शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

जिल्ह्यात पर्जन्याच्या टक्केवारीत केवळ चार तालुक्यांची शंभरी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 00:39 IST

शासकीय हिशेबानुसार पावसाळा संपायला केवळ नऊ दिवस शिल्लक असताना जिल्ह्यातील पेठ, मालेगाव, नांदगाव व देवळा या चार तालुक्यांनी पर्जन्याच्या टक्केवारीत शंभरी पार केली असून, अकरा तालुके सरासरीपर्यंतदेखील पोहोचू शकले नाहीत. दरम्यान, गतवर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यात झालेल्या पावसाच्या तुलनेत पेठ, त्र्यंबकेश्वर आणि सुरगाणा या तीन तालुक्यात अधिक पावसाची नोंद झालेली आहे.

ठळक मुद्देगतवर्षाच्या तुलनेत तीन तालुक्यात अधिक पावसाची नोंद

नाशिक : शासकीय हिशेबानुसार पावसाळा संपायला केवळ नऊ दिवस शिल्लक असताना जिल्ह्यातील पेठ, मालेगाव, नांदगाव व देवळा या चार तालुक्यांनी पर्जन्याच्या टक्केवारीत शंभरी पार केली असून, अकरा तालुके सरासरीपर्यंतदेखील पोहोचू शकले नाहीत. दरम्यान, गतवर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यात झालेल्या पावसाच्या तुलनेत पेठ, त्र्यंबकेश्वर आणि सुरगाणा या तीन तालुक्यात अधिक पावसाची नोंद झालेली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात पर्जन्याच्या टक्केवारीची शंभरी गाठलेल्या पेठ (१००.१२), मालेगाव (११६.०४), नांदगाव १३४.७४) व देवळा (१०२.९१) या तालुक्यांचा समावेश आहे. मात्र, ११ तालुके पर्जन्याची शंभरीही गाठू शकले नाहीत. त्यात नाशिक (५३.२४), इगतपुरी (९८.७६), दिंडोरी (६८.१७), त्र्यंबकेश्वर (७३.७९), चांदवड (४७.५९), कळवण (७३.१७), बागलाण (८६.८७), सुरगाणा (९८.८८), निफाड (९८.८०), सिन्नर (६६.०५) व येवला (८९.११) या तालुक्यांचा समावेश आहे. यंदा पावसाळा सुरु होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला होता. त्यानुसार पावसाळा वेळेवर सुरु झाला. त्या पावसाच्या हजेरीवर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीची कामे आटोपली होती. मात्र, त्यानंतर पावसाने बरीच ओढ दिल्याने जिल्ह्यातील काही तालुक्यात पेरण्या खोळंबल्या होत्या. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाने समाधानकारक हजेरी लावलीे नाही. त्यामुळे केवळ पेठ, त्र्यंबकेश्वर आणि सुरगाणा या तीन तालुक्यांव्यतिरिक्त बारा तालुक्यात मागील वर्षाइतकाही पाऊस झालेला नाही. मागील वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस पेठ तालुक्यात (२०४५.६ मि. मी.) तर सर्वात कमी (२५२ मि. मी.) पावसाची नोंद झालेली आहे.

इन्फो...

धरणांनी गाठली शंभरी

यंदा जिल्ह्यातील वाघाड, दारणा, भावली, वालदेवी, हरणबारी, केळझर, नागासाक्या व माणिकपुंज आठ धरणांनी टक्केवारीची शंभरी गाठली आहे. ओझरखेड (४७), तीसगाव (३१) व भोजापूर (४८) ही तीन धरणे पन्नाशीही गाठू शकले नाहीत. आतापर्यंत वाघाडमधून ११ क्युसेक, भावलीतून ५५० क्युसेक, मुकणेतून ७३ क्युसेक, वालदेवीतून १८३ क्युसेक, चणकामधून २२० क्युसेक, हरणबारीतून १३२ क्युसेक, तर नागासाक्यातून २१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस