त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंप्री गावाच्या ग्रामस्थासह निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे विश्वस्त रामभाऊ मुळाणे व त्यांच्या कुटूंबियांनी श्रमदानातून व स्वखर्चाने मातीचा बंधारा साकारत जलसंधारण अभियान राबविले आहे. त्यांच्या या उपक्रमाची प्रांतधिकारी बाळासाहेब वाकचौरे, तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी पाहणी करून उपक्रमांची प्रशंसा केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लोकांना पाण्याची कमतरता भासणार आहे. त्यासाठी नदी, नाल्यावर बांध घालून पाणी अडविण्याची संकल्पना राबविण्याची गरज आहे. बांध घातल्याने जनावरांना पाणी, कपडे धुणे यासाठी या पाण्याचा उपयोग होत आहे. मात्र मोटारी लावून पाणी घेण्यास मनाई करण्यात आली आहे. आताही पाणी असते. त्यामुळे आजबाजूच्या विहिरीनाही देखील पाझरामुळे पाणी राहणार आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी ग्रामस्थासह नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रभाकर मुळाणे, पिंप्रीच्या माजी सरंपच म्हाळसाबाई मुळाणे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे बहिरू मुळाणे यांनी परिश्रमातून नदीवर मातीचा बंधारा साकारला आहे. (वार्ताहर)
पिंप्रीत श्रमदानातून ग्रामस्थांनी साकारला बंधारा
By admin | Updated: December 22, 2015 23:04 IST