शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

शेतकरी राजा नव्या जोमाने रब्बीसाठीसज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 17:54 IST

खेडलेझुंगे : खरीप हंगाम पाण्यात गेलेला असतांना रब्बी तरी येईल असा आशावाद जीवाशी बाळगुन असल्याने एका महिन्यातील सर्व दु:ख बाजुला सारत शेतकरी वर्गाने रब्बीच्या हंगामाला सुरवात केल्याचे दिसुन येत आहे. रब्बी हंगामातील पिके पेरणीच्या कामाला वेग आला आहे.

ठळक मुद्देखेडलेझुंगे : भरपुर पाण्यामुळे भाजीपाला, फळभाज्या घेण्यास सुरवात

खेडलेझुंगे : खरीप हंगाम पाण्यात गेलेला असतांना रब्बी तरी येईल असा आशावाद जीवाशी बाळगुन असल्याने एका महिन्यातील सर्व दु:ख बाजुला सारत शेतकरी वर्गाने रब्बीच्या हंगामाला सुरवात केल्याचे दिसुन येत आहे. रब्बी हंगामातील पिके पेरणीच्या कामाला वेग आला आहे.सुरवातीला कडक उन्हाळ्यामुळे शेत पीके पाण्याअभावी जळाली. जुन-जुलै महिना पावसाची वाट पाहण्यात गेला. परतीच्या पावसाने तर कहरच केला. परतीच्या पावसामुळे पिक अक्षरश: सडुन गेलीत. या दोन्ही ऋतुमध्ये फक्त शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पिके जळाली, नंतर अती पाण्यामुळे पिक सडली त्यामुळे शेतकऱ्यांचे दोन्ही हंगमातील पिक वाया गेल्याने शेतकºयांचे अतोनात नुकसान झालेले आहे.परतीच्या पावसामुळे महागडे पिक म्हणुन ओळखले जाणाºया द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. यामध्ये बºयाच शेतकºयांनी द्राक्ष बागा तोडल्या. तसेच उरलेल्या द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकरी जीव ओतुन प्रयत्न करत आहे. दिवसाची सुरवात होण्याआधीच औषध फवारणीचे कामकाजाला सुरवात केल्याचे दिसुन येत आहे. रात्री उशिरापर्यंत शेतकरी शेतात पिकांकडे लक्ष देवुन असतात.खरीप हंगाम पाण्यात गेलेला असतांना रब्बी तरी येईल असा आशावाद जीवाशी बाळगुन असल्याने एका महिन्यातील सर्व दु:ख बाजुला सारत शेतकरी वर्गाने रब्बीच्या हंगामाला सुरवात केल्याचे दिसुन येत आहे.गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे जमीन पडुन असल्याने व जमिनीचा पोत टिकवून असल्याने यंदा पिके चांगलीच बहरली होती. खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असतांना व पीक पूर्ण परिपक्व झालेले असतांना अचानक परतीच्या पावसाने गेल्या मिहन्यात सरासरी पंधरा दिवसांच्यावर मुक्काम ठोकला होता.या अचानक आलेल्या परतीच्या पाऊसरु पी नैसिर्गक संकटाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. सोंगलेले धान्य जमिनीत सडले. शेतात उभे असलेले पीकही सडली. भाजीपाला आण िफळभाज्यांवर विविध रोगांनी थैमान घातले.त्यामुळे शेतकºयांचे अतोनात नुकसान होवुन शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलेला आहे. खरीप हंगामातील जवळपास नव्वद टक्के पिकांचे नुकसान झाले. हे सर्व सहन करत शेतकरी राजा पुन्हा एकदा रब्बी पिके शेतात उभी करण्यासाठी सज्ज झालेला आहे. यंदा भरपुर पाणी असल्याने रब्बी हंगामातील पिके जोमदार होतील अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे.गहु हरभरा आणि भाजीपाल्याला पसंतीअनेक भागांत भौगेलीक रचनेनुसार खरीप हंगाम जोरात होत असला तरी रब्बी मात्र जोरदार होत नाही. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने प्रथमच रब्बी हंगाम जोरात सुरु झाला आहे. रब्बी हंगामात गहू, हरभरा, कांदे ही प्रमुख नगदी पिके घेतली जातात. यंदा पाऊस चांगला पडल्यामुळे रब्बीतही भाजीपाला फळभाज्या घेण्यास शेतकर्यांनी सुरवात केली आहे. अवकाळी पवसाने उन्हाळा कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने कांद्यासाठी शेत पिडक ठेवण्यापेक्षा अनेक शेतकरी गहू हरभरा या पिकांना पसंती देत आहेत.(फोटो २६ खेडलेझुंगे, २६ खेडलेझुंग १)े

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा