शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

कावनई किल्ल्याचा काही भाग ढासळल्याने घबराट; जीवितहानी नाही, यंत्रणेची धावपळ

By धनंजय वाखारे | Updated: July 21, 2023 18:09 IST

इगतपुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे.

नाशिक: रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथील घटना ताजी असतानाच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असलेल्या मुघलकालीन कावनई किल्ल्याचा काही भाग शुक्रवारी (दि.२१) ढासळल्याने प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली. सुदैवाने, या किल्ल्याच्या पायथ्याशी वस्ती नसल्याने जिवितहानी झालेली नाही.

इगतपुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास मुघल काळातील कावनई किल्ल्याचा काही भाग कोसळला. त्यामुळे आसपासच्या भागातील शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. सुदैवाने, या किल्ल्याच्या पायथ्याशी कोणतीही वस्ती नसल्याने जिवितहानी टळली. दरम्यान, या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाची यंत्रणा तातडीने घटनास्थळी रवाना झाली. पालकमंत्री दादा भुसे यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला. परिसरातील विटूर्ली शिवारात दोन घर आहेत. त्यातील कुटूंबीयांना तातडीने गावठाण येथे स्थलांतरित केले आहे. तहसीलदार स्वतः त्या ठिकाणी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कावनई किल्ल्याचा भाग कोसळलेला असून सुदैवाने कुठलीही जीवित आणि वित्त हानी झालेली नाही. मी स्वतः तेथील प्रांत, तहसील तसेच स्थानिक नागरिकांशी मोबाइलद्वारे बोललो आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत. सद्या पावसाचे वातावरण असल्याने ट्रेकर्सने देखील टेकडी, किल्ले किंवा धोकादायक ठिकाणे जाणे टाळावे. - दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक सप्तशृंगी गडाबाबतही अहवाल मागविलाइर्शाळवाडी दुर्घटनेच्या पाश्व'भूमीवर कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावरील परिस्थितीचाही आढावा प्रशासनाने शुक्रवारी कळवण येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. सप्तशृंग गड येथील आई भगवती मंदीरात जाणे येणे साठी असणाऱ्या पायरीच्या आजूबाजूचा डोंगराळ भाग असल्याने, सदर परिसरात माती साचलेली आहे. सदर परिसरात खालच्या बाजुला नागरी वस्ती आहे. त्यामुळे दगडी बांध किंवा सरंक्षण भिंत हे काम होणे आवश्यक असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. याबाबतही पालकमंत्री भुसे यांनी सरकार अतिशय सकारात्मक असून संबंधित यंत्रणेला जागेची पाहणी करून अहवाल मागविण्यात आला असल्याचे सांगितले.  

टॅग्स :Nashikनाशिक