शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

पाथरेकरांचा विरोध कायम

By admin | Updated: August 26, 2016 00:08 IST

समृद्धी महामार्ग : सायाळे व वावीकरांच्या अटी, शर्ती

सिन्नर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी महसूल, रस्ते व विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील पाथरे, सायाळे व वावी येथे शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. पाथरे येथील शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास तीव्र विरोध करीत चर्चा करण्यास नकार देत बैठकीतून काढता पाय घेतला. सायाळे व वावी येथील शेतकऱ्यांनी भूसंचयन (लॅण्ड पुलिंग) न करता भूसंपादन करून एकरकमी मोबदला देण्याची मागणी करीत अनेक अटी व शर्ती मांडल्या. भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता ए. एस. खैरे, नाशिकचे कार्यकारी अभियंता चिंतामण धोत्रे, अहमदनगरचे कार्यकारी अभियंता प्रभाकर भोईर, तहसीलदार मनोजकुमार खैरनार, नायब तहसीलदार प्रशांत पाटील, लॅण्ड पुलिंग अधिकारी नामदेव जाधव यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाथरे, सायाळे व वावी येथे शेतकऱ्यांची बैठक घेतली. प्रत्येक बैठकीत उपजिल्हाधिकारी सोनवणे यांनी भूसंचयन (लॅण्ड पुलिंग) चा शासन निर्णय वाचून दाखविला. लॅण्ड पुलिंगमुळे शेतकऱ्यांना कोणते फायदे मिळणार आहेत, याची माहिती दिली. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय भूसंपादनाचा निर्णय घेतला जाणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. शेतकऱ्यांचे जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत दहा बैठका घ्याव्या लागल्या तरी चालेल; मात्र एकतर्फी निर्णय घेतला जाणार नसल्याचे उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी वावी व सायाळे येथील शेतकऱ्यांच्या बैठकीत सांगितले. यापूर्वी उपग्रहाद्वारे सर्व्हे करण्यात आल्याने काही गटक्रमांक चुकले असतील; मात्र आता ड्रोनद्वारे करण्यात येणाऱ्या मोजणीला सहकार्य करण्याचे आवाहन उपस्थित अधिकाऱ्यांनी केले. जमीन भूसंचयन करण्याबाबतचे बंधपत्र जिल्हाधिकारी करून देणार आहेत. त्यामुळे फसवणूक होणार नाही, विश्वास ठेवा असे आवाहन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले. भूसंचयन न करता भूसंपादन करून शेतकऱ्यांना एकरकमी मोबदला द्या, अशी मागणी सायाळे व वावी येथील बैठकीत शेतकऱ्यांनी केली. दोन लाख रुपये प्रतिगुंठा दराने जमिनीला भाव द्या, प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांच्या मुलांना शासकीय नोकरी द्या, नोडमध्ये विकसित जमीन द्या, अशा अटी व शर्ती शेतकऱ्यांनी यावेळी मांडल्या. दुशिंगपूर येथील बंधाऱ्यासाठी यापूर्वी मोठी जमीन संपादित करण्यात आली आहे. सदर महामार्ग या बंधाऱ्यातून जात असल्याचे दिसते असे रामनाथ ढमाले यांनी सांगितले. शासन एकीकडे जलसमृद्धीसाठी योजना राबवित असताना या महामार्गासाठी सदर बंधारा बुजवणार का, असा संतप्त सवाल ढमाले यांनी उपस्थित केला. यावेळी अरुण भरीतकर, इलाहीबक्ष शेख, अ‍ॅड. प्रमोद ढमाले यांच्यासह शेतकऱ्यांनी विविध समस्या मांडून प्रश्न उपस्थित केले. वावी येथील बैठकीस संपत पठाडे, विठ्ठल उगले, मंदार केसकर, संतोष जोशी, बाबा कांदळकर, विजय गुरुळे, पवन भेंडाळे, चांगदेव ढमाले, नवनाथ घेगडमल, ज्ञानेश्वर लोंढे यांच्यासह दुशिंगपूर, कहांडवाडी, वावी व फुलेनगर येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सायाळे येथील बैठकीत शेतकऱ्यांनी भूसंचयन न करता भूसंपादन करा पण एकरकमी मोबदला द्या, अशी मागणी केली. यावेळी सरपंच पंडित चासकर, सुधाकर शिंदे, तुकाराम शिंदे, मलढोणचे शिवाजी हालवर, जगन शेंडगे, मच्छिंद्र शिंदे, तानाजी शिंदे यांच्यासह सायाळे व मलढोण येथील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)