शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

राजकीय साठमारीत जनतेचे प्रश्न हरवले ! पक्षीय मुद्दे, भावनिक विषयांपेक्षा सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांना हात घालण्याकडे साफ दुर्लक्ष ;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 01:21 IST

दिल्लीत भाजपचे सरकार, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे संयुक्त सरकार, जिल्हा परिषदेत कॉंग्रेसची सत्ता तर नाशिक, मालेगाव महापालिकेत भाजप, कॉंग्रेसच्या हाती सूत्रे आहेत. जनतेने ह्यसर्वपक्षसमभावह्ण जपलेला असतानाही सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांविषयी सर्वच राजकीय पक्ष एकमेकांना दोष देण्यात धन्यता मानत आहे.

ठळक मुद्देराज्य सरकार दिल्लीकडे बोट दाखविते.बळीराजाचे हृदय पिळवटल्याशिवाय राहणार नाहीबळिराजाच्या प्रश्नात कसले आलेय श्रेयाचे राजकारण?कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला

दिल्लीत भाजपचे सरकार, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे संयुक्त सरकार, जिल्हा परिषदेत कॉंग्रेसची सत्ता तर नाशिक, मालेगाव महापालिकेत भाजप, कॉंग्रेसच्या हाती सूत्रे आहेत. जनतेने ह्यसर्वपक्षसमभावह्ण जपलेला असतानाही सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांविषयी सर्वच राजकीय पक्ष एकमेकांना दोष देण्यात धन्यता मानत आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारवर ठपका ठेवताना निधीचा योग्य वापर होत नाही, विकासकामांमध्ये राज्यातील लोकप्रतिनिधी खोडा घालतात, अशी कारणे दिली जातात. तर राज्यातील पूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडे निधी मागितला आहे, कोविड लसीकरणासाठी केंद्र सरकार पुरेशा लसी उपलब्ध करून देत नाही असे म्हणत राज्य सरकार दिल्लीकडे बोट दाखविते. जिल्हा परिषद व महापालिकांना वित्त आयोग, स्मार्ट सिटी योजनेतून निधी येतो. पण त्याच्या गुणवत्तापूर्ण व कालबद्ध कामांविषयी सत्ताधारी आग्रही आणि कठोर भूमिका घेताना दिसत नाही. सदोष व रेंगाळणारी कामे दिसून येतात. विरोधक केवळ आरोपांची राळ उठवतात. पण पुरावे देऊन, सरकारकडे तक्रार, न्यायालयात दावा दाखल केला गेला असे कोठेही घडत नाही. एकमेकांवर चिखलफेक, दोषारोप केले जातात. त्यातून दोन घटका करमणूक होते, पण सामान्यांचे प्रश्न जैसे थे राहतात.पूरग्रस्त वाऱ्यावर, शेतकरी हवालदिलफळ आणि भाजीपाला उत्पादनात नाशिक जिल्हा अग्रेसर असताना गेल्या पंधरवड्यापासून कोबी, टमाटे, कांदा या भाज्यांना मातीमोल भाव मिळत आहे. उत्पादनासाठी लागलेला खर्चदेखील निघत नसल्याने शेतकऱ्यांनी रोटावेटर फिरवून पिके उद्ध्वस्त केली. गुरांना उभ्या पिकांमध्ये सोडून दिले. बाजार समितीत आल्यावर भाव बघितल्यानंतर तेथेच माल फेकून दिला. महागडे बियाणे, खते आणि कीटकनाशके वापरून, चार महिने कष्ट उपसून अशी वेळ येत असेल तर बळीराजाचे हृदय पिळवटल्याशिवाय राहणार नाही. बळीराजाच्या नावाने राज्य करणाऱ्या सर्वच सरकारांसाठी ही नामुष्कीची वेळ आहे. बळीराजाची मुले सत्तेवर असताना हे घडते, यापेक्षा देैवदुर्विलास तो कोणता?कांद्याच्या घसरलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी बाजार प्रोत्साहन योजना लागू करण्याची घोषणा केली. राज्य सरकारने ५० टक्के वाटा उचलला तर केंद्र सरकार कांदा खरेदी करायला तयार आहे. नाशिकचेच कृषिमंत्री असताना ना ते किंवा राज्य सरकार या विषयावर चकार शब्द बोलायला तयार नाही. बळिराजाच्या प्रश्नात कसले आलेय श्रेयाचे राजकारण? नांदगाव, मालेगाव तालुक्यांत पुराने हाहाकार माजविला. पावसाने ओढ दिल्याने हवालदिल झालेल्या बळिराजाची शेती वाहून गेली. नांदगाव शहरात मोठे नुकसान झाले. मंत्र्यांचे पाहणी दौरे झाले. त्यातही वादविवाद, मानापमान नाट्य रंगले; पण तातडीने नुकसानभरपाई मिळण्यासाठी पावले उचलण्याची गरज असताना अद्याप पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. नांदगावच्या निमित्ताने नगर नियोजनाचा विषय ऐरणीवर आला आहे. नदीकाठी, नदीपात्रात, नाल्यात बांधकामे केली जात असताना पालिका डोळ्यावर कातडे ओढून घेते काय ? वेळीच ते रोखले जात नाही, कारण राजकीय, आर्थिक हितसंबंध सांभाळले जातात. पुरात नुकसान झाले तर अनधिकृत बांधकाम म्हणून नुकसानभरपाई मिळत नाही. त्यांना मिळावी म्हणून मग दबावाचे राजकारण होते. हे दुष्टचक्र कोठेतरी थांबण्याची आवश्यकता आहे.

अभियान व सुव्यवस्थेमध्ये संतुलन हवे.नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे कर्तव्यतत्पर व उपक्रमशील पोलीस अधिकारी आहेत. कायद्याचा बडगा उगारत असताना सुधारण्यासाठी समुपदेशन, प्रबोधनासाठी ते प्रयत्न करतात. मानवीय भूमिकेतून हे स्वागतार्ह पाऊल आहे. मात्र, हेल्मेट सक्तीचे अभियान मात्र जाचक ठरत आहे. मुळात नाशिक शहरात स्मार्ट सिटीच्या नावाखाली महापालिका आणि त्या कंपनीने जो गोंधळ घालून ठेवला आहे, त्यामुळे नाशिककर त्रस्त आहेत. बहुसंख्य कामे रेंगाळली आहेत. अनेक मुख्य रस्ते काही महिन्यांपासून खोदून ठेवले आहेत, पावसाळ्यामुळे अनेक रस्त्यांमध्ये खड्डे पडले आहेत, पार्किंगची व्यवस्थित सुविधा नसल्याने रस्ते आक्रसले गेले आहेत. अशी वाहतुकीची दयनीय स्थिती असताना वाहनचालकांना हेल्मेटसक्ती केली जात आहे. रस्ते धड नाहीत, म्हणून प्राण वाचविण्यासाठी हेल्मेट घाला, असा पोलीस दलाचा सद्हेतू असेल तर गोष्ट वेगळी; पण हेल्मेटशिवाय पेट्रोल नाही, हेल्मेट नसेल तर दोन तास समुपदेशन या उपक्रमासाठी सर्वत्र पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कर्मचारी वर्ग अभियानात गुंतला असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पंधरवड्यातून एक खून, लूटमारीच्या रोज घडणाऱ्या घटना, टवाळखोरांकडून चारचाकी वाहनांची नासधूस, मंगळसूत्र चोरी, तडीपार गुंडांचा सर्रास वावर अशा घटनांनी डोके वर काढले आहे. अभियान व सुव्यवस्था या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन साधण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Nashikनाशिक