शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

गाजलेल्या गीतांभोवती ‘पिंगा’

By admin | Updated: November 28, 2015 23:19 IST

परिस्थिती बदलली : मराठी व्यक्तिरेखांचीही हिंदी चित्रपटसृष्टीकडून दखल; भाषेसाठी लाभदायी

सुदीप गुजराथी, नाशिकहिंदी चित्रपटसृष्टीत मराठी अभिनेत्यांनी केवळ नोकराच्या भूमिका साकारण्याचे दिवस आता जसे इतिहासजमा झाले, तशीच परिस्थिती मराठी गाणी, लोकगीते व व्यक्तिरेखांबाबत निर्माण झाली आहे. मराठीची दखल घेणारे असे सिनेमे तिकीट खिडकीवरही यशस्वी ठरत असल्याने गेल्या काही वर्षांत मराठी गीतांभोवती बॉलिवूड ‘पिंगा’ घालू लागल्याचे चित्र आहे. सध्या गाजत असलेल्या ‘पिंगा’ गीताने यावर जणू शिक्कामोर्तबच केले आहे. अवघी हिंदी चित्रपटसृष्टी मुंबईत वसलेली असूनही काही वर्षांपूर्वीपर्यंत हिंदी चित्रपटांत मराठी व्यक्तिरेखा जवळपास दिसत नव्हत्या. बहुतांश चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक हे देशाच्या उत्तरेकडील असल्याने त्यांचा प्रभाव बॉलिवूडवर दिसून येत होता. मराठी व्यक्तिरेखा, गाणी, एवढेच नव्हे, तर मराठी अभिनेत्यांनाही हिंदीत फारसे मानाचे स्थान नव्हते. गेल्या काही वर्षांत मात्र बॉलिवूडमध्ये संपूर्ण मुंबईत वाढलेली नवी पिढी सक्रिय झाल्यानंतर चित्र पालटले आहे. चित्रपटांत आवर्जून मराठी व्यक्तिरेखा दिसू तर लागल्याच; शिवाय त्या लोकप्रियही होऊ लागल्या. नव्वदच्या दशकातील ‘हेराफेरी’ चित्रपटातील बाबूराव गणपतराव आपटे या मराठी पात्राला देशभरातील रसिकांनी डोक्यावर घेतले होते. अगदी अलीकडच्या ‘सिंघम’मध्ये अजय देवगणने मुख्य भूमिका केलेले बाजीराव सिंघम हे पात्रही मराठीच होते. त्याचा ‘आता माझी सटकली’ हा डायलॉगही तुफान हिट झाला होता. काही वर्षांपूर्वी गौरी शिंदे या मराठमोळ्या दिग्दर्शिकेने बनवलेल्या ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटात श्रीदेवीच्या मुख्य पात्राचे नाव शशी गोडबोले होते. शिवाय याच चित्रपटातील ‘नवराई माझी लाडाची’ हे गाणे गाजले होते. अमिताभ बच्चन यांनी ‘सरकार’मध्ये सुभाष नागरे, अभिषेक बच्चन यांनी ‘हॅपी न्यू इअर’मध्ये नंदू भिडे नामक मराठी पात्राची भूमिका रंगवली होती. ‘पिंगा’ला मराठी गीतांचा आधार४बाजीराव मस्तानीतील ‘पिंगा’ या गीतातील ‘लटपट लटपट’ हे शब्द व चाल सन १९५१ मध्ये प्रदर्शित झालेल्या व्ही. शांताराम यांच्या ‘अमर भूपाळी’ चित्रपटातील, तर ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या ओळी तसेच नृत्याच्या स्टेप्स ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ या सन १९७५ च्या चित्रपटातल्या ‘नाच गं घुमा’ गीतातील मंगळागौरीच्या खेळातील आहेत. विशेष म्हणजे, हा चित्रपटही व्ही. शांताराम यांचाच आहे. ‘बाजीराव मस्तानी’तील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आली अप्सरा... आली सुंदरा’ या दुसऱ्या गीतातील शब्दही मराठीच आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत मराठीची घेतली जाणारी दखल सुखावणारी आहे. पूर्वी लाहोर, कराची, पंजाब या देशाच्या उत्तर भागातून कलावंत येऊन मुंबईला चित्रपटसृष्टीत स्थिरावत. आता मात्र संपूर्णत: मुंबईत वाढलेली दिग्दर्शकांची पिढी चित्रपट तयार करते आहे. साहजिकच मराठी पात्रे, गाणी हिंदी चित्रपटांत आवर्जून येत आहेत. शिवाय महेश मांजरेकर, मधुर भांडारकर यांच्यासारखे मराठी दिग्दर्शकही सिनेमे बनवत आहेत. पूर्वी फक्त सई परांजपे यांनीच हे केले. एकूणच, मराठी लोक, इतिहास, साहित्याकडेही लक्ष वेधले जाणे ही चांगली गोष्ट आहे. भाषा जितकी वापरली जाईल, तितकी ती टिकते आणि वाढते. म्हणून हे मराठी भाषेसाठी फायद्याचेच आहे.- कौशल इनामदार, संगीतकार