शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
4
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
5
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
6
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
7
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
8
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
9
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
10
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
11
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
12
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
13
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
14
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
15
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
16
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
17
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
18
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
19
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
20
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 

करंजवणमध्ये बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 19:30 IST

दिंडोरी : तालुक्यातील करंजवण येथील पिंगळे वस्तीवर बिबट्याने गेल्या पाच दिवसांपासून धुमाकूळ घातला असून, सकाळ, दुपार, संध्याकाळ बिबट्या भाऊसाहेब पिंगळ यांच्या वस्तीवर येण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र या वस्तीवरील व आजूबाजूचे सर्व लोक सतर्क असल्यामुळे व वस्तीवर ग्रामस्थ मोठ्याने आवाज करून बिबट्याला पळून लावत आहे.

ठळक मुद्देनागरिकांकडून पिंजरा लावण्याची मागणी

दिंडोरी : तालुक्यातील करंजवण येथील पिंगळे वस्तीवर बिबट्याने गेल्या पाच दिवसांपासून धुमाकूळ घातला असून, सकाळ, दुपार, संध्याकाळ बिबट्या भाऊसाहेब पिंगळ यांच्या वस्तीवर येण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र या वस्तीवरील व आजूबाजूचे सर्व लोक सतर्क असल्यामुळे व वस्तीवर ग्रामस्थ मोठ्याने आवाज करून बिबट्याला पळून लावत आहे.

यासंदर्भात वनविभागाला अनेकवेळा दूरध्वनीवरून माहिती देऊनही वनविभाग या घटनेकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार रावसाहेब पिंगळे यांनी केली आहे. सध्या या परिसरामध्ये शेतीची कामे जोरात चालू असल्यामुळे व शेतात काम केल्याशिवाय मजुरांना पर्याय नाही; परंतु शेतकऱ्यांसह मजुरांमध्ये बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे करंजवण येथील शाळा चालू झाली आहे. त्यामुळे मळ्यावस्त्यावरील लहान मुले गावात शाळेत जात आहे. मात्र बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठवत नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याने लखमापूर येथील माजी उपसरपंच वाल्मीक मोगल यांच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांवर हल्ला केला होता. त्यामुळे या परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.करंजवण, ओझे, म्हैळुस्के, लखमापूर हा कादवा नदीचा परिसर असून, या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर उसाची शेती आहे. त्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी जागा उपलब्ध आहे. कादवा नदीकाठ परिसरातील गावांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वनविभागाने या भागात पिंजरे लावण्याची आवश्यकता आहे.करंजवण व ओझे परिसरामध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून बिबट्याने कुत्रे, वासरे आशा पाळीव प्राण्यांवर हल्ले केले आहेत, मात्र वनविभागाला वारंवार सूचना देऊनही या बिबट्याची दखल घेतली जात नाही. त्याप्रमाणे वनविभागाचे तालुका वनअधिकारी फोन घेत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यांची प्रशासनाने दखल घेण्याची आवश्यकता आहे. एखादी घटना घडल्यानंतर सर्व वनविभागाचा ताफा तेथे हजर होतो, मात्र घटना घडू नये यासाठी वनविभाग कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाही हे लखमापूरच्या घटनांवरून सिद्ध झाले आहे.

टॅग्स :leopardबिबट्याFarmerशेतकरी