शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी राजा नव्या जोमाने रब्बीसाठीसज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 17:54 IST

खेडलेझुंगे : खरीप हंगाम पाण्यात गेलेला असतांना रब्बी तरी येईल असा आशावाद जीवाशी बाळगुन असल्याने एका महिन्यातील सर्व दु:ख बाजुला सारत शेतकरी वर्गाने रब्बीच्या हंगामाला सुरवात केल्याचे दिसुन येत आहे. रब्बी हंगामातील पिके पेरणीच्या कामाला वेग आला आहे.

ठळक मुद्देखेडलेझुंगे : भरपुर पाण्यामुळे भाजीपाला, फळभाज्या घेण्यास सुरवात

खेडलेझुंगे : खरीप हंगाम पाण्यात गेलेला असतांना रब्बी तरी येईल असा आशावाद जीवाशी बाळगुन असल्याने एका महिन्यातील सर्व दु:ख बाजुला सारत शेतकरी वर्गाने रब्बीच्या हंगामाला सुरवात केल्याचे दिसुन येत आहे. रब्बी हंगामातील पिके पेरणीच्या कामाला वेग आला आहे.सुरवातीला कडक उन्हाळ्यामुळे शेत पीके पाण्याअभावी जळाली. जुन-जुलै महिना पावसाची वाट पाहण्यात गेला. परतीच्या पावसाने तर कहरच केला. परतीच्या पावसामुळे पिक अक्षरश: सडुन गेलीत. या दोन्ही ऋतुमध्ये फक्त शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पिके जळाली, नंतर अती पाण्यामुळे पिक सडली त्यामुळे शेतकऱ्यांचे दोन्ही हंगमातील पिक वाया गेल्याने शेतकºयांचे अतोनात नुकसान झालेले आहे.परतीच्या पावसामुळे महागडे पिक म्हणुन ओळखले जाणाºया द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. यामध्ये बºयाच शेतकºयांनी द्राक्ष बागा तोडल्या. तसेच उरलेल्या द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकरी जीव ओतुन प्रयत्न करत आहे. दिवसाची सुरवात होण्याआधीच औषध फवारणीचे कामकाजाला सुरवात केल्याचे दिसुन येत आहे. रात्री उशिरापर्यंत शेतकरी शेतात पिकांकडे लक्ष देवुन असतात.खरीप हंगाम पाण्यात गेलेला असतांना रब्बी तरी येईल असा आशावाद जीवाशी बाळगुन असल्याने एका महिन्यातील सर्व दु:ख बाजुला सारत शेतकरी वर्गाने रब्बीच्या हंगामाला सुरवात केल्याचे दिसुन येत आहे.गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे जमीन पडुन असल्याने व जमिनीचा पोत टिकवून असल्याने यंदा पिके चांगलीच बहरली होती. खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असतांना व पीक पूर्ण परिपक्व झालेले असतांना अचानक परतीच्या पावसाने गेल्या मिहन्यात सरासरी पंधरा दिवसांच्यावर मुक्काम ठोकला होता.या अचानक आलेल्या परतीच्या पाऊसरु पी नैसिर्गक संकटाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. सोंगलेले धान्य जमिनीत सडले. शेतात उभे असलेले पीकही सडली. भाजीपाला आण िफळभाज्यांवर विविध रोगांनी थैमान घातले.त्यामुळे शेतकºयांचे अतोनात नुकसान होवुन शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलेला आहे. खरीप हंगामातील जवळपास नव्वद टक्के पिकांचे नुकसान झाले. हे सर्व सहन करत शेतकरी राजा पुन्हा एकदा रब्बी पिके शेतात उभी करण्यासाठी सज्ज झालेला आहे. यंदा भरपुर पाणी असल्याने रब्बी हंगामातील पिके जोमदार होतील अशी अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे.गहु हरभरा आणि भाजीपाल्याला पसंतीअनेक भागांत भौगेलीक रचनेनुसार खरीप हंगाम जोरात होत असला तरी रब्बी मात्र जोरदार होत नाही. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने प्रथमच रब्बी हंगाम जोरात सुरु झाला आहे. रब्बी हंगामात गहू, हरभरा, कांदे ही प्रमुख नगदी पिके घेतली जातात. यंदा पाऊस चांगला पडल्यामुळे रब्बीतही भाजीपाला फळभाज्या घेण्यास शेतकर्यांनी सुरवात केली आहे. अवकाळी पवसाने उन्हाळा कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने कांद्यासाठी शेत पिडक ठेवण्यापेक्षा अनेक शेतकरी गहू हरभरा या पिकांना पसंती देत आहेत.(फोटो २६ खेडलेझुंगे, २६ खेडलेझुंग १)े

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा