शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

पार्किंग धोरणामुळे वाढणार गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 01:17 IST

राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यासाठी एकीकृत वाहनतळ धोरण ठरविण्यासंदर्भात गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेली कार्यवाही संपली असून, यासंदर्भातील अहवाल समितीने शासनाला सादर केला आहे.

नाशिक : राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यासाठी एकीकृत वाहनतळ धोरण ठरविण्यासंदर्भात गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेली कार्यवाही संपली असून, यासंदर्भातील अहवाल समितीने शासनाला सादर केला आहे. दरम्यान, एकीकडे हे धोरण आणि दुसरीकडे शासनाने मार्च महिन्यात सर्व शहरासाठी समान बांधकाम नियमावली तयार केली असून, त्यातदेखील वाहनतळाचे वेगळे नियम आहेत. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वाहनतळांचे आणि इमारत बांधताना वाहनतळासाठी जागा सोडण्याचे वेगवेगळे नियम आहेत. नाशिक शहरासाठी २०१७ मध्ये शहर विकास आराखडा भागश: मंजूर करताना बांधकाम नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली तयार करण्यात आली. त्यात नाशिक शहरापुरते वाहनतळाचे नियम वेगळे अत्यंत जाचक आहेत. मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत नाशिकला सर्वाधिक वाहनतळासाठी जागा सोडावी लागत आहे. त्यातच मेकॅनिकल पार्किंग हे अनुज्ञेयच केलेले नाही. त्यामुळे बांधकाम करण्यात अडचणी असून, जवळपास सर्व विकासच ठप्प झाला आहे. नियमावलीत वाहनतळाची जाचक अट शिथिल करावी यासाठी बांधकाम व्यावसायिकांच्या संघटना प्रयत्न करीत आहेत.दरम्यान, राज्य शासनाने तीन वर्षांपूर्वी नवीन वाहनतळ धोरण आखण्याचे ठरविले. त्यानुसार सर्व महापालिकांकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यासंदर्भातील कार्यवाही अंतिम टप्प्यात असतानाच केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्य शासनाने राज्यातील सर्व शहरांसाठी समान बांधकाम नियमावली तयार करण्याचे काम डिसेंबर महिन्यात हाती घेतले. अत्यंत घाईघाईत यासंदर्भातील मसुदा तयार करण्याचे काम करण्यात आले आणिशासनाने वाहनतळ धोरण ठरविण्याची कार्यवाही अगोदरच सुरू केली होती. त्यात ए, बी, सी आणि डी अशी वर्गवारी करण्यात आली असून, नाशिक शहराच्या लोकसंख्येचा विचार करता सी गटात समावेश होता. त्यात सध्या नाशिकमध्ये लागू असलेल्या बांधकाम नियमावलीतील वाहनतळाच्या तरतुदींच्या तुलनेत चांगले नियम आहेत. त्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळू शकतो. राज्य शासनाने समान बांधकाम नियमावली तयार केली असली तरी वाहनतळाचे स्वंतत्र धोरण तयार केल्यास ते या नियमावलीला श्रेष्ठ ठरू शकेल आणि तेच अमलात येईल.- अविनाश शिरोडे, बांधकाम तज्ज्ञ

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाParkingपार्किंग