शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाशा पटेल यांचा चांदवड तालुका दुष्काळी पाहणी दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 18:28 IST

चांदवड तालुक्याच्या मंगरुळ व भरवीर या दुष्काळी भागाची पहाणी करण्यासाठी केंद्रीय कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी चांदवड तालुक्यातील मका, सोयाबीन, द्राक्ष, कांदा , टोमॅटो या पीकांची पहाणी केली

चांदवड- चांदवड तालुक्याच्या मंगरुळ व भरवीर या दुष्काळी भागाची पहाणी करण्यासाठी केंद्रीय कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी चांदवड तालुक्यातील मका, सोयाबीन, द्राक्ष, कांदा , टोमॅटो या पीकांची पहाणी केली यावेळी शेतकऱ्यांनी सोयाबीन व मक्याच्या खरेदीसाठी शासनाने त्वरीत चांदवड तालुका दुष्काळी जाहीर करावा व शेतकºयांच्या हाताला काम द्यावे अशी मागणी केली . तर यावेळी चांदवड तालुका दुष्काळी जाहीर करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करुन मका व सोयाबीनच्या खरेदीबाबत संबधीतांशी बोलू असे आश्वासन पाशा पटेल यांनी शेतकºयांना दिले. चांदवड तालुक्यात पावसाने जवळपास दोन महिन्यापासून दडी मारल्याने हाताशी आलेली पिके जळुन खाक झाली.सुरुवातीला जेमतेम पावसावर शेतकºयांनी मका, सोयाबीन भुईमुग, कांदा , टोमॅटो झेंडू व इतर पिकाची लागवड केली. पावसाळ्याच्या सुरुवातीला जेमतेम पाऊस पडला. त्यामुळे शेतकºयांची बी.बीयाणे लावून मोठ्या प्रमाणात हायब्रीड पिकांची खरेदी करुन शंभर टक्के पेरणी केली.पिके ऐन भरत आल्यानंतर जवळपास दोन महिन्यापासून निसर्गाने दडी मारल्याने पिकामध्ये दाने न भरल्यामुळे जळुन खाक झाली.उधार उसनवारी व खाजगी व्यक्तीकडून उसनवारी करुन पैसे घेऊन व प्रसंगी दाग दागिणे गहाण ठेऊन शेतकºयांनी पिके उभी करण्यासाठी भरमसाठ पैसा खर्च केला.परंतु शेतीमधुन एक रुपया देखील परत मिळेल अशी परिस्थिती राहीली नाही . शेतकºयांच्या विहीरी कोरड्या ठाक असून बोअरवेल देखील आटली आहेत. नदयाना व धरणामध्ये एक थेंब पाणी शिल्लक नाही. परतीचा पावसाळा देखील संपत आला.तरी पाऊस पडला नाही. याची खात्रीपटल्याने शेतकºयामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कुंटूब चालविण्यासाठी पैसा नाही. पिण्यासाठी व जनावरांसाठी ही पाणी नाही. त्यामुळे पुढील काळ कसा घालवावा या विंवेचनेत शेतकरी सापडला आहे. चांदवड तालुक्यात कांदा हे पैशाचे नगदी पिक असून सुरुवातीच्या जेमतेम पावसावर लोकांनी आठ हजार रुपये एकराने कांदाची लागवड केली परंतु कांदा लावल्यानंतर कांद्याला पाणी देण्यासाठी विहीरी व बोअरवेल मध्ये थेंबभर पाणी नाही. त्यामुळे मोठ्या आशेने उभे केलेले कांद्याचे पीक जळून खाक होत आहे. याकडे त्वरीत लक्ष देऊ असे आश्वासन पाशा पटेल यांनी दिले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रdroughtदुष्काळ