शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
3
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
4
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
5
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
6
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
7
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
8
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
9
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
10
आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
11
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
12
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
13
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
14
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
15
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
16
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
17
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
18
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
19
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
20
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांना सोसावा लागतो फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:39 IST

कोरोनामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चार महिने सर्व प्रवासी वाहतूक करणाऱ्या रेल्वे हे बंद होत्या. ...

कोरोनामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चार महिने सर्व प्रवासी वाहतूक करणाऱ्या रेल्वे हे बंद होत्या. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने हळूहळू कोविड व फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे सुरू केल्यात. कोविड स्पेशल रेल्वेला नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारणी केली आहे. मात्र फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेला तत्काळचे भाडे आकारले जात आहे. तसेच सर्वसाधारण तिकीट बंद असून आरक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच मासिक पास, ज्येष्ठ नागरिक व इतर घटकांच्या सवलती बंद करण्यात आल्या आहेत. दिव्यांग, मूकबधिर, कॅन्सरग्रस्त फक्त यांनाच रेल्वेने सवलत दिली आहे.

आरक्षण तिकीट कन्फर्म असेल तरच प्रवासी प्रवास करू शकतो. आरक्षण तिकीट वेटिंग लिस्टमध्ये असेल तर ज्या रेल्वेस्थानकावरून प्रवासी बसणार होता, त्या रेल्वे स्थानकावर येणारी संबंधित रेल्वे येण्याच्या ३० मिनिट अगोदर वेटिंग लिस्टमधील तिकीट रद्द करावे लागते. तिकीट रद्द करताना कमीत कमी साठ रुपये कपात केली जाते. रेल्वे येण्याच्या अर्धा तासानंतर म्हणजेच २९ मिनिटापासून वेटिंग लिस्ट तिकीट रद्द न केल्यास त्या प्रवासाला कुठलाच रिफंड मिळत नाही. आरक्षण काढताना प्रवाशांना ज्या गावाला जायचे आहे येथील पूर्ण पत्ता दिल्याशिवाय आरक्षण मिळत नाही.

पॅसेंजर व आजूबाजूच्या जिल्ह्यात जाण्यासाठी काही महत्त्वाच्या असलेल्या एक्सप्रेस अद्याप सुरू न झाल्याने प्रवाशांना जास्त भाडे सोसावे लागत आहे. सर्वसाधारण तिकीट काढले तरी आरक्षण काढावेच लागते तसेच सुपरफास्ट चार्जदेखील भरावा लागतो. पंचवटी एक्सप्रेसने नाशिक रोडवरून मुंबईला जाणारे पासधारक यापूर्वी ६१० रुपयात महिनाभर जाऊ शकत होते. मात्र आता मासिक पासची सवलत बंद असल्याने नाशिक रोडवरून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशाला दररोज येण्या-जाण्यासाठी २१० रुपये खर्च करावे लागत आहे. पॅसेंजर गाडीने नाशिक रोड वरून इगतपुरीला जाण्यासाठी सर्वसाधारण डब्यात यापूर्वी प्रवाशाला पंधरा रुपयांचे तिकीट काढावे लागत होते. मात्र आता त्या प्रवासाला फेस्टिवल स्पेशल रेल्वेतून दुप्पट- तिप्पट भाडे आकारून प्रवास करावा लागतो. गोदावरी एक्सप्रेस, मनमाड-पुणे हुतात्मा एक्सप्रेस, देवळाली-भुसावळ, इगतपुरी-भुसावळ, मुंबई-भुसावळ, मनमाड-इगतपुरी पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने प्रवाशांची फार मोठी गैरसोय होत आहे.

अप-डाऊनमार्गे एकूण ५० रेल्वे सुरू

नाशिक रोडमार्गे यापूर्वी दररोज २९ व आठवड्यातील काही दिवस धावणाऱ्या रेल्वे पकडून अप-डाऊन मार्गे एकूण ८० रेल्वे धावत होत्या. मात्र आता स्पेशल व कोविड स्पेशल रेल्वे एकूण अप-डाऊन मार्ग एकूण ५० रेल्वे धावत आहेत.

प्रतिक्रिया====

मासिक पास ज्येष्ठ नागरिक सवलत व इतर सवलत रेल्वेने बंद केल्याने प्रवाशांना जास्त दराने तिकीट घेऊन प्रवास करावा लागत आहे. व्यवसाय, नोकरी व इतर कामासाठी मुंबई-ठाण्याला दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. तसेच अनेक महत्त्वाच्या काही एक्सप्रेस व पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने प्रवाशांना आरक्षणासोबत सुपरफास्ट चार्जचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

- राजू फोकणे

मुंबई पासधारक प्रवासी संघटना

-------

रेल्वेमध्ये प्रवास करताना आरक्षण सक्तीचे केल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आरक्षणाच्या खर्चासह ऐनवेळी तिकीट कन्फर्म न झाल्यास तिकीट रद्द करताना पैसे कापले जातात. त्यामुळे सर्वप्रकारे फायदा रेल्वेचा होत आहे. प्रवाशांना मात्र मोठी आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. रेल्वे प्रशासनाने सर्व परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने पूर्वीसारखी सवलत प्रवाशांना सुरू करण्याची गरज आहे.

प्रा. किरण बोरसे, रेल्वे प्रवासी