शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

पायलट आणि सुरक्षा दलात तणाव, राहुल गांधी यांच्या मध्यस्थीने मिटला वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 05:03 IST

ओझर विमानतळावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानाचे पायलट उशिराने पोहोचल्याने त्यांची तपासणी करण्यावरून पायलट व विशेष सुरक्षा दल (एसपीजी) यांच्यात वाद झाला.

श्याम बागुल नाशिक : ओझर विमानतळावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानाचे पायलट उशिराने पोहोचल्याने त्यांची तपासणी करण्यावरून पायलट व विशेष सुरक्षा दल (एसपीजी) यांच्यात वाद झाला. दोघांनीही आवाज चढविल्याने विमानतळावर तणाव निर्माण झाला.

सुरक्षा दलाने माफी मागावी अन्यथा विमान न चालविण्याचा निर्णय पायलटने घेतला. त्यामुळे अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. अखेर राहुल गांधी यांनी दोघांचीही समजूत घालून स्वत: दिलगिरी व्यक्त करण्याचा इरादा बोलून दाखविल्यावर दोन्ही बाजूने नरमाईची भूमिका घेण्यात येऊन तणाव निवळला. साधारणत: अर्धातास गांधी यांनी विमानतळावर घालविल्यानंतर ते दिल्लीकडे रवाना झाले.

शनिवारी सकाळी सात वाजेपासूनच ओझर विमानतळावर विशेष सुरक्षा दल व पोलीस यंत्रणा उपस्थित होती. राहुल गांधी ओझर येथे येण्यापूर्वी काही वेळ अगोदर त्यांच्या विमानाचे पायलट विमानतळावर पोहोचले. त्यावेळी तेथे तैनात एसपीजीने पायलटकडे असलेल्या बॅगेची तपासणी करण्यावरून वाद झाला. मी चार वर्षांपासून गांधींच्या विमानाचा पायलट असून, आजवर असा अनुभव आला नसल्याचे सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये वाद झडला. थोड्याच वेळात राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टरचे लँडिंग झाले. त्यांना शहराध्यक्ष शरद आहेर यांनी वादाची कल्पना दिली. त्यांनी एसपीजी अधिकारी व पायलट यांच्याशी संवाद साधला. अखेर वादावर पडदा टाकण्यात आला.

अग्निशामन वाहनात बसलेविमान उड्डाण घेण्यासाठी वीस मिनिटांचा कालावधी शिल्लक असल्याचे पाहून राहुल गांधी यांचे कोपऱ्यात एचएएलच्या अग्निशामक दलाच्या पथकाकडे लक्ष गेले. ते चालत तेथे गेले. त्यांनी थेट अग्निशामक दलाच्या बंबावर चढून आतमध्ये बसलेल्या चालक व जवानाशी संवाद साधला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी