शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पाशा पटेल यांचा चांदवड तालुका दुष्काळी पाहणी दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 18:28 IST

चांदवड तालुक्याच्या मंगरुळ व भरवीर या दुष्काळी भागाची पहाणी करण्यासाठी केंद्रीय कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी चांदवड तालुक्यातील मका, सोयाबीन, द्राक्ष, कांदा , टोमॅटो या पीकांची पहाणी केली

चांदवड- चांदवड तालुक्याच्या मंगरुळ व भरवीर या दुष्काळी भागाची पहाणी करण्यासाठी केंद्रीय कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी चांदवड तालुक्यातील मका, सोयाबीन, द्राक्ष, कांदा , टोमॅटो या पीकांची पहाणी केली यावेळी शेतकऱ्यांनी सोयाबीन व मक्याच्या खरेदीसाठी शासनाने त्वरीत चांदवड तालुका दुष्काळी जाहीर करावा व शेतकºयांच्या हाताला काम द्यावे अशी मागणी केली . तर यावेळी चांदवड तालुका दुष्काळी जाहीर करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करुन मका व सोयाबीनच्या खरेदीबाबत संबधीतांशी बोलू असे आश्वासन पाशा पटेल यांनी शेतकºयांना दिले. चांदवड तालुक्यात पावसाने जवळपास दोन महिन्यापासून दडी मारल्याने हाताशी आलेली पिके जळुन खाक झाली.सुरुवातीला जेमतेम पावसावर शेतकºयांनी मका, सोयाबीन भुईमुग, कांदा , टोमॅटो झेंडू व इतर पिकाची लागवड केली. पावसाळ्याच्या सुरुवातीला जेमतेम पाऊस पडला. त्यामुळे शेतकºयांची बी.बीयाणे लावून मोठ्या प्रमाणात हायब्रीड पिकांची खरेदी करुन शंभर टक्के पेरणी केली.पिके ऐन भरत आल्यानंतर जवळपास दोन महिन्यापासून निसर्गाने दडी मारल्याने पिकामध्ये दाने न भरल्यामुळे जळुन खाक झाली.उधार उसनवारी व खाजगी व्यक्तीकडून उसनवारी करुन पैसे घेऊन व प्रसंगी दाग दागिणे गहाण ठेऊन शेतकºयांनी पिके उभी करण्यासाठी भरमसाठ पैसा खर्च केला.परंतु शेतीमधुन एक रुपया देखील परत मिळेल अशी परिस्थिती राहीली नाही . शेतकºयांच्या विहीरी कोरड्या ठाक असून बोअरवेल देखील आटली आहेत. नदयाना व धरणामध्ये एक थेंब पाणी शिल्लक नाही. परतीचा पावसाळा देखील संपत आला.तरी पाऊस पडला नाही. याची खात्रीपटल्याने शेतकºयामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कुंटूब चालविण्यासाठी पैसा नाही. पिण्यासाठी व जनावरांसाठी ही पाणी नाही. त्यामुळे पुढील काळ कसा घालवावा या विंवेचनेत शेतकरी सापडला आहे. चांदवड तालुक्यात कांदा हे पैशाचे नगदी पिक असून सुरुवातीच्या जेमतेम पावसावर लोकांनी आठ हजार रुपये एकराने कांदाची लागवड केली परंतु कांदा लावल्यानंतर कांद्याला पाणी देण्यासाठी विहीरी व बोअरवेल मध्ये थेंबभर पाणी नाही. त्यामुळे मोठ्या आशेने उभे केलेले कांद्याचे पीक जळून खाक होत आहे. याकडे त्वरीत लक्ष देऊ असे आश्वासन पाशा पटेल यांनी दिले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रdroughtदुष्काळ