शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

पाशा पटेल यांचा चांदवड तालुका दुष्काळी पाहणी दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 18:28 IST

चांदवड तालुक्याच्या मंगरुळ व भरवीर या दुष्काळी भागाची पहाणी करण्यासाठी केंद्रीय कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी चांदवड तालुक्यातील मका, सोयाबीन, द्राक्ष, कांदा , टोमॅटो या पीकांची पहाणी केली

चांदवड- चांदवड तालुक्याच्या मंगरुळ व भरवीर या दुष्काळी भागाची पहाणी करण्यासाठी केंद्रीय कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी चांदवड तालुक्यातील मका, सोयाबीन, द्राक्ष, कांदा , टोमॅटो या पीकांची पहाणी केली यावेळी शेतकऱ्यांनी सोयाबीन व मक्याच्या खरेदीसाठी शासनाने त्वरीत चांदवड तालुका दुष्काळी जाहीर करावा व शेतकºयांच्या हाताला काम द्यावे अशी मागणी केली . तर यावेळी चांदवड तालुका दुष्काळी जाहीर करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करुन मका व सोयाबीनच्या खरेदीबाबत संबधीतांशी बोलू असे आश्वासन पाशा पटेल यांनी शेतकºयांना दिले. चांदवड तालुक्यात पावसाने जवळपास दोन महिन्यापासून दडी मारल्याने हाताशी आलेली पिके जळुन खाक झाली.सुरुवातीला जेमतेम पावसावर शेतकºयांनी मका, सोयाबीन भुईमुग, कांदा , टोमॅटो झेंडू व इतर पिकाची लागवड केली. पावसाळ्याच्या सुरुवातीला जेमतेम पाऊस पडला. त्यामुळे शेतकºयांची बी.बीयाणे लावून मोठ्या प्रमाणात हायब्रीड पिकांची खरेदी करुन शंभर टक्के पेरणी केली.पिके ऐन भरत आल्यानंतर जवळपास दोन महिन्यापासून निसर्गाने दडी मारल्याने पिकामध्ये दाने न भरल्यामुळे जळुन खाक झाली.उधार उसनवारी व खाजगी व्यक्तीकडून उसनवारी करुन पैसे घेऊन व प्रसंगी दाग दागिणे गहाण ठेऊन शेतकºयांनी पिके उभी करण्यासाठी भरमसाठ पैसा खर्च केला.परंतु शेतीमधुन एक रुपया देखील परत मिळेल अशी परिस्थिती राहीली नाही . शेतकºयांच्या विहीरी कोरड्या ठाक असून बोअरवेल देखील आटली आहेत. नदयाना व धरणामध्ये एक थेंब पाणी शिल्लक नाही. परतीचा पावसाळा देखील संपत आला.तरी पाऊस पडला नाही. याची खात्रीपटल्याने शेतकºयामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कुंटूब चालविण्यासाठी पैसा नाही. पिण्यासाठी व जनावरांसाठी ही पाणी नाही. त्यामुळे पुढील काळ कसा घालवावा या विंवेचनेत शेतकरी सापडला आहे. चांदवड तालुक्यात कांदा हे पैशाचे नगदी पिक असून सुरुवातीच्या जेमतेम पावसावर लोकांनी आठ हजार रुपये एकराने कांदाची लागवड केली परंतु कांदा लावल्यानंतर कांद्याला पाणी देण्यासाठी विहीरी व बोअरवेल मध्ये थेंबभर पाणी नाही. त्यामुळे मोठ्या आशेने उभे केलेले कांद्याचे पीक जळून खाक होत आहे. याकडे त्वरीत लक्ष देऊ असे आश्वासन पाशा पटेल यांनी दिले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रdroughtदुष्काळ