शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकरी राजा नव्या जोमाने रब्बीसाठीसज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 17:54 IST

खेडलेझुंगे : खरीप हंगाम पाण्यात गेलेला असतांना रब्बी तरी येईल असा आशावाद जीवाशी बाळगुन असल्याने एका महिन्यातील सर्व दु:ख बाजुला सारत शेतकरी वर्गाने रब्बीच्या हंगामाला सुरवात केल्याचे दिसुन येत आहे. रब्बी हंगामातील पिके पेरणीच्या कामाला वेग आला आहे.

ठळक मुद्देखेडलेझुंगे : भरपुर पाण्यामुळे भाजीपाला, फळभाज्या घेण्यास सुरवात

खेडलेझुंगे : खरीप हंगाम पाण्यात गेलेला असतांना रब्बी तरी येईल असा आशावाद जीवाशी बाळगुन असल्याने एका महिन्यातील सर्व दु:ख बाजुला सारत शेतकरी वर्गाने रब्बीच्या हंगामाला सुरवात केल्याचे दिसुन येत आहे. रब्बी हंगामातील पिके पेरणीच्या कामाला वेग आला आहे.सुरवातीला कडक उन्हाळ्यामुळे शेत पीके पाण्याअभावी जळाली. जुन-जुलै महिना पावसाची वाट पाहण्यात गेला. परतीच्या पावसाने तर कहरच केला. परतीच्या पावसामुळे पिक अक्षरश: सडुन गेलीत. या दोन्ही ऋतुमध्ये फक्त शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पिके जळाली, नंतर अती पाण्यामुळे पिक सडली त्यामुळे शेतकऱ्यांचे दोन्ही हंगमातील पिक वाया गेल्याने शेतकºयांचे अतोनात नुकसान झालेले आहे.परतीच्या पावसामुळे महागडे पिक म्हणुन ओळखले जाणाºया द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. यामध्ये बºयाच शेतकºयांनी द्राक्ष बागा तोडल्या. तसेच उरलेल्या द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकरी जीव ओतुन प्रयत्न करत आहे. दिवसाची सुरवात होण्याआधीच औषध फवारणीचे कामकाजाला सुरवात केल्याचे दिसुन येत आहे. रात्री उशिरापर्यंत शेतकरी शेतात पिकांकडे लक्ष देवुन असतात.खरीप हंगाम पाण्यात गेलेला असतांना रब्बी तरी येईल असा आशावाद जीवाशी बाळगुन असल्याने एका महिन्यातील सर्व दु:ख बाजुला सारत शेतकरी वर्गाने रब्बीच्या हंगामाला सुरवात केल्याचे दिसुन येत आहे.गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे जमीन पडुन असल्याने व जमिनीचा पोत टिकवून असल्याने यंदा पिके चांगलीच बहरली होती. खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असतांना व पीक पूर्ण परिपक्व झालेले असतांना अचानक परतीच्या पावसाने गेल्या मिहन्यात सरासरी पंधरा दिवसांच्यावर मुक्काम ठोकला होता.या अचानक आलेल्या परतीच्या पाऊसरु पी नैसिर्गक संकटाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. सोंगलेले धान्य जमिनीत सडले. शेतात उभे असलेले पीकही सडली. भाजीपाला आण िफळभाज्यांवर विविध रोगांनी थैमान घातले.त्यामुळे शेतकºयांचे अतोनात नुकसान होवुन शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलेला आहे. खरीप हंगामातील जवळपास नव्वद टक्के पिकांचे नुकसान झाले. हे सर्व सहन करत शेतकरी राजा पुन्हा एकदा रब्बी पिके शेतात उभी करण्यासाठी सज्ज झालेला आहे. यंदा भरपुर पाणी असल्याने रब्बी हंगामातील पिके जोमदार होतील अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे.गहु हरभरा आणि भाजीपाल्याला पसंतीअनेक भागांत भौगेलीक रचनेनुसार खरीप हंगाम जोरात होत असला तरी रब्बी मात्र जोरदार होत नाही. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने प्रथमच रब्बी हंगाम जोरात सुरु झाला आहे. रब्बी हंगामात गहू, हरभरा, कांदे ही प्रमुख नगदी पिके घेतली जातात. यंदा पाऊस चांगला पडल्यामुळे रब्बीतही भाजीपाला फळभाज्या घेण्यास शेतकर्यांनी सुरवात केली आहे. अवकाळी पवसाने उन्हाळा कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने कांद्यासाठी शेत पिडक ठेवण्यापेक्षा अनेक शेतकरी गहू हरभरा या पिकांना पसंती देत आहेत.(फोटो २६ खेडलेझुंगे, २६ खेडलेझुंग १)े

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा