शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

करंजवणमध्ये बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 19:30 IST

दिंडोरी : तालुक्यातील करंजवण येथील पिंगळे वस्तीवर बिबट्याने गेल्या पाच दिवसांपासून धुमाकूळ घातला असून, सकाळ, दुपार, संध्याकाळ बिबट्या भाऊसाहेब पिंगळ यांच्या वस्तीवर येण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र या वस्तीवरील व आजूबाजूचे सर्व लोक सतर्क असल्यामुळे व वस्तीवर ग्रामस्थ मोठ्याने आवाज करून बिबट्याला पळून लावत आहे.

ठळक मुद्देनागरिकांकडून पिंजरा लावण्याची मागणी

दिंडोरी : तालुक्यातील करंजवण येथील पिंगळे वस्तीवर बिबट्याने गेल्या पाच दिवसांपासून धुमाकूळ घातला असून, सकाळ, दुपार, संध्याकाळ बिबट्या भाऊसाहेब पिंगळ यांच्या वस्तीवर येण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र या वस्तीवरील व आजूबाजूचे सर्व लोक सतर्क असल्यामुळे व वस्तीवर ग्रामस्थ मोठ्याने आवाज करून बिबट्याला पळून लावत आहे.

यासंदर्भात वनविभागाला अनेकवेळा दूरध्वनीवरून माहिती देऊनही वनविभाग या घटनेकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार रावसाहेब पिंगळे यांनी केली आहे. सध्या या परिसरामध्ये शेतीची कामे जोरात चालू असल्यामुळे व शेतात काम केल्याशिवाय मजुरांना पर्याय नाही; परंतु शेतकऱ्यांसह मजुरांमध्ये बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे करंजवण येथील शाळा चालू झाली आहे. त्यामुळे मळ्यावस्त्यावरील लहान मुले गावात शाळेत जात आहे. मात्र बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठवत नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याने लखमापूर येथील माजी उपसरपंच वाल्मीक मोगल यांच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांवर हल्ला केला होता. त्यामुळे या परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.करंजवण, ओझे, म्हैळुस्के, लखमापूर हा कादवा नदीचा परिसर असून, या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर उसाची शेती आहे. त्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी जागा उपलब्ध आहे. कादवा नदीकाठ परिसरातील गावांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वनविभागाने या भागात पिंजरे लावण्याची आवश्यकता आहे.करंजवण व ओझे परिसरामध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून बिबट्याने कुत्रे, वासरे आशा पाळीव प्राण्यांवर हल्ले केले आहेत, मात्र वनविभागाला वारंवार सूचना देऊनही या बिबट्याची दखल घेतली जात नाही. त्याप्रमाणे वनविभागाचे तालुका वनअधिकारी फोन घेत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यांची प्रशासनाने दखल घेण्याची आवश्यकता आहे. एखादी घटना घडल्यानंतर सर्व वनविभागाचा ताफा तेथे हजर होतो, मात्र घटना घडू नये यासाठी वनविभाग कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाही हे लखमापूरच्या घटनांवरून सिद्ध झाले आहे.

टॅग्स :leopardबिबट्याFarmerशेतकरी