शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

पेठच्या ‘त्या’ बालगृहातील मुलींचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 3:54 PM

नाशिक : गेल्या महिन्यात उघडकीस आलेल्या पेठ येथील बालसदन गृहातील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर तेथे राहणाºया अन्य मुलींच्या सुरक्षिततेचा विचार करून महिला व बाल कल्याण विभागाने बालसदन गृहातील ५८ मुलींचे नाशकात स्थलांतर केले आहे. या मुलींना नाशिकमधील शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवून देण्यात आला असून, आधाराश्रम व रिमांड होम येथे त्यांची ...

नाशिक : गेल्या महिन्यात उघडकीस आलेल्या पेठ येथील बालसदन गृहातील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर तेथे राहणाºया अन्य मुलींच्या सुरक्षिततेचा विचार करून महिला व बाल कल्याण विभागाने बालसदन गृहातील ५८ मुलींचे नाशकात स्थलांतर केले आहे. या मुलींना नाशिकमधील शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवून देण्यात आला असून, आधाराश्रम व रिमांड होम येथे त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.पेठ येथे महिला हक्क संरक्षण समिती संचलित अनाथ मुलींचे बालगृह चालविले जात होते. सुशीला अलबाड ह्या त्या संस्थेच्या अध्यक्ष असून, त्यांच्या मुलाने या बालसदनात राहणाºया एका अल्पवयीन मुलीवर २०१५ पासून सातत्याने अत्याचार केल्याची घटना घडली होती. सदर मुलगी सज्ञान झाल्यानंतर तिची रवानगी नाशिकच्या वात्सल्य आधाराश्रमात करण्यात आल्यावर तिने आपल्यावर गुदरलेला प्रसंग तेथील रेक्टरच्या कानी घातल्यानंतर या प्रकरणाला वाच्यता फुटली होती. या प्रकरणी १२ जुलै रोजी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन अलबाड यांच्या मुलाला अटक करण्यात आली. त्याचबरोबर त्याच्या या कृत्याला फूस दिल्याप्रकरणी सुशीला अलबाड यांनाही सहआरोपी करण्यात आले. पेठच्या बालगृहात अनाथ मुलींच्या शिक्षणाची व राहण्याची व्यवस्था असल्याने सहा ते अठरा वयोगटाच्या जवळपास ५८ मुलींचे याठिकाणी वास्तव्य होते. संस्थाचालकाकडूनच लैंगिक छळ होत असल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत महिला व बालकल्याण विभागाने या बालगृहाला भेट देऊन तेथे राहणाºया अन्य मुलींचे जाबजबाब नोंदवून घेण्याबरोबरच त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतली होती. या मुलींचे शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या हेतूने शासनाने त्यांची सुरक्षित ठिकाणी रवानगी करण्याचा निर्णय घेऊन ५८ मुलींना नाशकात हलविले. जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी सुरेखा पाटील यांनी या सर्व मुलींची वयोगटाच्या हिशेबाने आधारश्रम तसेच उंटवाडीच्या रिमांड होममध्ये व्यवस्था केली असून, त्यांना नजीकच्या शाळेत प्रवेशही मिळवून दिला आहे. पेठच्या ‘त्या’ बालगृहाची मान्यताही रद्द करण्यात आली आहे.