शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

उड्डाणपुलाच्या निर्मितीने पुन्हा टोलनाक्याला निमंत्रण पिंपळगाव टोलवसुलीचा आज फैसला

By admin | Updated: May 23, 2014 01:09 IST

नाशिक : मंुबई-आग्रा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत ओझर येथे दीड किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल करण्याच्या मागणीमुळे लांबणीवर पडलेली पिंपळगाव बसवंत येथील टोलदरवाढ सुरू करण्याबाबत शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक बोलविण्यात आली असली तरी, प्रस्तावित उड्डाणपुलासाठी जवळपास दीडशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, तो उभारण्यास वेळ तर लागेलच शिवाय आणखी एक टोलनाका नव्याने उभारावा लागणार असल्याचे वृत्त आहे.

नाशिक : मंुबई-आग्रा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत ओझर येथे दीड किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल करण्याच्या मागणीमुळे लांबणीवर पडलेली पिंपळगाव बसवंत येथील टोलदरवाढ सुरू करण्याबाबत शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक बोलविण्यात आली असली तरी, प्रस्तावित उड्डाणपुलासाठी जवळपास दीडशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, तो उभारण्यास वेळ तर लागेलच शिवाय आणखी एक टोलनाका नव्याने उभारावा लागणार असल्याचे वृत्त आहे. पिंपळगाव बसवंत येथे उभारण्यात आलेल्या टोलनाक्याची दरवाढ लागू करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पीएनजी टोल कंपनीत करार झाला असला तरी, अगोदर १२ व नंतर २० मेपासून नवीन दराने टोलवसुली करण्यास निफाड तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविल्याने हा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला. ओझर गावातील रहदारी लक्षात घेता, या ठिकाणी दीड किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल करण्यात यावा ही प्रमुख मागणी पुढे करून टोलवसुलीला विरोध केला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मते या प्रस्तावित उड्डाणपुलासाठी जवळपास दीडशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्याला भूपृष्ठमंत्रालयाने मंजुरी देणे आवश्यक आहे. शिवाय त्यासाठी येणार्‍या खर्चाची तरतूदही केंद्र सरकारने करायला हवी. केंद्राकडून निधी मिळाल्यास हा प्रस्ताव पूर्णत्वास येऊ शकतो. परंतु सद्यस्थितीत सरकार इतका निधी उपलब्ध करून देण्याची शाश्वती नसल्याने पुन्हा खासगीकरणातूनच हा उड्डाणपूल उभारावा लागणार आहे. सरकारने स्वीकारलेल्या बीओटी तत्त्वानुसार दहा कोटींहून अधिक खर्चाचे काम खासगीकरणातून करण्यात आले, तर त्यासाठी टोल आकारण्याची तरतूद आहे. ओझरच्या उड्डाणपुलासाठी हेच तत्त्व अंगीकारले तर होणारा खर्च वसुलीसाठी पुन्हा आहे त्याच जागी टोलनाका उभारावा लागेल. त्यातून टोल आकारणी अंतराबाबत असलेले धोरण बदलावे लागेल व दुसरे म्हणजे उड्डाणपूल निर्मितीची कल्पना मांडणार्‍यांना टोल परवडेल काय, असा प्रश्न उभा राहात आहे. एका टोलवाढीसाठी पुढे रेटली जाणारी दुसरी अवास्तव मागणी पूर्ण करण्यासाठी वाहनधारकांच्या माथी पुन्हा टोल मारण्याचा हा प्रकार अव्यवाहारीक असल्याचे जाणकारांचे मत आहे. शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकीतही याच मुद्यावर चर्चा होणार असून, त्यानंतरच वाढीव टोलच्या वसुलीबाबत निर्णय घेण्यात येईल. ओझरच्या उड्डाणपुलाबरोबरच काही ठिकाणी असलेल्या अर्धवट कामांबाबतही या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.