शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पाटविहीरकरांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 17:40 IST

कळवण : पुनंद प्रकल्प अंतर्गत सुळे उजव्या कालव्यासाठी पाटविहीरकरांची १२ वर्षापूर्वी जमीन संपादित केली, सिंचनाची सोय होईल म्हणून कुणीही कालव्यांना विरोध केला नाही.

कळवण : पुनंद प्रकल्प अंतर्गत सुळे उजव्या कालव्यासाठी पाटविहीरकरांची १२ वर्षापूर्वी जमीन संपादित केली, सिंचनाची सोय होईल म्हणून कुणीही कालव्यांना विरोध केला नाही. कालव्यांना शेतजमीन सढळ हाताने दिली तरी त्याचा मोबदला अद्याप मिळाला नाही. कालव्याच्या कामांची कहाणी होऊन कालवे झाले पण शेतापर्यंत काय गावापर्यंत अद्याप पाणीच पोहोचलेच नाही. त्यामुळे आज गावाला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळे पुनंदमधून आधी आम्हांला पाणी द्या मग इतरांचा विचार सरकारने करावा, तहानलेल्या आदिवासींची तहान भागवा एवढीच अपेक्षा पाटविहीरच्या आदिवासी जनतेने व्यक्त आहे१३ वर्षांपूर्वी पुनंद प्रकल्पांतर्गत सुळे येथील सिद्धेश्वर बंधाऱ्यापासून सुळे उजव्या कालवा काढण्यात आला. २१ कि.मी.चा कालवा पाटविहीर गावापर्यंत येतो. परंतु या कालव्याच्या कामात अनेक त्रुटी राहिल्याने त्याची झळ या भागातील जनतेला बसत असून आज दुष्काळाशी दोन हात करत या गावातील महिला पाणी टंचाईचा मुकाबला करीत आहे. सुळे उजव्या कालव्याची दुरु स्ती होऊन देखील पाटविहीर गावापर्यंत पाणी पोहचू शकले नाही. आता पुन्हा दुरु स्ती व अन्य कामे चालू आहे. या कालव्याचे पाणी पाटविहीर गावापर्यंत आल्यास येथील दुष्काळ कायमस्वरूपी संपणार आहे.आज पाटविहीर गावात भीषण पाणी टंचाई आहे.आदिवासी महिलांना मिळेल त्या ठिकाणाहून पायपीट करीत पाणी आणावे लागत आहे.

टॅग्स :Waterपाणी