शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
2
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
3
तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
4
अरावली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला दिली स्थगिती, सरकारकडून माहिती अन् तज्ञ समितीकडून अहवाल मागवला
5
नोकरीत मन रमेना, म्हणून सुरु केली नायका; फाल्गुनी नायर कशा बनल्या सर्वात श्रीमंत 'सेल्फ-मेड' महिला?
6
शिंदेसेना-राष्ट्रवादीचा ५९:४१ टक्के जागांचा फॉर्म्युला; मध्यरात्रीपर्यंत चर्चांचा घोळ, भाजप युतीसाठी अनुत्सुक
7
BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 
8
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
9
या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले...
10
"एक सूप मी ८ दिवस पाणी घालून प्यायचे...", 'तुझ्यात जीव रंगला'मधल्या वहिनीसाहेबांनी सांगितला कठीण काळ
11
वंदे भारत, राजधानी विसरा; हायड्रोजन ट्रेन लोको पायलटला किती पगार मिळणार? लवकरच सेवेत येणार
12
धनु राशीसाठी नवीन वर्ष 2026: प्रगती आणि भाग्योदयाचे वर्ष; जोखीम घेण्याची वृत्ती देईल मोठे यश! 
13
Gold Silver Price Today: चांदी एका झटक्यात ₹१५,३७९ नं महागली, सोनंही नव्या उच्चांकी स्तरावर; पटापट चेक करा १८, २२ आणि २४ कॅरेटचा भाव
14
कुलदीप सेंगरचा जामीन स्थगित; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
15
अहिल्यानगरमध्ये उद्धवसेनेला हादरा, पक्षात अंतर्गत मतभेद; तेजस्विनी राठोडांनी भरला अपक्ष अर्ज
16
Health Tips: महिलांनो, स्वच्छतेच्या नादात आरोग्याशी खेळू नका; जेट स्प्रेचा चुकीचा वापर ठरू शकतो धोकादायक!
17
स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ 
18
Travel : स्वप्नातलं शहर की वास्तवातली जादू? पाण्यावर तरंगणाऱ्या वेनिस शहरात 'असा' करा स्वस्तात प्रवास!
19
Thane Politics: शिंदे-चव्हाण स्वतःचे बालेकिल्ले राखण्यासाठी 'ठाणे, कडोंम'मध्ये एकत्र; मीरा-भाईंदर, नवी मुंबईचं काय?
20
जागावाटपाचे घोडे अडलेलेच! काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीचा दावा, जागा गुलदस्त्यात
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलाच्या निर्मितीने पुन्हा टोलनाक्याला निमंत्रण पिंपळगाव टोलवसुलीचा आज फैसला

By admin | Updated: May 23, 2014 01:09 IST

नाशिक : मंुबई-आग्रा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत ओझर येथे दीड किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल करण्याच्या मागणीमुळे लांबणीवर पडलेली पिंपळगाव बसवंत येथील टोलदरवाढ सुरू करण्याबाबत शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक बोलविण्यात आली असली तरी, प्रस्तावित उड्डाणपुलासाठी जवळपास दीडशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, तो उभारण्यास वेळ तर लागेलच शिवाय आणखी एक टोलनाका नव्याने उभारावा लागणार असल्याचे वृत्त आहे.

नाशिक : मंुबई-आग्रा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत ओझर येथे दीड किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल करण्याच्या मागणीमुळे लांबणीवर पडलेली पिंपळगाव बसवंत येथील टोलदरवाढ सुरू करण्याबाबत शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक बोलविण्यात आली असली तरी, प्रस्तावित उड्डाणपुलासाठी जवळपास दीडशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, तो उभारण्यास वेळ तर लागेलच शिवाय आणखी एक टोलनाका नव्याने उभारावा लागणार असल्याचे वृत्त आहे. पिंपळगाव बसवंत येथे उभारण्यात आलेल्या टोलनाक्याची दरवाढ लागू करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पीएनजी टोल कंपनीत करार झाला असला तरी, अगोदर १२ व नंतर २० मेपासून नवीन दराने टोलवसुली करण्यास निफाड तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविल्याने हा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला. ओझर गावातील रहदारी लक्षात घेता, या ठिकाणी दीड किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल करण्यात यावा ही प्रमुख मागणी पुढे करून टोलवसुलीला विरोध केला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मते या प्रस्तावित उड्डाणपुलासाठी जवळपास दीडशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्याला भूपृष्ठमंत्रालयाने मंजुरी देणे आवश्यक आहे. शिवाय त्यासाठी येणार्‍या खर्चाची तरतूदही केंद्र सरकारने करायला हवी. केंद्राकडून निधी मिळाल्यास हा प्रस्ताव पूर्णत्वास येऊ शकतो. परंतु सद्यस्थितीत सरकार इतका निधी उपलब्ध करून देण्याची शाश्वती नसल्याने पुन्हा खासगीकरणातूनच हा उड्डाणपूल उभारावा लागणार आहे. सरकारने स्वीकारलेल्या बीओटी तत्त्वानुसार दहा कोटींहून अधिक खर्चाचे काम खासगीकरणातून करण्यात आले, तर त्यासाठी टोल आकारण्याची तरतूद आहे. ओझरच्या उड्डाणपुलासाठी हेच तत्त्व अंगीकारले तर होणारा खर्च वसुलीसाठी पुन्हा आहे त्याच जागी टोलनाका उभारावा लागेल. त्यातून टोल आकारणी अंतराबाबत असलेले धोरण बदलावे लागेल व दुसरे म्हणजे उड्डाणपूल निर्मितीची कल्पना मांडणार्‍यांना टोल परवडेल काय, असा प्रश्न उभा राहात आहे. एका टोलवाढीसाठी पुढे रेटली जाणारी दुसरी अवास्तव मागणी पूर्ण करण्यासाठी वाहनधारकांच्या माथी पुन्हा टोल मारण्याचा हा प्रकार अव्यवाहारीक असल्याचे जाणकारांचे मत आहे. शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकीतही याच मुद्यावर चर्चा होणार असून, त्यानंतरच वाढीव टोलच्या वसुलीबाबत निर्णय घेण्यात येईल. ओझरच्या उड्डाणपुलाबरोबरच काही ठिकाणी असलेल्या अर्धवट कामांबाबतही या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.