शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

गाजलेल्या गीतांभोवती ‘पिंगा’

By admin | Updated: November 28, 2015 23:19 IST

परिस्थिती बदलली : मराठी व्यक्तिरेखांचीही हिंदी चित्रपटसृष्टीकडून दखल; भाषेसाठी लाभदायी

सुदीप गुजराथी, नाशिकहिंदी चित्रपटसृष्टीत मराठी अभिनेत्यांनी केवळ नोकराच्या भूमिका साकारण्याचे दिवस आता जसे इतिहासजमा झाले, तशीच परिस्थिती मराठी गाणी, लोकगीते व व्यक्तिरेखांबाबत निर्माण झाली आहे. मराठीची दखल घेणारे असे सिनेमे तिकीट खिडकीवरही यशस्वी ठरत असल्याने गेल्या काही वर्षांत मराठी गीतांभोवती बॉलिवूड ‘पिंगा’ घालू लागल्याचे चित्र आहे. सध्या गाजत असलेल्या ‘पिंगा’ गीताने यावर जणू शिक्कामोर्तबच केले आहे. अवघी हिंदी चित्रपटसृष्टी मुंबईत वसलेली असूनही काही वर्षांपूर्वीपर्यंत हिंदी चित्रपटांत मराठी व्यक्तिरेखा जवळपास दिसत नव्हत्या. बहुतांश चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक हे देशाच्या उत्तरेकडील असल्याने त्यांचा प्रभाव बॉलिवूडवर दिसून येत होता. मराठी व्यक्तिरेखा, गाणी, एवढेच नव्हे, तर मराठी अभिनेत्यांनाही हिंदीत फारसे मानाचे स्थान नव्हते. गेल्या काही वर्षांत मात्र बॉलिवूडमध्ये संपूर्ण मुंबईत वाढलेली नवी पिढी सक्रिय झाल्यानंतर चित्र पालटले आहे. चित्रपटांत आवर्जून मराठी व्यक्तिरेखा दिसू तर लागल्याच; शिवाय त्या लोकप्रियही होऊ लागल्या. नव्वदच्या दशकातील ‘हेराफेरी’ चित्रपटातील बाबूराव गणपतराव आपटे या मराठी पात्राला देशभरातील रसिकांनी डोक्यावर घेतले होते. अगदी अलीकडच्या ‘सिंघम’मध्ये अजय देवगणने मुख्य भूमिका केलेले बाजीराव सिंघम हे पात्रही मराठीच होते. त्याचा ‘आता माझी सटकली’ हा डायलॉगही तुफान हिट झाला होता. काही वर्षांपूर्वी गौरी शिंदे या मराठमोळ्या दिग्दर्शिकेने बनवलेल्या ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटात श्रीदेवीच्या मुख्य पात्राचे नाव शशी गोडबोले होते. शिवाय याच चित्रपटातील ‘नवराई माझी लाडाची’ हे गाणे गाजले होते. अमिताभ बच्चन यांनी ‘सरकार’मध्ये सुभाष नागरे, अभिषेक बच्चन यांनी ‘हॅपी न्यू इअर’मध्ये नंदू भिडे नामक मराठी पात्राची भूमिका रंगवली होती. ‘पिंगा’ला मराठी गीतांचा आधार४बाजीराव मस्तानीतील ‘पिंगा’ या गीतातील ‘लटपट लटपट’ हे शब्द व चाल सन १९५१ मध्ये प्रदर्शित झालेल्या व्ही. शांताराम यांच्या ‘अमर भूपाळी’ चित्रपटातील, तर ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या ओळी तसेच नृत्याच्या स्टेप्स ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ या सन १९७५ च्या चित्रपटातल्या ‘नाच गं घुमा’ गीतातील मंगळागौरीच्या खेळातील आहेत. विशेष म्हणजे, हा चित्रपटही व्ही. शांताराम यांचाच आहे. ‘बाजीराव मस्तानी’तील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आली अप्सरा... आली सुंदरा’ या दुसऱ्या गीतातील शब्दही मराठीच आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत मराठीची घेतली जाणारी दखल सुखावणारी आहे. पूर्वी लाहोर, कराची, पंजाब या देशाच्या उत्तर भागातून कलावंत येऊन मुंबईला चित्रपटसृष्टीत स्थिरावत. आता मात्र संपूर्णत: मुंबईत वाढलेली दिग्दर्शकांची पिढी चित्रपट तयार करते आहे. साहजिकच मराठी पात्रे, गाणी हिंदी चित्रपटांत आवर्जून येत आहेत. शिवाय महेश मांजरेकर, मधुर भांडारकर यांच्यासारखे मराठी दिग्दर्शकही सिनेमे बनवत आहेत. पूर्वी फक्त सई परांजपे यांनीच हे केले. एकूणच, मराठी लोक, इतिहास, साहित्याकडेही लक्ष वेधले जाणे ही चांगली गोष्ट आहे. भाषा जितकी वापरली जाईल, तितकी ती टिकते आणि वाढते. म्हणून हे मराठी भाषेसाठी फायद्याचेच आहे.- कौशल इनामदार, संगीतकार