शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

बुधवारपासून पिंपळगावला ‘टोल’धाड

By admin | Updated: November 14, 2015 23:10 IST

अवजड वाहनांना भुर्दंड : सहमतीसाठी बैठकीचे आयोजन

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावर येत्या बुधवारपासून मोठ्या अवजड (सहा व त्यापेक्षा अधिक टायर असलेल्या) वाहनांच्या टोलमध्ये वाढ लागू करण्यात येणार असून, स्थानिक ग्रामस्थ तसेच जिल्हावासीयांच्या अवजड वाहनांना देण्यात आलेली यापूर्वीची सवलतही काढून घेण्यात येणार असल्याने महामार्गावरील ‘टोलधाड’ अटळ मानली जात आहे. पिंपळगाव येथील पिएनजी कंपनीने गेल्या आठवड्यात नोटीस काढून सर्व प्रकारच्या वाहनांच्या टोलमध्ये सोमवार, दि. १५ च्या मध्यरात्रीपासून वाढ करण्याचे जाहीर केले होते, त्याच्या विरोधात पिंपळगावच्या ग्रामस्थांनी दुसऱ्याच दिवशी टोलनाक्यावर आंदोलन करून टोल बंद पाडल्याने या संदर्भात तोडगा काढण्यासाठी निफाड तहसीलदार, टोल व्यवस्थापन व ग्रामस्थांची बैठक होऊन सोमवारपासून लागू होणाऱ्या दरवाढीवर सहमतीने तोडगा काढण्याचे व तोपर्यंत वाढ न करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यामुळे सोमवारपासून लागू होणारी दरवाढ तूर्त टळली असली तरी, मंगळवारी या संदर्भात निफाड तहसीलदार संदीप अहेर यांनी टोल व्यवस्थापन, स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक बोलविली असून, त्यात टोल व्यवस्थापन टोल वाढीबाबतचे त्यांचे म्हणणे मांडणार आहे. तत्पूर्वी पीएनजी कंपनीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत दोन आठवड्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन टोलवाढीबाबत चर्चा केली होती, मे २०१४ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक व जिल्ह्यातील वाहनांना दिलेली टोल सवलत कायम ठेवायची की काढायची यावर विचार विमर्ष करण्यात आला.तहसीलदारांनी बोलविलेल्या मंगळवारच्या बैठकीत टोलवाढीबाबत चर्चा करण्यात येऊन बुधवारपासून वाढीव टोलवसुली सुरू करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात मल्टी एक्सेल व्हेईकल म्हणजेच सहा किंवा त्यापेक्षा अधिक टायर असलेल्या वाहनांच्या टोलमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यात साधारणत: ट्रेलर, कंटेनर, मोठ्या ट्रक्सचा समावेश असेल त्यांना साधारणत: एकेरी फेरीसाठी ६९० ते ८९० रुपये भुर्दंड बसणार आहे. पहिल्या टप्प्यातील टोल वाढीनंतर टप्पाटप्प्याने अन्य वाहनांसाठी टोल वाढ करण्यात येणार असल्याचे कंपनी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.