजमा झाले, तशीच परिस्थिती मराठी गाणी, लोकगीते व व्यक्तिरेखांबाबत निर्माण झाली आहे. मराठीची दखल घेणारे असे सिनेमे तिकीट खिडकीवरही यशस्वी ठरत असल्याने गेल्या काही वर्षांत मराठी गीतांभोवती बॉलिवूड ‘पिंगा’ घालू लागल्याचे चित्र आहे. सध्या गाजत असलेल्या ‘पिंगा’ गीताने यावर जणू शिक्कामोर्तबच केले आहे. अवघी हिंदी चित्रपटसृष्टी मुंबईत वसलेली असूनही काही वर्षांपूर्वीपर्यंत हिंदी चित्रपटांत मराठी व्यक्तिरेखा जवळपास दिसत नव्हत्या. बहुतांश चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक हे देशाच्या उत्तरेकडील असल्याने त्यांचा प्रभाव बॉलिवूडवर दिसून येत होता. मराठी व्यक्तिरेखा, गाणी, एवढेच नव्हे, तर मराठी अभिनेत्यांनाही हिंदीत फारसे मानाचे स्थान नव्हते. गेल्या काही वर्षांत मात्र बॉलिवूडमध्ये संपूर्ण मुंबईत वाढलेली नवी पिढी सक्रिय झाल्यानंतर चित्र पालटले आहे. चित्रपटांत आवर्जून मराठी व्यक्तिरेखा दिसू तर लागल्याच; शिवाय त्या लोकप्रियही होऊ लागल्या. नव्वदच्या दशकातील ‘हेराफेरी’ चित्रपटातील बाबूराव गणपतराव आपटे या मराठी पात्राला देशभरातील रसिकांनी डोक्यावर घेतले होते. अगदी अलीकडच्या ‘सिंघम’मध्ये अजय देवगणने मुख्य भूमिका केलेले बाजीराव सिंघम हे पात्रही मराठीच होते. त्याचा ‘आता माझी सटकली’ हा डायलॉगही तुफान हिट झाला होता. काही वर्षांपूर्वी गौरी शिंदे या मराठमोळ्या दिग्दर्शिकेने बनवलेल्या ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटात श्रीदेवीच्या मुख्य पात्राचे नाव शशी गोडबोले होते. शिवाय याच चित्रपटातील ‘नवराई माझी लाडाची’ हे गाणे गाजले होते. अमिताभ बच्चन यांनी ‘सरकार’मध्ये सुभाष नागरे, अभिषेक बच्चन यांनी ‘हॅपी न्यू इअर’मध्ये नंदू भिडे नामक मराठी पात्राची भूमिका रंगवली होती. ‘पिंगा’ला मराठी गीतांचा आधार४बाजीराव मस्तानीतील ‘पिंगा’ या गीतातील ‘लटपट लटपट’ हे शब्द व चाल सन १९५१ मध्ये प्रदर्शित झालेल्या व्ही. शांताराम यांच्या ‘अमर भूपाळी’ चित्रपटातील, तर ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या ओळी तसेच नृत्याच्या स्टेप्स ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ या सन १९७५ च्या चित्रपटातल्या ‘नाच गं घुमा’ गीतातील मंगळागौरीच्या खेळातील आहेत. विशेष म्हणजे, हा चित्रपटही व्ही. शांताराम यांचाच आहे. ‘बाजीराव मस्तानी’तील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आली अप्सरा... आली सुंदरा’ या दुसऱ्या गीतातील शब्दही मराठीच आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत मराठीची घेतली जाणारी दखल सुखावणारी आहे. पूर्वी लाहोर, कराची, पंजाब या देशाच्या उत्तर भागातून कलावंत येऊन मुंबईला चित्रपटसृष्टीत स्थिरावत. आता मात्र संपूर्णत: मुंबईत वाढलेली दिग्दर्शकांची पिढी चित्रपट तयार करते आहे. साहजिकच मराठी पात्रे, गाणी हिंदी चित्रपटांत आवर्जून येत आहेत. शिवाय महेश मांजरेकर, मधुर भांडारकर यांच्यासारखे मराठी दिग्दर्शकही सिनेमे बनवत आहेत. पूर्वी फक्त सई परांजपे यांनीच हे केले. एकूणच, मराठी लोक, इतिहास, साहित्याकडेही लक्ष वेधले जाणे ही चांगली गोष्ट आहे. भाषा जितकी वापरली जाईल, तितकी ती टिकते आणि वाढते. म्हणून हे मराठी भाषेसाठी फायद्याचेच आहे.- कौशल इनामदार, संगीतकार