शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना कंपनीकडून धनादेश अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 16:34 IST

विंचूर : येथील शिवसाई एक्स्पोर्ट फर्म कंपनीच्या कंत्राटदाराने चार महिन्यांपासून शेतकर्‍यांचे रखडलेले शेतमालाचे पेमेंट न दिल्याने अखेर कंपनी मालकाने शेतकर्‍यांना कंपनीत बोलावून धनादेशाद्वारे १३ लाखांचे पेमेंट अदा केले. त्यामुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर कंपनी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे.

ठळक मुद्देविंचूर : शिवसाई कंपनी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करणार

विंचूर : येथील शिवसाई एक्स्पोर्ट फर्म कंपनीच्या कंत्राटदाराने चार महिन्यांपासून शेतकर्‍यांचे रखडलेले शेतमालाचे पेमेंट न दिल्याने अखेर कंपनी मालकाने शेतकर्‍यांना कंपनीत बोलावून धनादेशाद्वारे १३ लाखांचे पेमेंट अदा केले. त्यामुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर कंपनी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे.शिवसाई एक्सपोर्ट कंपनीने शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराला वेळेत पेमेंट दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याप्रकरणी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांत अधिकारी व लासलगाव पोलीस ठाणे येथे कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कंपनीचे मालक, व्यवस्थापक व शेतकऱ्यांना बोलावून बैठक घेत दाखल झालेल्या तक्रारीबाबत आढावा घेतला. यावेळी शिवसाई एक्सपोर्ट कंपनीचे मालक संभा शिवाराव, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश चौधरी, सनदी लेखापाल शिवदास आव्हाड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.कंत्राटदाराने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे पैसे न देता फसवणूक केली आहे. याबाबत कंपनीच्या वतीने कंत्राटदाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असून, कंपनी शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे आठ दिवसांच्या आत देईल, असे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. तसेच आजवर चार वर्षात कंपनीने २४० कोटी रुपयांचा मोबदला शेतकऱ्यांना दिला असून, कंत्राटदाराने शेतकऱ्यांची १३ लाख रुपयांची फसवणूक केली. यातून कंपनीला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन कंपनीने नेमलेल्या कंत्राटदाराकडून शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. त्या कंत्राटदारावर कंपनीकडून कारवाई करण्यात येणार असून, त्याच्याकडून शेतकऱ्यांच्या पैशांची वसुली करण्यात येणार आहे. शिवसाई एक्सपोर्टकडून शेतकऱ्यांचा २० तारखेपर्यंत मोबदला देण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कंपनी मालक व व्यवस्थापक यांनी शेतकर्‍यांना दिनांक १९ रोजी कंपनीत बोलावून त्यांच्या शेतमालाचे पैसे धनादेशाद्वारे अदा केले. कंपनीने यापुढे अशी वेळ येणार नसून, शेतकर्‍यांची कुठलीही फसवणूक होणार नाही तसेच कंत्राटदाराऐवजी कंपनीचे प्रतिनिधी नेमणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी निफाड, चांदवड, येवला, कोपरगाव तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार