शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष ‘पानिपत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 23:01 IST

पानिपतच्या लढाईत मराठ्यांना पराभव झाला असला, तरी त्यातील विविध बाजू पुढे येत आहते. पानिपतमध्ये असताना मराठ्यांना पाठवली गेलेली पत्रे नष्ट झाली.

ठळक मुद्देपानिपतमध्ये असताना मराठ्यांना पाठवली गेलेली पत्रे नष्ट झाली. एकतर्फी इतिहासाची मांडणी झाल्याची खंत

नाशिक : ‘पानिपत’च्या इतिहासाकडे नेहमीच दुर्लक्ष केले गेले. यामुळे या इतिहासाच्या वाट्याला उपेक्षा आली. पानिपतच्या युध्दात मराठ्यांचा पराभव जरी झाला असला तरीदेखील त्यांचे शौर्य आणि देदिप्यमान पराक्रमाची साक्ष म्हणून ‘पानिपत’ला विसरता येणे शक्य नाही, असे प्रतिपादन डॉ. उदय कुलकर्णी यांनी केले.ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य न्यासाच्या सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘लेखक तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमात कुलकर्णी ‘पानिपत: १४ जाने.१७६१’ याविषयावर बोलत होते. यावेळी ते म्हणाले, पानिपतच्या लढाईत मराठ्यांना पराभव झाला असला, तरी त्यातील विविध बाजू पुढे येत आहते. पानिपतमध्ये असताना मराठ्यांना पाठवली गेलेली पत्रे नष्ट झाली. त्यामुळे एकतर्फी इतिहासाची मांडणी झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सन १७६१नंतर पानिपत वर कोणीही बोलण्याचा पुढाकार घेतला नाही. परिणामी बेताच्या परिस्थितीत मराठ्यांनी गाजवलेला पराक्रम आणि शौर्य प्रकाशझोतात येऊ शकले नाही. यावेळी कुलकर्णी यांनी सन १७०७ पासून उभी राहिलेली पानिपतच्या लढाईची पार्श्वभूमी लघुफितीद्वारे उपस्थितांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला.औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगलांची सत्ता क्षीण होत गेली व मराठ्यांनी मोठा साम्राज्याचा विस्तार झाल्याचेही ते म्हणाले. अहमदशहा अब्दालीला पैशांची गरज भासू लागली. त्यामुळे त्याने पंजाब, हरियाणामार्गे दिल्लीत धडक दिली. त्याच्या सैन्याशी सदाशिवराव भाऊ पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी कडवी झुंज दिली.

टॅग्स :marathaमराठाNashikनाशिक