शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाथरेकरांचा विरोध कायम

By admin | Updated: August 26, 2016 00:08 IST

समृद्धी महामार्ग : सायाळे व वावीकरांच्या अटी, शर्ती

सिन्नर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी महसूल, रस्ते व विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील पाथरे, सायाळे व वावी येथे शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. पाथरे येथील शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास तीव्र विरोध करीत चर्चा करण्यास नकार देत बैठकीतून काढता पाय घेतला. सायाळे व वावी येथील शेतकऱ्यांनी भूसंचयन (लॅण्ड पुलिंग) न करता भूसंपादन करून एकरकमी मोबदला देण्याची मागणी करीत अनेक अटी व शर्ती मांडल्या. भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता ए. एस. खैरे, नाशिकचे कार्यकारी अभियंता चिंतामण धोत्रे, अहमदनगरचे कार्यकारी अभियंता प्रभाकर भोईर, तहसीलदार मनोजकुमार खैरनार, नायब तहसीलदार प्रशांत पाटील, लॅण्ड पुलिंग अधिकारी नामदेव जाधव यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाथरे, सायाळे व वावी येथे शेतकऱ्यांची बैठक घेतली. प्रत्येक बैठकीत उपजिल्हाधिकारी सोनवणे यांनी भूसंचयन (लॅण्ड पुलिंग) चा शासन निर्णय वाचून दाखविला. लॅण्ड पुलिंगमुळे शेतकऱ्यांना कोणते फायदे मिळणार आहेत, याची माहिती दिली. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय भूसंपादनाचा निर्णय घेतला जाणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. शेतकऱ्यांचे जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत दहा बैठका घ्याव्या लागल्या तरी चालेल; मात्र एकतर्फी निर्णय घेतला जाणार नसल्याचे उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी वावी व सायाळे येथील शेतकऱ्यांच्या बैठकीत सांगितले. यापूर्वी उपग्रहाद्वारे सर्व्हे करण्यात आल्याने काही गटक्रमांक चुकले असतील; मात्र आता ड्रोनद्वारे करण्यात येणाऱ्या मोजणीला सहकार्य करण्याचे आवाहन उपस्थित अधिकाऱ्यांनी केले. जमीन भूसंचयन करण्याबाबतचे बंधपत्र जिल्हाधिकारी करून देणार आहेत. त्यामुळे फसवणूक होणार नाही, विश्वास ठेवा असे आवाहन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले. भूसंचयन न करता भूसंपादन करून शेतकऱ्यांना एकरकमी मोबदला द्या, अशी मागणी सायाळे व वावी येथील बैठकीत शेतकऱ्यांनी केली. दोन लाख रुपये प्रतिगुंठा दराने जमिनीला भाव द्या, प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांच्या मुलांना शासकीय नोकरी द्या, नोडमध्ये विकसित जमीन द्या, अशा अटी व शर्ती शेतकऱ्यांनी यावेळी मांडल्या. दुशिंगपूर येथील बंधाऱ्यासाठी यापूर्वी मोठी जमीन संपादित करण्यात आली आहे. सदर महामार्ग या बंधाऱ्यातून जात असल्याचे दिसते असे रामनाथ ढमाले यांनी सांगितले. शासन एकीकडे जलसमृद्धीसाठी योजना राबवित असताना या महामार्गासाठी सदर बंधारा बुजवणार का, असा संतप्त सवाल ढमाले यांनी उपस्थित केला. यावेळी अरुण भरीतकर, इलाहीबक्ष शेख, अ‍ॅड. प्रमोद ढमाले यांच्यासह शेतकऱ्यांनी विविध समस्या मांडून प्रश्न उपस्थित केले. वावी येथील बैठकीस संपत पठाडे, विठ्ठल उगले, मंदार केसकर, संतोष जोशी, बाबा कांदळकर, विजय गुरुळे, पवन भेंडाळे, चांगदेव ढमाले, नवनाथ घेगडमल, ज्ञानेश्वर लोंढे यांच्यासह दुशिंगपूर, कहांडवाडी, वावी व फुलेनगर येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सायाळे येथील बैठकीत शेतकऱ्यांनी भूसंचयन न करता भूसंपादन करा पण एकरकमी मोबदला द्या, अशी मागणी केली. यावेळी सरपंच पंडित चासकर, सुधाकर शिंदे, तुकाराम शिंदे, मलढोणचे शिवाजी हालवर, जगन शेंडगे, मच्छिंद्र शिंदे, तानाजी शिंदे यांच्यासह सायाळे व मलढोण येथील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)