शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

केरळवासीयांना हवी विजेची उपकरणे, स्वच्छतेची साधने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 01:08 IST

चौदापैकी अकरा जिल्ह्यांमध्ये थैमान घातलेल्या पाऊस व पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या केरळवासीयांचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असले तरी, दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, त्यात प्रामुख्याने विजेचे बल्ब, वायर या उपकरणांबरोबरच रोगराईपासून दूर राहण्यासाठी स्वच्छतेच्या साधनांची नितांत गरज निर्माण झाली आहे.

नाशिक : चौदापैकी अकरा जिल्ह्यांमध्ये थैमान घातलेल्या पाऊस व पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या केरळवासीयांचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असले तरी, दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, त्यात प्रामुख्याने विजेचे बल्ब, वायर या उपकरणांबरोबरच रोगराईपासून दूर राहण्यासाठी स्वच्छतेच्या साधनांची नितांत गरज निर्माण झाली आहे. केरळवासीयांच्या मदतीसाठी गेल्या आठ दिवसांपासून भारत भारदी या स्वयंसेवी संस्थेने याकामी पुढाकार घेतला असून, आजपर्यंत सुमारे ७० टन वस्तू रेल्वेने पाठविण्यात आल्या आहेत.  केरळमध्ये आलेल्या पुरामुळे लाखो लोक बेघर झाले असून, त्यांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांना पुन्हा उभे करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. देश-विदेशातून केरळवासीयांना मदतीचा ओघ पाठविला जात असला तरी, केरळातील पूरग्रस्तांची नेमकी गरज ओळखून त्यांना मदत पाठविली जावी यासाठी नाशिकमधील केरळ असोसिएशन व भारत भारदी संस्थेचे पदाधिकारी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून झटत आहे. नाशिक जिल्ह्यातून अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना, असोसिएशन, राजकीय पक्ष, दानशूर व्यक्तींनी मिळेल त्या साधनांनी केरळसाठी मदत पाठविण्यास सुरुवात केली असली तरी, सदरची मदत गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचविणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत काही संस्थांकडून जिल्हा प्रशासनाकडे मदत कशी व कुठे पाठवायची याबाबत वारंवार विचारणा केली जात असल्याने गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिकरोड रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून केरळकडे जाणाºया रेल्वेगाड्यांमध्ये मदतीचे साहित्य रवाना करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. त्यानुसार केरळकडे जाणाºया रेल्वेला साहित्य वाहतुकीसाठी विशेष बोगी जोडण्यात आली आहे.  मुंबईहून दररोज कायमकुल्लम, कर्णावल्लम, त्रिवेंद्रम येथे रेल्वे रवाना होत असून, नाशिकहून मंगला एक्स्प्रेस जाते. गेल्या आठ दिवसांपासून भारत भारदी या स्वयंसेवी संस्थेच्या मार्फत केरळवासीयांसाठी मदत गोळा केली जात आहे.  पहिल्या टप्प्यात कपडे, बेडशिट्स, चटई, तयार पीठ, तांदूळ, साखर, दाळ, कपडे, कांदे, ब्लॅकेंट, महिलांसाठी कपडे असे सुमारे ४५ टन साहित्य रवाना करण्यात आले. तर दुसºया टप्प्यात औषधे, लहान मुलांसाठी लागणारे खाद्यपदार्थ, गहू गोळा करण्यात आले असून, २५ टन साहित्य सोमवारी रात्री रवाना करण्यात येणार आहे. केरळ पूरग्रस्तांना नेमके काय हवे याची माहिती केरळ असोसिएशनचे पारधन पिल्लई सातत्याने घेत असून, त्यांचे ५० सहकारी दिवस-रात्र याच कामात व्यस्त आहेत.चारा, ब्लिचिंग पावडरची कमतरताकेरळच्या महापुरात सर्व वाहून गेल्यामुळे याठिकाणी सर्वच जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली असून, जनावरांसाठी चारादेखील पुरामुळे शिल्लक राहिला नसल्याने जनावरांच्या खाद्याचा मोठा प्रश्न सरकारपुढे उभा राहिला आहे. चाºयाअभावी जनावरे दगावण्याची भीती व्यक्त केली जात असल्यामुळे केरळवासीयांकडून चाºयाची मागणी होऊ लागली आहे. याचबरोबर पाणी शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडर, स्वच्छतेसाठी फिनेल, खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी बल्ब, वायर, स्विचबोर्ड या उपकरणांची गरज निर्माण झाली आहे.केरळ असोसिएशनचा पुढाकारनाशिक शहरात देशातील ३० राज्यांतील लोक विविध ठिकाणी राहात असून, अशा सर्व परप्रांतियांनी एकत्र येऊन भारत भारदी असोसिएशनची स्थापना केली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात या संस्थेने ३० भाषांमध्ये भाविकांशी संवाद व संपर्क साधण्याचे मोठे काम केले होते. सध्या ही असोसिएशन केरळ असोसिएशनच्या बरोबर उभी ठाकली आहे. पारधन पिल्लई हे केरळमधील पूरग्रस्तांशी संपर्क ठेवून असून, दररोज या संस्थेचे ५० सदस्य केरळ पूरग्रस्तांसाठी नेमक्या लागणाºया वस्तू व साधने गोळा करून ते रेल्वेमार्गाने पाठविण्याचे काम करीत आहेत.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरfloodपूर