शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

केरळवासीयांना हवी विजेची उपकरणे, स्वच्छतेची साधने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 01:08 IST

चौदापैकी अकरा जिल्ह्यांमध्ये थैमान घातलेल्या पाऊस व पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या केरळवासीयांचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असले तरी, दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, त्यात प्रामुख्याने विजेचे बल्ब, वायर या उपकरणांबरोबरच रोगराईपासून दूर राहण्यासाठी स्वच्छतेच्या साधनांची नितांत गरज निर्माण झाली आहे.

नाशिक : चौदापैकी अकरा जिल्ह्यांमध्ये थैमान घातलेल्या पाऊस व पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या केरळवासीयांचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असले तरी, दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, त्यात प्रामुख्याने विजेचे बल्ब, वायर या उपकरणांबरोबरच रोगराईपासून दूर राहण्यासाठी स्वच्छतेच्या साधनांची नितांत गरज निर्माण झाली आहे. केरळवासीयांच्या मदतीसाठी गेल्या आठ दिवसांपासून भारत भारदी या स्वयंसेवी संस्थेने याकामी पुढाकार घेतला असून, आजपर्यंत सुमारे ७० टन वस्तू रेल्वेने पाठविण्यात आल्या आहेत.  केरळमध्ये आलेल्या पुरामुळे लाखो लोक बेघर झाले असून, त्यांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांना पुन्हा उभे करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. देश-विदेशातून केरळवासीयांना मदतीचा ओघ पाठविला जात असला तरी, केरळातील पूरग्रस्तांची नेमकी गरज ओळखून त्यांना मदत पाठविली जावी यासाठी नाशिकमधील केरळ असोसिएशन व भारत भारदी संस्थेचे पदाधिकारी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून झटत आहे. नाशिक जिल्ह्यातून अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना, असोसिएशन, राजकीय पक्ष, दानशूर व्यक्तींनी मिळेल त्या साधनांनी केरळसाठी मदत पाठविण्यास सुरुवात केली असली तरी, सदरची मदत गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचविणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत काही संस्थांकडून जिल्हा प्रशासनाकडे मदत कशी व कुठे पाठवायची याबाबत वारंवार विचारणा केली जात असल्याने गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिकरोड रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून केरळकडे जाणाºया रेल्वेगाड्यांमध्ये मदतीचे साहित्य रवाना करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. त्यानुसार केरळकडे जाणाºया रेल्वेला साहित्य वाहतुकीसाठी विशेष बोगी जोडण्यात आली आहे.  मुंबईहून दररोज कायमकुल्लम, कर्णावल्लम, त्रिवेंद्रम येथे रेल्वे रवाना होत असून, नाशिकहून मंगला एक्स्प्रेस जाते. गेल्या आठ दिवसांपासून भारत भारदी या स्वयंसेवी संस्थेच्या मार्फत केरळवासीयांसाठी मदत गोळा केली जात आहे.  पहिल्या टप्प्यात कपडे, बेडशिट्स, चटई, तयार पीठ, तांदूळ, साखर, दाळ, कपडे, कांदे, ब्लॅकेंट, महिलांसाठी कपडे असे सुमारे ४५ टन साहित्य रवाना करण्यात आले. तर दुसºया टप्प्यात औषधे, लहान मुलांसाठी लागणारे खाद्यपदार्थ, गहू गोळा करण्यात आले असून, २५ टन साहित्य सोमवारी रात्री रवाना करण्यात येणार आहे. केरळ पूरग्रस्तांना नेमके काय हवे याची माहिती केरळ असोसिएशनचे पारधन पिल्लई सातत्याने घेत असून, त्यांचे ५० सहकारी दिवस-रात्र याच कामात व्यस्त आहेत.चारा, ब्लिचिंग पावडरची कमतरताकेरळच्या महापुरात सर्व वाहून गेल्यामुळे याठिकाणी सर्वच जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली असून, जनावरांसाठी चारादेखील पुरामुळे शिल्लक राहिला नसल्याने जनावरांच्या खाद्याचा मोठा प्रश्न सरकारपुढे उभा राहिला आहे. चाºयाअभावी जनावरे दगावण्याची भीती व्यक्त केली जात असल्यामुळे केरळवासीयांकडून चाºयाची मागणी होऊ लागली आहे. याचबरोबर पाणी शुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडर, स्वच्छतेसाठी फिनेल, खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी बल्ब, वायर, स्विचबोर्ड या उपकरणांची गरज निर्माण झाली आहे.केरळ असोसिएशनचा पुढाकारनाशिक शहरात देशातील ३० राज्यांतील लोक विविध ठिकाणी राहात असून, अशा सर्व परप्रांतियांनी एकत्र येऊन भारत भारदी असोसिएशनची स्थापना केली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात या संस्थेने ३० भाषांमध्ये भाविकांशी संवाद व संपर्क साधण्याचे मोठे काम केले होते. सध्या ही असोसिएशन केरळ असोसिएशनच्या बरोबर उभी ठाकली आहे. पारधन पिल्लई हे केरळमधील पूरग्रस्तांशी संपर्क ठेवून असून, दररोज या संस्थेचे ५० सदस्य केरळ पूरग्रस्तांसाठी नेमक्या लागणाºया वस्तू व साधने गोळा करून ते रेल्वेमार्गाने पाठविण्याचे काम करीत आहेत.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरfloodपूर